शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

coronavirus: कोरोना वाढतोय, लॉकडाऊनची शक्यता, रेल्वेसेवाही बंद होणार? रेल्वे प्रशासनाचं मोठं विधान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 14:07 IST

Indian Railway News : महाराष्ट्रामध्ये १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर आता देशपातळीवरही लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच देशभरातील रेल्वे वाहतुकीवरही निर्बंध येऊन रेल्वेसेवा बंद करण्यात येणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देप्रवाशांनो कृपया लक्ष द्या, गोंधळून गडबडून जाऊ नका, रेल्वे गाड्या नियमितपणे धावत राहतीलसमर स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांना सूचित करण्यात येते की, लांब पल्ल्याच्या घोषित नियमित आणि विशेष गाड्याही धावत राहतीलया सर्व विशेष गाड्यांमध्ये कोविड-१९ च्या नियमांचे आणि निर्बंधांचे पालन करण्याच्या दृष्टीने कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवासांनाच ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील विविध भागात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. (coronavirus in India) त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी विविध ठिकाणी निर्बंध लागू करण्यात येऊ लागले आहे. महाराष्ट्रामध्ये १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर आता देशपातळीवरही लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (lockdown in India) तसेच देशभरातील रेल्वे वाहतुकीवरही निर्बंध येऊन रेल्वेसेवा बंद करण्यात येणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने आता याबाबत सूचक विधान केले आहे.  मध्य रेल्वेने या संदर्भात ट्वीट करत लांब पल्ल्याच्या नियमित आणि स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रानुसार धावत राहतील, असे सांगितले आहे.  ( Corona is on the rise, possibility of lockdown, train service will be closed? Railway administration's big statement ...)

या ट्वीटमध्ये मध्य रेल्वेच्या प्रशासनाने म्हटले आहे की, प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, गोंधळून गडबडून जाऊ नका, रेल्वे गाड्या नियमितपणे धावत राहतील. तर रेल्वे बोर्डाकडूनही याबाबत माहिती देण्यात आली आहे. समर स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांना सूचित करण्यात येते की, लांब पल्ल्याच्या घोषित नियमित आणि विशेष गाड्याही धावत राहतील. या सर्व विशेष गाड्यांमध्ये कोविड-१९ च्या नियमांचे आणि निर्बंधांचे पालन करण्याच्या दृष्टीने कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवासांनाच ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.  

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत प्रवाशांनी गोंधळून जाऊ नये. प्रवाशांना आवाहन आहे की, त्यांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी करू नये. केवळ ९० मिनिटे आधीच रेल्वे स्टेशनवर पोहोचावे. रेल्वे वेटिंग लिस्टवर नजर ठेवून आहे. आवश्यकता भासेल त्या प्रमाणे अतिरिक्त स्पेशल ट्रेन चालवण्यात येईल.  

कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण लॉकडाऊन होण्याच्या भीतीने बरेच लोक गावाच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने लोकांना गडबडून न जाण्याचे आवाहन केले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वे