शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

coronavirus: केरळात कोरोनाचे सामाजिक निर्बंध वर्षभर लागू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 07:18 IST

सार्वजनिक ठिकाणी कुठेही वावरताना, प्रवास करताना तसेच कार्यालयांमध्येही मास्क लावणे तसेच दोन व्यक्तिंमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे जुलै २०२१ पर्यंत बंधनकारक असणार आहे.  

तिरुवनंतपूरम : कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक व सार्वजनिक व्यवहार करताना पाळायचे गेल्या मार्चपासून अंमलात आणलेले विविध प्रकारचे निर्बंध पुढील वर्षभर राज्यात सर्वत्र लागू राहतील,  असे केरळ सरकारने रविवारी जाहीर केले. या निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत देड करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.मार्चमध्ये साथ सुरु झाल्यानंतर साथीचे रोग प्रतिबंधक कायद्याखाली काढेलेल्या वटहुकुमात सुधारणा करणारा नवा वटहुकूम यासाठी काढण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कुठेही वावरताना, प्रवास करताना तसेच कार्यालयांमध्येही मास्क लावणे तसेच दोन व्यक्तिंमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे जुलै २०२१ पर्यंत बंधनकारक असणार आहे. ाास्क न लावणाºयास पहिल्यांना पकडल्यास २०० रुपये व नंतरच्या उल्लंघनासाठी पाच हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येईल. राज्यभर सार्वजनिक ठिकाणी थंकण्यासही कडक बंदी असेल.याखेरीज पुढील वर्षभर सर्व विवाह समारंभ जास्तीत जास्त ५० पाहुण्यांना बोलावून करावे लागतील तर अंत्यविधी व अंत्ययात्रेसाठी फक्त २० माणसे हजर राहू शकतील. गर्दी न करण्याच हा नियम लोकशही मार्गाने आंदोलन करण्याच्या मार्चे, निदर्शने व धरणे अशा कार्यक्रमांनाही लागू असेल. यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी तर घ्यावी लागेलच शिवाय यासाठीही जास्तीत जास्त १० माणसांची गर्दी जमविता येईल व त्यांनाही ‘सोशल डिन्टन्सिंग’ पाळावे लागेल.सर्व सार्वजनिक ठिकाणी हॅण्ड सॅनिटायजर उपलब्ध  करणे बंधनकारक करण्यात आले असून दुकाने, हॉटेल, शॉपिंग मॉल अशा ठिकाणी एका वेळी २५ हून अधिक ग्राहकांनी गर्दी करण्यास बंदी करण्यात आली आहे. बाहेरच्या राज्यातून केरळमध्ये येणाºया प्रत्येक व्यक्तीला राज्य सरकारच्या वेबसाइटवर नोंदणी करून सर्व माहिती द्यावी लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळ