शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

coronavirus: तबलिगी जमातमुळे देशातील अनेक भागात पसरला कोरोना, केंद्र सरकारचं राज्यसभेत उत्तर

By बाळकृष्ण परब | Updated: September 21, 2020 15:43 IST

मार्च महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामध्ये देशविदेशातील किमान ९ हजार लोक सहभागी झाले होते. या लोकांमुळेच दिल्ली आणि आसपासच्या भागात कोरोना पसरल्याचा आरोप केला जात होता.

ठळक मुद्देतबलिगी जमातच्या एका कार्यक्रमामुळे देशातील काही भागात कोरोना पसरल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातच्या २३३ सदस्यांना अटक केली तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना साद याच्याबाबतचा तपास सुरू आहे

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या फैलावास सुरुवात झाल्यानंतर दिल्लीमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमामध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडले होते. त्यानंतर देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने तबलिगी जमातवर कोरोना पसरवल्याचा आरोप होऊ लागला होता. दरम्यान, तबलिगी जमातच्या एका कार्यक्रमामुळे देशातील काही भागात कोरोना पसरल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. मार्चमध्ये दिल्लीतील निजामुद्दिन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग अनेक लोकांपर्यंत पोहोचला, असे केंद्रिय गृहमंत्रालयाने सोमवारी राज्यसभेमध्ये सांगितले.केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी राज्यसभेमध्ये सांगितले की, दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातच्या २३३ सदस्यांना अटक केली आहे. तसेच २९ मार्च रोजी संघटनेच्या मुख्यालयामधून २ हजार ३६१ जणांना बाहेर काढण्यात आले. मात्र तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना साद याच्याबाबतचा तपास सुरू आहे, केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी लेखी उत्तराच्या माध्यमातून राज्यसभेमध्ये ही माहिती दिली.कोरोनाचा संसर्ग सरू झाल्यानंतर विविध प्राधिकरणांनी दिलेल्या सूचना आणि आदेशांकडे दूर्लक्ष करत दीर्घकाळ मास्क आणि सोशल डिस्टंसिंगची व्यवस्था न करता एका बंद परिसरात मोठी सभा झाली. त्यामुळे अनेक व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला. अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.दरम्यान, कोरोनाच्या साथीच्या प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे कारस्थान आणि मोठ्या रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी मौलाना साद यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. मौलाना साद आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात जाणीवपूर्वक साथ पसरवल्याचा, संभाव्य सामूहिक हत्येचे प्रयत्नांसह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मार्च महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामध्ये देशविदेशातील किमान ९ हजार लोक सहभागी झाले होते. या लोकांमुळेच दिल्ली आणि आसपासच्या भागात कोरोना पसरल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर सरकार आणि प्रशासनाने मिळून तब्बल साडे पंचवीस हजार जमातींना शोधून शोधून क्वारेंटाइन केले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकार