शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus :किरकोळ व्यापार क्षेत्राला कोरोनाचा मोठा फटका, मॉल, मल्टिप्लेक्स बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 05:58 IST

लोकांनी एकत्र येऊ नये, यासाठी सरकारने हे आदेश दिले आहेत. त्याचा फटका बसून संघटित किरकोळ विक्री क्षेत्र जवळपास ठप्प झाले आहे.

बंगळुरू : कोरोनाच्या साथीमुळे संघटित किरकोळ विक्रीक्षेत्राला फटका बसला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्यामुळे राज्य सरकारांनी मॉल व मल्टिप्लेक्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत. लोकांनी एकत्र येऊ नये, यासाठी सरकारने हे आदेश दिले आहेत. त्याचा फटका बसून संघटित किरकोळ विक्री क्षेत्र जवळपास ठप्प झाले आहे.‘अ‍ॅनारॉक रिटेल्स’चे एमडी आणि सीईओ अनुज केजरीवाल यांनी म्हटले आहे की, बंद झालेल्या आस्थापनांची संख्या मोठी आहे. अल्पकाळासाठी लावण्यात आलेल्या बंदीचेही लक्षणीय वित्तीय परिणाम होतील.‘अ‍ॅनारॉक रिटेल’ने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, एनसीआर, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पुणे येथील १२६ मॉल बंद आहेत. १00 मॉल्समध्ये मल्टिप्लेक्स आहेत.केजरीवाल म्हणाले की, या आस्थापनांना भेट देणाऱ्या लोकांची संख्या मोठी असते. कोरोनामुळे आरोग्य आणीबाणीसारख्या काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या आस्थापना बंद करणे क्रमप्राप्तही आहे. मात्र, त्याचे वित्तीय परिणाम टाळणेही अवघड आहे.परिस्थिती गंभीरसूत्रांनी सांगितले की, भारतात कोरोना विषाणूच्या साथीमुळे निर्माण झालेली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्यामुळे सरकारांकडून सातत्याने नवनव्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. ‘लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊ नये’, हा एकच उद्देश या उपाययोजनांमागे प्रामुख्याने दिसून येत आहे....तर विमान कंपन्या होतील दिवाळखोरनवी दिल्ली : कोविद-१९ विषाणूच्या साथीमुळे जगातील बहुतांश विमान वाहतूक कंपन्या मे अखेरपर्यंत दिवाळखोरीत जातील, असा इशारा आंतरराष्ट्रीय हवाई सल्लागार संस्था ‘कापा’ने दिला आहे. सरकार आणि हवाई वाहतूक उद्योगाने कृती केली तरच हे संकट टाळले जाऊ शकते, असेही ‘कापा’ने म्हटले आहे.‘कापा’ने म्हटले की, कोरोना विषाणू आणि त्यावर उपाय म्हणून जगभरातील सरकारांनी प्रवास व पर्यटनावर आणलेल्या मर्यादा यामुळे हवाई वाहतूक कंपन्या तांत्रिकदृष्ट्या याआधीच दिवाळखोरीत गेल्या आहेत. अनेक कंपन्यांचे कर्जाचे हप्ते थकायला सुरुवात झाली आहे.कोरोनामुळे जगातील विमान वाहतूक कंपन्यांनी परिचालनात कमालीची कपात केली आहे. डेल्टा एअरलाइन्सने ३00 विमाने जमिनीवर आणली असून, उड्डाणात ४0 टक्के कपात केली आहे. अमेरिकेने युरोपीय संघ, ब्रिटन, आयर्लंडच्या लोकांसाठी पर्यटन व्हिसावर बंदी घातली आहे. भारताने ११ मार्चपूर्वीचे सर्व पर्यटन व्हिसा आणि ई-व्हिसा रद्द केले आहेत.स्थिती कायम राहिल्यास मे २0२0च्या अखेरपर्यंत बहुतांश एअरलाइन्स दिवाळखोरीत जातील. हे संकट टाळण्यासाठी सरकार व हवाई उद्योग यांनी प्रयत्न करायला हवेत.बुकिंग रद्द, विमाने रिकामीजी विमाने उड्डाण करीत आहेत, ती अर्धी रिकामी आहेत. नवी बुकिंग जवळपास ठप्प झाली असताना आधी झालेले बुकिंग रद्द करण्याचे प्रमाणही मोठे आहे. ताफ्यात २६० विमाने असलेली भारतातील सर्वांत मोठी हवाई वाहतूक कंपनी इंडिगोने गेल्या आठवड्यात म्हटले होते की, आपल्या दैनंदिन बुकिंगमध्ये १५ ते २० टक्के कपात झाली आहे. आपल्या तिमाही महसुलावर याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे.‘आरक्षण रद्द केल्यास शुल्क आकारू नका’नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे अनेक लोक आपले प्रवासाचे बेत रद्द करत आहेत.त्यामुळे तिकिटांचे आरक्षण रद्द केल्याबद्दलचे शुल्क रेल्वे व विमान कंपन्यांनी प्रवाशांना आकारू नये, अशी मागणी माकपचे खासदार एलामाराम करीम यांनी राज्यसभेत सोमवारी केली.कोरोनासंदर्भातील चर्चेत करीम म्हणाले की, या साथीचा फैलाव रोखण्यासाठी काही राज्यांनी शिक्षणसंस्था व अन्य सार्वजनिक स्थळे काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक लोकांनी प्रवासाचे बेत रद्द केले आहेत.त्यामुळे सध्याच्या स्थितीत अशा प्रवाशांकडून तिकीट आरक्षण रद्द केल्यास रेल्वे, विमान कंपन्यांनी तसेच राज्यांच्या परिवहन महामंडळांनीपैसे घेऊ नयेत, असे आदेश सरकारने दिले पाहिजेत. एलामाराम करीमयांच्या सूचनेला अन्य पक्षांच्या काही खासदारांनी पाठिंबा दिला.

टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारतbusinessव्यवसाय