शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: “जनतेने ठरवलं तर देशातील कोरोना २१ दिवसांत जाऊ शकतो”; खासदाराचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 13:50 IST

CoronaVirus: जनतेने ठरवले तर २१ दिवसांत कोरोना जाऊ शकतो, असा दावा बिहारमधील एका खासदाराने केला आहे.

ठळक मुद्देजनतेने ठरवलं तर देशातील कोरोना २१ दिवसांत जाऊ शकतोबिहारमधील खासदाराचा दावा

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर जनतेने ठरवले तर २१ दिवसांत कोरोना जाऊ शकतो, असा दावा बिहारमधील एका खासदाराने केला आहे. (mp ajay mandal claims that if public wishes then corona can go in 21 days)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम देशावर होतााना पाहायला मिळत आहे. देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. मात्र, अशातच बिहारमधील खासदार अजय मंडल यांच्या निधनाची अफवा पसरली. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी अजय मंडल यांनी तातडीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजय मंडल यांनी सदर दावा केला आहे. 

लस हाच उपाय, भारतात ‘इतक्या’ कोटी नागरिकांचे लसीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत

२१ दिवसांत कोरोना जाऊ शकतो

पत्रकारांशी बोलताना मंडल यांनी मोठा दावा केला. जनतेने ठरवले, तर केवळ २१ दिवसांत कोरोनाचे समूळ उच्चाटन देशातून होऊ शकते. कोरोना चेन आपण तोडू शकतो. गर्दी केली नाही, तर कोरोनाही राहणार नाही, असा दावा करत प्रत्येक रुग्णाला शोधून त्याला मदत करणे शक्य नाही, असेही मंडल यांनी स्पष्ट केले. कोरोना काळात आम्हीही मदत केली. मात्र, त्याचा गवगवा सोशल मीडियावर केले नाही, असे मंडल यांनी यावेळी बोलताना सांगितले.

लसीकरणासाठी ७० हजार कोटींहून कमी खर्च

भारत देश खूप मोठा आहे. भारताची लोकसंख्याही खूप अधिक आहे. असे असूनही आपल्याकडे संसाधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. एका दिवसाच्या लॉकडाऊनमुळे १० हजार कोटींचे नुकसान सोसावे लागते. देशातील ५१ कोटी नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करणे आवश्यक आहे. आतापर्यंत किमान एक डोस दिलेल्या नागरिकांची संख्या १३ कोटींच्या घरात आहे. या सर्वांचे लसीकरण करण्यासाठी ७० हजार कोटीहून कमी खर्च होऊ शकेल, असेही डॉ. शेट्टी यांनी सांगितले. 

राजीव सातव सक्षम, प्रतिभावान नेतृत्व होतं, संसदेतील चांगला मित्र गमावला: पंतप्रधान मोदी

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतात शनिवारी दिवसभरात ३ लाख ११ हजार १७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ६२ हजार ४३७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशात ३६ लाख १८ हजार ४८५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर दिवसभरात ४,०३७ रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसBiharबिहारCentral Governmentकेंद्र सरकार