शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

coronavirus: कोरोनाच्या लसीकरणासाठी भारताला येईल ५० हजार कोटी रुपये खर्च, एका लसीची असेल एवढी किंमत

By बाळकृष्ण परब | Updated: October 22, 2020 18:16 IST

India Corona vaccine News : चीननंतर जगातील सर्वाधिक कोलसंख्या असलेला दुसरा देश असलेल्या भारताला कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी तब्बल ५० हजार कोटींचा खर्च येणार आहे.

ठळक मुद्देभारताला कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी तब्बल ५० हजार कोटींचा खर्च येणार भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला कोरोनाविरोधातील लस देण्यासाठी सुमारे सहा ते सात डॉलर (४५० ते ५०० रुपये) खर्च येणार या लसीकरणासाठी पुढे कुठल्याही प्रकारची आर्थिक कमतरता भासणार नाही

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांत देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने घटत आहे. एकीकडे कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच केंद्र सरकारने कोरोनावरील लस खरेदी करण्यासाठीची तयारी पूर्णत्वास नेण्यास सुरुवात केली आहे. अद्याप कोरोनावरील लस विकसित झाली नसली तरी लवकरच अशी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ही तरतूद करण्यात येत आहे. दरम्यान, चीननंतर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला दुसरा देश असलेल्या भारताला कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी तब्बल ५० हजार कोटींचा खर्च येणार आहे.विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला कोरोनाविरोधातील लस देण्यासाठी सुमारे सहा ते सात डॉलर (४५० ते ५०० रुपये) खर्च येणार आहे. असा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील प्रशासनाचा अंदाज आहे. ३१ मार्चला संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत पैसा जमा करण्यात आला आहे. तसेच या लसीकरणासाठी पुढे कुठल्याही प्रकारची आर्थिक कमतरता भासणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.मिळालेल्या माहितीनुसार भारतात प्रत्येक व्यक्तील दोन लसी दिल्या जातील. ज्याचा एक वेळचा खर्च हा २ डॉलर एवढा असेल. तसेच २ ते ३ डॉलर प्रतिव्यक्ती खर्च हा साठवण आणि वाहतुकीवर होणार आहे.सरकारी पॅनेलच्या म्हणण्यानुसार सध्या भारतात कोरोनाचा संसर्ग हा शिखरावर पोहोचला आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्याचा फैलाव होऊ शकतो. कोरोनाने देशाच्या आर्थिक विकासाला मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, या आठवड्यापासून पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत देशात विविध सणांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वेगाने वाढ होऊ शकते.दरम्यान, मंगळवारी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले होते की, लॉकडाऊन हटवण्यात आले असले तरी देशातील कोरोना गेलेला नाही. त्यामुळे लस विकसित होईपर्यंत जनतेने नियमांचे पालन करावे. तसेच लस विकसित झाल्यानंतर ही लस सर्व देशवासियांना मिळावी यासाठी सरकारकडून धोरण आखण्यात येणार असल्याचेही मोदींनी सांगितले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य