शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus: केंद्रीय सुरक्षा दलांच्या ४०० जवानांना कोरोना; अधिकारी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 23:53 IST

उपाययोजना कटाक्षाने पाळण्याचे आवाहन

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) आणखी ८५ जवानांना बुधवारी कोरोना विषाणूची लागण झाल्याने केंद्रीय निमलष्करी सुरक्षा दलांमधील या साथीचा संसर्ग झालेल्यांची संख्या ४०० च्या घरात पोहोचली आहे. देशाच्या सीमांवर सुरक्षेची अत्यंत महत्त्वाची कामगिरी पार पाडत असलेले हे जवान एवढ्या मोठ्या संख्येने या महामारीच्या कचाट्यात सापडत असल्याने या सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी चिंतित असून, त्यांनी आपल्या सर्व छावण्या तसेच आस्थापनांमध्ये कोरोनाविरोधी उपाय कसोशीने पाळण्याचे निर्देश पुन्हा एकदा जारी केले आहेत.सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्याला तुरूंगवाससिंगापूर : कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सोशल डिन्सन्सिंगचे पालन करा, असे सांगणाºया पोलीस अधिकाºयाला असभ्य भाषेत बोलणाºया भारतीय वंशाच्या रवी सिनाथंबी सुब्रमण्यम (५३) याला बुधवारी सात महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली. सुब्रमण्यम हा अनेक दशकांपासून अनेक गुन्ह्यांत गुंतलेला असल्यामुळे समाजाला सततचा उपद्रव आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले. गेल्या महिन्यात त्याने दोन वेळा गुन्हा केला, असे ‘न्यूज एशिया’ने म्हटले. पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांना त्याने शिव्या दिल्याचे त्याच्यावर दोन आरोप होते व तिसरा आरोप त्याने तीन आरोग्य अधिकाºयांचे तोंड फोडण्याची धमकी दिल्याचा होता.१३८ ‘बीएसएफ’च्या त्रिपुरात अंबासा येथे तैनात असलेल्या १३८ व्या बटालियनमध्ये सर्वात जास्त म्हणजे ४७ जवानांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे.‘बीएसएफ’मधील या ताज्या ८५ केसखेरीज मंगळवार संध्याकाळपर्यंत ‘बीएसएप’मध्ये १५० हून अधिक, केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) १४७, भारत तिबेट सीमा पोलीस दलात ४५, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात १५, तर सशस्त्र सीमा दलात १३ जवानांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त होते.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलcorona virusकोरोना वायरस बातम्या