शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Coronavirus: कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसदारांना ४ लाख रुपये देणे शक्य नाही- केंद्र सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 06:28 IST

न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

नवी दिल्ली : कोरोनाने मरण पावलेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची भरपाई देणे शक्य नाही असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. इतक्या प्रमाणात भरपाई दिली तर आपत्कालीन निधी संपून जाईल असेही केंद्राने म्हटले आहे.कोरोना रुग्णांच्या वारसदारांच्या भरपाई रकमेबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीत केंद्राने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात म्हटले आहे की, भूकंप, पूर या नैसर्गिक आपत्तींचा तडाखा बसलेल्यांनाच भरपाई देण्याची तरतूद आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यामध्ये केलेली आहे. 

देशात कोरोनाने जवळपास ४ लाख जण मरण पावले आहेत. त्यांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची भरपाई दिली तर आपत्कालीन संकटांसाठी राखून ठेवलेला सर्व निधी संपून जाईल. असे झाल्यास राज्यांकडे कोरोना उपचारांसाठीची औषधे व अन्य आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किंवा इतर नैसर्गिक संकटांमध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी पैसाच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे जनहित याचिकेत करण्यात आलेली मागणी ही राज्य सरकारांच्या आर्थिक क्षमतेच्या आवाक्यातील नाही. केंद्राने म्हटले आहे की, कोरोनाची साथ अद्यापही सुरू आहे. या साथीचा फटका बसलेल्यांनी विम्यासाठी केलेले दावे जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपन्यांकडे पाठवून त्यांना भरपाईची रक्कम देण्याचा आदेश दिला आहे. 

आजवर दिले ८ हजार कोटी रुपये

केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, कोरोना साथीचा मुकाबला करण्याकरिता केंद्राने राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना आजवर एकूण ८२५७.८९ कोटी रुपये दिले आहेत.  याच कामासाठी २०१९-२० साली १,११३.२१ कोटी रुपये केंद्राने दिले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार