शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

coronavirus: स्थलांतरीत मजुरांसाठी केंद्राची मोठी योजना, वित्तमंत्र्यांनी केली घोषणा; एवढ्या जिल्ह्यांत मिळणार रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 18:26 IST

कोरोनाच्या संसर्गाची भीती आणि रोजगार गेल्याने शहरांमधून मजूर आणि कामगारांनी गावाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आहे.

ठळक मुद्देस्थलांतरीत मजुरांसाठी केंद्र सरकारकडून गरीब कल्याण रोजगार योजनेची घोषणाया योजनेची औपचारिक सुरुवात २० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतीलही योजना देशातील सहा राज्यांमधील ११६ जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित होणार आहे

नवी दिल्ली - देशात आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे आरोग्याच्या प्रश्नासोबतच मोठ्या आर्थिक संकटाचाही गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. कोरोनाच्या संसर्गाची भीती आणि रोजगार गेल्याने शहरांमधून मजूर आणि कामगारांनी गावाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात स्थलांतर  केले आहे. त्यामुळे अशा स्थलांतरीत मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता अशा स्थलांतरीत मजुरांसाठी केंद्र सरकारने एका मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचे नाव गरीब कल्याण रोजगार योजना असे असून, या योजनेची औपचारिक सुरुवात २० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतील.

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. या योजनेंतर्गत गावात गेलेल्या स्थलांतरीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना देशातील सहा राज्यांमधील ११६ जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित होणार आहे. २० जून रोजी होणाऱ्या योजनेच्या औपचारिक उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या सहा राज्यांचे मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे उपस्थित राहतील.

या योजनेसाठी सरकारला एकूण ५० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच या योजनेंतर्गत कामगारांना २५ प्रकारचे काम दिले जाईल. या योजनेचा लाभ बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओदिशा या राज्यातील कामगारांना मिळणार आहे. सुमारे २५ हजार कामगारांना या योजनेचा लाभ होईल, असा दावा करण्यात येत आहे. यासाठी या मजुरांची स्कील मॅपिंग करण्यात आली आहे.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndiaभारत