शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

coronavirus: स्थलांतरीत मजुरांसाठी केंद्राची मोठी योजना, वित्तमंत्र्यांनी केली घोषणा; एवढ्या जिल्ह्यांत मिळणार रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 18:26 IST

कोरोनाच्या संसर्गाची भीती आणि रोजगार गेल्याने शहरांमधून मजूर आणि कामगारांनी गावाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आहे.

ठळक मुद्देस्थलांतरीत मजुरांसाठी केंद्र सरकारकडून गरीब कल्याण रोजगार योजनेची घोषणाया योजनेची औपचारिक सुरुवात २० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतीलही योजना देशातील सहा राज्यांमधील ११६ जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित होणार आहे

नवी दिल्ली - देशात आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे आरोग्याच्या प्रश्नासोबतच मोठ्या आर्थिक संकटाचाही गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. कोरोनाच्या संसर्गाची भीती आणि रोजगार गेल्याने शहरांमधून मजूर आणि कामगारांनी गावाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात स्थलांतर  केले आहे. त्यामुळे अशा स्थलांतरीत मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता अशा स्थलांतरीत मजुरांसाठी केंद्र सरकारने एका मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचे नाव गरीब कल्याण रोजगार योजना असे असून, या योजनेची औपचारिक सुरुवात २० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतील.

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. या योजनेंतर्गत गावात गेलेल्या स्थलांतरीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना देशातील सहा राज्यांमधील ११६ जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित होणार आहे. २० जून रोजी होणाऱ्या योजनेच्या औपचारिक उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या सहा राज्यांचे मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे उपस्थित राहतील.

या योजनेसाठी सरकारला एकूण ५० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच या योजनेंतर्गत कामगारांना २५ प्रकारचे काम दिले जाईल. या योजनेचा लाभ बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओदिशा या राज्यातील कामगारांना मिळणार आहे. सुमारे २५ हजार कामगारांना या योजनेचा लाभ होईल, असा दावा करण्यात येत आहे. यासाठी या मजुरांची स्कील मॅपिंग करण्यात आली आहे.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndiaभारत