शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही घातक; माणूस राहिला तरच आस्था टिकेल; रमजानवर योगी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 15:34 IST

मुख्यमंत्री  योगी म्हणाले, यासंदर्भात आपण उद्या अथवा परवा धर्मगुरूंशी चर्चा करणार आहोत. मानवी जीवनाला प्राधान्य दिले जाईल. एवढेच नाही, तर कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन करावेच लागेल. कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक आहे.

लखनौ - कोरोनाने संपूर्ण देशातच हाहाकार घातला आहे. याच पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ (CM Yogi) यांनी म्हटले आहे, की माणूस राहिला, तरच आस्था व्यक्त करू शकेल. मणूस आहे, म्हणून आस्था आहे. आस्थेमुळे माणूस नाही. रमजानसह इतर सनांसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणणाले, माणूस वाचला तर आस्था टिकेल. त्यामुळे कुठलेही धर्मिक स्थळ असो, तेथे पाच हून अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. योगी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (UP coronavirus CM Yogi on Ramadan lockdown says do not gather more than 5 people in any religious place)

मुख्यमंत्री  योगी म्हणाले, यासंदर्भात आपण उद्या अथवा परवा धर्मगुरूंशी चर्चा करणार आहोत. मानवी जीवनाला प्राधान्य दिले जाईल. एवढेच नाही, तर कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन करावेच लागेल. कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक आहे. आम्हाला पहिल्या लाटेचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही व्यापक रणनीती तयार केली आहे. सर्व कोरोना नियमांचे पालन करून सण आणि उत्सव साजरे करा. 

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

लशीवरून सुरू असलेल्या राजकारणावर बोलताना योगी म्हणाले, उत्तर प्रदेशात लशीची कमतरता नाही. देशात जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. उत्तर प्रदेशात 6 हजार केंद्रांतून लसीकरण सुरू आहे. लस वाया जाऊ नये म्हणून नियोजन केले जात आहे. 

लशीच्या कमतरतेवर बोलताना योगी म्हणाले, नियोजनाच्या पातळीवर राज्य सरकारांच्या शिथीलतेमुळेच ही समस्या निर्माण झाली असेल. अन्यथा लस मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहेत. मुख्यमंत्री योगी म्हणाले, लशीची नासधूस जेवढी कमी होईल तेवढीच ती अधिक लोकांना दिली जाईल, असा आमचा प्रयत्न आहे.

लॉकडाउनच्या प्रश्नावर योगी म्हणाले, राज्यात लॉकडाउनची आवश्यकता नाही. जेथे 500 हून अधिक रुग्ण आहेत अथवा जेथे रोज 100 हून अधिक रुग्ण आढळत आहेत. अशा ठिकाणी नाइट कर्फ्यू लावण्यात यावा. तसेच या काळात आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरूच रहावा.

Corona Updates Mumbai: मुंबईत उभारले जाणार चार नवे 'जम्बो कोविड सेंटर'; राज्य सरकारचं महत्वाचं पाऊल!

शाळा महाविद्यालये बंद -योगी म्हणाले, आम्ही बेसिक आणि माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये 20 एप्रिलपर्यंत बंद केली आहेत. क्लब आणि कोचिंग बंद करण्यासही सांगण्यात आले आहे. याशिवाय, बंद सभागृहांत 50 हून अधिक आणि मोकळ्या जागी 100 हून अधिक लोकांनी एकत्रित येऊ नये. तसेच सर्वांनी मास्कचा वापर करायला हवा.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस