शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

coronavirus: कोरोना वाढतोय, लॉकडाऊनची शक्यता, रेल्वेसेवाही बंद होणार? रेल्वे प्रशासनाचं मोठं विधान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 14:07 IST

Indian Railway News : महाराष्ट्रामध्ये १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर आता देशपातळीवरही लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच देशभरातील रेल्वे वाहतुकीवरही निर्बंध येऊन रेल्वेसेवा बंद करण्यात येणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देप्रवाशांनो कृपया लक्ष द्या, गोंधळून गडबडून जाऊ नका, रेल्वे गाड्या नियमितपणे धावत राहतीलसमर स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांना सूचित करण्यात येते की, लांब पल्ल्याच्या घोषित नियमित आणि विशेष गाड्याही धावत राहतीलया सर्व विशेष गाड्यांमध्ये कोविड-१९ च्या नियमांचे आणि निर्बंधांचे पालन करण्याच्या दृष्टीने कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवासांनाच ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील विविध भागात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. (coronavirus in India) त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी विविध ठिकाणी निर्बंध लागू करण्यात येऊ लागले आहे. महाराष्ट्रामध्ये १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर आता देशपातळीवरही लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (lockdown in India) तसेच देशभरातील रेल्वे वाहतुकीवरही निर्बंध येऊन रेल्वेसेवा बंद करण्यात येणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने आता याबाबत सूचक विधान केले आहे.  मध्य रेल्वेने या संदर्भात ट्वीट करत लांब पल्ल्याच्या नियमित आणि स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रानुसार धावत राहतील, असे सांगितले आहे.  ( Corona is on the rise, possibility of lockdown, train service will be closed? Railway administration's big statement ...)

या ट्वीटमध्ये मध्य रेल्वेच्या प्रशासनाने म्हटले आहे की, प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, गोंधळून गडबडून जाऊ नका, रेल्वे गाड्या नियमितपणे धावत राहतील. तर रेल्वे बोर्डाकडूनही याबाबत माहिती देण्यात आली आहे. समर स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांना सूचित करण्यात येते की, लांब पल्ल्याच्या घोषित नियमित आणि विशेष गाड्याही धावत राहतील. या सर्व विशेष गाड्यांमध्ये कोविड-१९ च्या नियमांचे आणि निर्बंधांचे पालन करण्याच्या दृष्टीने कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवासांनाच ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.  

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत प्रवाशांनी गोंधळून जाऊ नये. प्रवाशांना आवाहन आहे की, त्यांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी करू नये. केवळ ९० मिनिटे आधीच रेल्वे स्टेशनवर पोहोचावे. रेल्वे वेटिंग लिस्टवर नजर ठेवून आहे. आवश्यकता भासेल त्या प्रमाणे अतिरिक्त स्पेशल ट्रेन चालवण्यात येईल.  

कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण लॉकडाऊन होण्याच्या भीतीने बरेच लोक गावाच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने लोकांना गडबडून न जाण्याचे आवाहन केले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वे