शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

Coronavirus: कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसदारांना ४ लाख रुपये देणे शक्य नाही- केंद्र सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 06:28 IST

न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

नवी दिल्ली : कोरोनाने मरण पावलेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची भरपाई देणे शक्य नाही असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. इतक्या प्रमाणात भरपाई दिली तर आपत्कालीन निधी संपून जाईल असेही केंद्राने म्हटले आहे.कोरोना रुग्णांच्या वारसदारांच्या भरपाई रकमेबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीत केंद्राने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात म्हटले आहे की, भूकंप, पूर या नैसर्गिक आपत्तींचा तडाखा बसलेल्यांनाच भरपाई देण्याची तरतूद आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यामध्ये केलेली आहे. 

देशात कोरोनाने जवळपास ४ लाख जण मरण पावले आहेत. त्यांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची भरपाई दिली तर आपत्कालीन संकटांसाठी राखून ठेवलेला सर्व निधी संपून जाईल. असे झाल्यास राज्यांकडे कोरोना उपचारांसाठीची औषधे व अन्य आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किंवा इतर नैसर्गिक संकटांमध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी पैसाच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे जनहित याचिकेत करण्यात आलेली मागणी ही राज्य सरकारांच्या आर्थिक क्षमतेच्या आवाक्यातील नाही. केंद्राने म्हटले आहे की, कोरोनाची साथ अद्यापही सुरू आहे. या साथीचा फटका बसलेल्यांनी विम्यासाठी केलेले दावे जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपन्यांकडे पाठवून त्यांना भरपाईची रक्कम देण्याचा आदेश दिला आहे. 

आजवर दिले ८ हजार कोटी रुपये

केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, कोरोना साथीचा मुकाबला करण्याकरिता केंद्राने राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना आजवर एकूण ८२५७.८९ कोटी रुपये दिले आहेत.  याच कामासाठी २०१९-२० साली १,११३.२१ कोटी रुपये केंद्राने दिले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार