शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: स्थलांतरित कामगारांवर केंद्र तोडगा काढणार; राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 02:04 IST

गृहमंत्रालय करू शकते दिशानिर्देश जारी

नवी दिल्ली : विविध राज्यात अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मंत्री समूहाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकांंच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यावर चर्चा केल्याचे राजनाथ सिंह यांनी नंतर सांगितले.मंत्री समूहाने हे स्पष्ट नाही केले की, यासाठी काय मापदंड लावण्यात येणार आहेत. असे सांगितले जात आहे की, केंद्रीय गृहमंत्रालय या कामगारांबाबत नवे दिशानिर्देश घेऊन समोर येऊ शकते. या लोकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी सरकार एक अधिकृत सेवा सुरु करण्यास परवानगी देऊ शकते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह काही राज्यांचे मुख्यमंत्री हे विविध राज्यात अडकलेल्या कामगारांची सद्यस्थिती स्वीकारण्यास तयार नाहीत.केंद्र सरकारला असे वाटते की, राज्यांनी यावर काही तोडगा शोधावा. कोटा येथून उत्तर प्रदेशात बस सेवेसाठी राजस्थान आणि उत्तर प्रदेश सरकार तयार झाले आहेत. अन्य राज्यही अशा काही उपाययोजना करण्याची तयारी करत आहेत.केंद्राची मुख्य काळजी ही आहे की, खाणी, बंदरे, कार्गो संचलन, रस्ते निर्मिती आणि अन्य क्षेत्रातील कामासाठी कशाप्रकारे मनुष्यबळ उपलब्ध करता येईल.कामगारांची माहिती एकत्रित करण्याचे निर्देशकेंद्रीय श्रम मंत्रालयाने राज्यांना निर्देश दिले आहेत की, स्थलांतरीत कामगारांचा एक डेटा तयार करण्यात यावा. राजस्थान, केरळ, तामिळनाडू आणि अन्य काही राज्ये अशाप्रकारे काम करत आहेत.या मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी श्रम मंत्रालयाने विविध राज्यात २० कंट्रोल रुम उभारल्या आहेत. मात्र, बहुतांश कॉल हे कामगारांना घरी जाण्याबाबतचे आहेत.केंद्र सरकारला अशी काळजी आहे की, बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड येथील या कामगारांना परत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था कशी करावी? २५ दिवसांपासून लाखो कामगार विविध राज्यात फसले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या