शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

coronavirus : कोरोनावरून केंद्र आणि ममता बॅनर्जी आमनेसामने, केंद्रीय पाहणी पथकाला रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 17:23 IST

कोरोनाचा अधिक धोका असलेल्या राज्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी   केंद्र सरकारने पथके पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

कोलकाता -  एकीकडे देशातील कोरोना विषाणूचा फैलाव वाढत  असताना आता कोरोनावरून राजकारणही रंगू लागले आहे. कोरोनाचा अधिक धोका असलेल्या राज्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी   केंद्र सरकारने पथके पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पश्चिम बंगाल सरकारने केंद्र सरकारने केंद्राने पाठवलेल्या पथकाला कोरोनाबाधित क्षेत्राचा दौरा करण्यापासून रोखले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये पाहणी करण्यासाठी गेलेल्या पथकाला हॉटेलमधून बाहेर पडण्याची परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती या पथकातील एक सदस्याने दिली. या पथकाचे नेतृत्व करत असलेल्या अपूर्व चंद्रा यांनी सांगितले की, 'आम्हाला आज काही भागांचा दौरा करायचा आहे, असे आम्ही सांगितले होते. मात्र काही अडचणी आहेत. त्यामुळे आम्हाला बाहेर जाता येणार नाही असे प्रशासनाने कळवले.'

इतर राज्यात गेलेल्या केंद्राच्या पथकांना त्या राज्यांकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्या राज्यांना जी नोटीस देण्यात आली,  तीच नोटीस पश्चिम बंगालला देण्यात अली होती. दरम्यान, त्या पथकांना मात्र कुठलाही त्रास सहन करावा लागला नाही,' असा दावाही त्यांनी केला. 

केंद्र सरकारने चार राज्यात एकूण  सहा अंतर मंत्रालयीन केंद्रीय पथके पाठवली आहेत. ही पथके महाराष्ट्रातील पुणे, राजस्थानमधील जयपूर, पश्चिम बंगालमधील कोलकाता, हावडा, मिडणापूर पूर्व, 24 परगणा उत्तर,  दार्जिलिंग, कलिमपोंग, जलपैगुडी आणि मध्य प्रदेशमधील इंदूर येथे ही पथके पाठवण्यात आली आहेत.   या शहरांमध्ये परिस्थिती गंभीर असून, तिथे लॉकडाऊनचे योग्य पालन होत नसल्याचे केंद्राचे निरीक्षण आहे. तसेच राज्य सरकारकडून कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी करून सांगितली जात असल्याचाही दावा करण्यात आहे. विशेषकरून पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा कमी करून सांगण्यात येत असल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या अंतर्गत अहवालात नमूद करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालCentral Governmentकेंद्र सरकारMamata Banerjeeममता बॅनर्जी