शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

coronavirus: केरळात कोरोनाचे सामाजिक निर्बंध वर्षभर लागू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 07:18 IST

सार्वजनिक ठिकाणी कुठेही वावरताना, प्रवास करताना तसेच कार्यालयांमध्येही मास्क लावणे तसेच दोन व्यक्तिंमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे जुलै २०२१ पर्यंत बंधनकारक असणार आहे.  

तिरुवनंतपूरम : कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक व सार्वजनिक व्यवहार करताना पाळायचे गेल्या मार्चपासून अंमलात आणलेले विविध प्रकारचे निर्बंध पुढील वर्षभर राज्यात सर्वत्र लागू राहतील,  असे केरळ सरकारने रविवारी जाहीर केले. या निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत देड करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.मार्चमध्ये साथ सुरु झाल्यानंतर साथीचे रोग प्रतिबंधक कायद्याखाली काढेलेल्या वटहुकुमात सुधारणा करणारा नवा वटहुकूम यासाठी काढण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कुठेही वावरताना, प्रवास करताना तसेच कार्यालयांमध्येही मास्क लावणे तसेच दोन व्यक्तिंमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे जुलै २०२१ पर्यंत बंधनकारक असणार आहे. ाास्क न लावणाºयास पहिल्यांना पकडल्यास २०० रुपये व नंतरच्या उल्लंघनासाठी पाच हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येईल. राज्यभर सार्वजनिक ठिकाणी थंकण्यासही कडक बंदी असेल.याखेरीज पुढील वर्षभर सर्व विवाह समारंभ जास्तीत जास्त ५० पाहुण्यांना बोलावून करावे लागतील तर अंत्यविधी व अंत्ययात्रेसाठी फक्त २० माणसे हजर राहू शकतील. गर्दी न करण्याच हा नियम लोकशही मार्गाने आंदोलन करण्याच्या मार्चे, निदर्शने व धरणे अशा कार्यक्रमांनाही लागू असेल. यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी तर घ्यावी लागेलच शिवाय यासाठीही जास्तीत जास्त १० माणसांची गर्दी जमविता येईल व त्यांनाही ‘सोशल डिन्टन्सिंग’ पाळावे लागेल.सर्व सार्वजनिक ठिकाणी हॅण्ड सॅनिटायजर उपलब्ध  करणे बंधनकारक करण्यात आले असून दुकाने, हॉटेल, शॉपिंग मॉल अशा ठिकाणी एका वेळी २५ हून अधिक ग्राहकांनी गर्दी करण्यास बंदी करण्यात आली आहे. बाहेरच्या राज्यातून केरळमध्ये येणाºया प्रत्येक व्यक्तीला राज्य सरकारच्या वेबसाइटवर नोंदणी करून सर्व माहिती द्यावी लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळ