शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

coronavirus :किरकोळ व्यापार क्षेत्राला कोरोनाचा मोठा फटका, मॉल, मल्टिप्लेक्स बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 05:58 IST

लोकांनी एकत्र येऊ नये, यासाठी सरकारने हे आदेश दिले आहेत. त्याचा फटका बसून संघटित किरकोळ विक्री क्षेत्र जवळपास ठप्प झाले आहे.

बंगळुरू : कोरोनाच्या साथीमुळे संघटित किरकोळ विक्रीक्षेत्राला फटका बसला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्यामुळे राज्य सरकारांनी मॉल व मल्टिप्लेक्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत. लोकांनी एकत्र येऊ नये, यासाठी सरकारने हे आदेश दिले आहेत. त्याचा फटका बसून संघटित किरकोळ विक्री क्षेत्र जवळपास ठप्प झाले आहे.‘अ‍ॅनारॉक रिटेल्स’चे एमडी आणि सीईओ अनुज केजरीवाल यांनी म्हटले आहे की, बंद झालेल्या आस्थापनांची संख्या मोठी आहे. अल्पकाळासाठी लावण्यात आलेल्या बंदीचेही लक्षणीय वित्तीय परिणाम होतील.‘अ‍ॅनारॉक रिटेल’ने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, एनसीआर, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पुणे येथील १२६ मॉल बंद आहेत. १00 मॉल्समध्ये मल्टिप्लेक्स आहेत.केजरीवाल म्हणाले की, या आस्थापनांना भेट देणाऱ्या लोकांची संख्या मोठी असते. कोरोनामुळे आरोग्य आणीबाणीसारख्या काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या आस्थापना बंद करणे क्रमप्राप्तही आहे. मात्र, त्याचे वित्तीय परिणाम टाळणेही अवघड आहे.परिस्थिती गंभीरसूत्रांनी सांगितले की, भारतात कोरोना विषाणूच्या साथीमुळे निर्माण झालेली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्यामुळे सरकारांकडून सातत्याने नवनव्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. ‘लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊ नये’, हा एकच उद्देश या उपाययोजनांमागे प्रामुख्याने दिसून येत आहे....तर विमान कंपन्या होतील दिवाळखोरनवी दिल्ली : कोविद-१९ विषाणूच्या साथीमुळे जगातील बहुतांश विमान वाहतूक कंपन्या मे अखेरपर्यंत दिवाळखोरीत जातील, असा इशारा आंतरराष्ट्रीय हवाई सल्लागार संस्था ‘कापा’ने दिला आहे. सरकार आणि हवाई वाहतूक उद्योगाने कृती केली तरच हे संकट टाळले जाऊ शकते, असेही ‘कापा’ने म्हटले आहे.‘कापा’ने म्हटले की, कोरोना विषाणू आणि त्यावर उपाय म्हणून जगभरातील सरकारांनी प्रवास व पर्यटनावर आणलेल्या मर्यादा यामुळे हवाई वाहतूक कंपन्या तांत्रिकदृष्ट्या याआधीच दिवाळखोरीत गेल्या आहेत. अनेक कंपन्यांचे कर्जाचे हप्ते थकायला सुरुवात झाली आहे.कोरोनामुळे जगातील विमान वाहतूक कंपन्यांनी परिचालनात कमालीची कपात केली आहे. डेल्टा एअरलाइन्सने ३00 विमाने जमिनीवर आणली असून, उड्डाणात ४0 टक्के कपात केली आहे. अमेरिकेने युरोपीय संघ, ब्रिटन, आयर्लंडच्या लोकांसाठी पर्यटन व्हिसावर बंदी घातली आहे. भारताने ११ मार्चपूर्वीचे सर्व पर्यटन व्हिसा आणि ई-व्हिसा रद्द केले आहेत.स्थिती कायम राहिल्यास मे २0२0च्या अखेरपर्यंत बहुतांश एअरलाइन्स दिवाळखोरीत जातील. हे संकट टाळण्यासाठी सरकार व हवाई उद्योग यांनी प्रयत्न करायला हवेत.बुकिंग रद्द, विमाने रिकामीजी विमाने उड्डाण करीत आहेत, ती अर्धी रिकामी आहेत. नवी बुकिंग जवळपास ठप्प झाली असताना आधी झालेले बुकिंग रद्द करण्याचे प्रमाणही मोठे आहे. ताफ्यात २६० विमाने असलेली भारतातील सर्वांत मोठी हवाई वाहतूक कंपनी इंडिगोने गेल्या आठवड्यात म्हटले होते की, आपल्या दैनंदिन बुकिंगमध्ये १५ ते २० टक्के कपात झाली आहे. आपल्या तिमाही महसुलावर याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे.‘आरक्षण रद्द केल्यास शुल्क आकारू नका’नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे अनेक लोक आपले प्रवासाचे बेत रद्द करत आहेत.त्यामुळे तिकिटांचे आरक्षण रद्द केल्याबद्दलचे शुल्क रेल्वे व विमान कंपन्यांनी प्रवाशांना आकारू नये, अशी मागणी माकपचे खासदार एलामाराम करीम यांनी राज्यसभेत सोमवारी केली.कोरोनासंदर्भातील चर्चेत करीम म्हणाले की, या साथीचा फैलाव रोखण्यासाठी काही राज्यांनी शिक्षणसंस्था व अन्य सार्वजनिक स्थळे काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक लोकांनी प्रवासाचे बेत रद्द केले आहेत.त्यामुळे सध्याच्या स्थितीत अशा प्रवाशांकडून तिकीट आरक्षण रद्द केल्यास रेल्वे, विमान कंपन्यांनी तसेच राज्यांच्या परिवहन महामंडळांनीपैसे घेऊ नयेत, असे आदेश सरकारने दिले पाहिजेत. एलामाराम करीमयांच्या सूचनेला अन्य पक्षांच्या काही खासदारांनी पाठिंबा दिला.

टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारतbusinessव्यवसाय