शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोना वाढतोय, लॉकडाऊनची शक्यता, रेल्वेसेवाही बंद होणार? रेल्वे प्रशासनाचं मोठं विधान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 14:07 IST

Indian Railway News : महाराष्ट्रामध्ये १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर आता देशपातळीवरही लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच देशभरातील रेल्वे वाहतुकीवरही निर्बंध येऊन रेल्वेसेवा बंद करण्यात येणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देप्रवाशांनो कृपया लक्ष द्या, गोंधळून गडबडून जाऊ नका, रेल्वे गाड्या नियमितपणे धावत राहतीलसमर स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांना सूचित करण्यात येते की, लांब पल्ल्याच्या घोषित नियमित आणि विशेष गाड्याही धावत राहतीलया सर्व विशेष गाड्यांमध्ये कोविड-१९ च्या नियमांचे आणि निर्बंधांचे पालन करण्याच्या दृष्टीने कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवासांनाच ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील विविध भागात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. (coronavirus in India) त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी विविध ठिकाणी निर्बंध लागू करण्यात येऊ लागले आहे. महाराष्ट्रामध्ये १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर आता देशपातळीवरही लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (lockdown in India) तसेच देशभरातील रेल्वे वाहतुकीवरही निर्बंध येऊन रेल्वेसेवा बंद करण्यात येणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने आता याबाबत सूचक विधान केले आहे.  मध्य रेल्वेने या संदर्भात ट्वीट करत लांब पल्ल्याच्या नियमित आणि स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रानुसार धावत राहतील, असे सांगितले आहे.  ( Corona is on the rise, possibility of lockdown, train service will be closed? Railway administration's big statement ...)

या ट्वीटमध्ये मध्य रेल्वेच्या प्रशासनाने म्हटले आहे की, प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, गोंधळून गडबडून जाऊ नका, रेल्वे गाड्या नियमितपणे धावत राहतील. तर रेल्वे बोर्डाकडूनही याबाबत माहिती देण्यात आली आहे. समर स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांना सूचित करण्यात येते की, लांब पल्ल्याच्या घोषित नियमित आणि विशेष गाड्याही धावत राहतील. या सर्व विशेष गाड्यांमध्ये कोविड-१९ च्या नियमांचे आणि निर्बंधांचे पालन करण्याच्या दृष्टीने कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवासांनाच ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.  

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत प्रवाशांनी गोंधळून जाऊ नये. प्रवाशांना आवाहन आहे की, त्यांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी करू नये. केवळ ९० मिनिटे आधीच रेल्वे स्टेशनवर पोहोचावे. रेल्वे वेटिंग लिस्टवर नजर ठेवून आहे. आवश्यकता भासेल त्या प्रमाणे अतिरिक्त स्पेशल ट्रेन चालवण्यात येईल.  

कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण लॉकडाऊन होण्याच्या भीतीने बरेच लोक गावाच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने लोकांना गडबडून न जाण्याचे आवाहन केले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वे