शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: “जनतेने ठरवलं तर देशातील कोरोना २१ दिवसांत जाऊ शकतो”; खासदाराचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 13:50 IST

CoronaVirus: जनतेने ठरवले तर २१ दिवसांत कोरोना जाऊ शकतो, असा दावा बिहारमधील एका खासदाराने केला आहे.

ठळक मुद्देजनतेने ठरवलं तर देशातील कोरोना २१ दिवसांत जाऊ शकतोबिहारमधील खासदाराचा दावा

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर जनतेने ठरवले तर २१ दिवसांत कोरोना जाऊ शकतो, असा दावा बिहारमधील एका खासदाराने केला आहे. (mp ajay mandal claims that if public wishes then corona can go in 21 days)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम देशावर होतााना पाहायला मिळत आहे. देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. मात्र, अशातच बिहारमधील खासदार अजय मंडल यांच्या निधनाची अफवा पसरली. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी अजय मंडल यांनी तातडीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजय मंडल यांनी सदर दावा केला आहे. 

लस हाच उपाय, भारतात ‘इतक्या’ कोटी नागरिकांचे लसीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत

२१ दिवसांत कोरोना जाऊ शकतो

पत्रकारांशी बोलताना मंडल यांनी मोठा दावा केला. जनतेने ठरवले, तर केवळ २१ दिवसांत कोरोनाचे समूळ उच्चाटन देशातून होऊ शकते. कोरोना चेन आपण तोडू शकतो. गर्दी केली नाही, तर कोरोनाही राहणार नाही, असा दावा करत प्रत्येक रुग्णाला शोधून त्याला मदत करणे शक्य नाही, असेही मंडल यांनी स्पष्ट केले. कोरोना काळात आम्हीही मदत केली. मात्र, त्याचा गवगवा सोशल मीडियावर केले नाही, असे मंडल यांनी यावेळी बोलताना सांगितले.

लसीकरणासाठी ७० हजार कोटींहून कमी खर्च

भारत देश खूप मोठा आहे. भारताची लोकसंख्याही खूप अधिक आहे. असे असूनही आपल्याकडे संसाधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. एका दिवसाच्या लॉकडाऊनमुळे १० हजार कोटींचे नुकसान सोसावे लागते. देशातील ५१ कोटी नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करणे आवश्यक आहे. आतापर्यंत किमान एक डोस दिलेल्या नागरिकांची संख्या १३ कोटींच्या घरात आहे. या सर्वांचे लसीकरण करण्यासाठी ७० हजार कोटीहून कमी खर्च होऊ शकेल, असेही डॉ. शेट्टी यांनी सांगितले. 

राजीव सातव सक्षम, प्रतिभावान नेतृत्व होतं, संसदेतील चांगला मित्र गमावला: पंतप्रधान मोदी

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतात शनिवारी दिवसभरात ३ लाख ११ हजार १७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ६२ हजार ४३७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशात ३६ लाख १८ हजार ४८५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर दिवसभरात ४,०३७ रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसBiharबिहारCentral Governmentकेंद्र सरकार