शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय सैन्य सज्ज, संरक्षणमंत्र्यांना दिली माहिती; पाहा कशी केलीय तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 08:32 IST

यापूर्वी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेशन नमस्ते'ची सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी ९ हजारपेक्षा जास्त हॉस्पिटल बेडची व्यवस्था केली देशभरात लागणारं २५ टन मेडिकल साहित्य गेल्या ५ दिवसांत विविध ठिकाणी पोहचवलं आहेगरज भासल्यास सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ही सुविधा उपलब्ध करु शकतो

नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या १९०० च्या वर पोहचली आहे. तर ५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे जनरल बिपीन रावत यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी भारतीय सैन्याच्या तयारीचा आढावा सांगितला.

सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी सांगितले की, कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी ९ हजारपेक्षा जास्त हॉस्पिटल बेडची व्यवस्था केली आहे. ८ हजार ५०० हून अधिक डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. गरज भासल्यास सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ही सुविधा उपलब्ध करु शकतो. त्याचसोबत नेपाळला लवकरच कोरोनाशी लढण्यासाठी मदत पाठवली जाईल असंही ते म्हणाले.

तसेच देशभरात लागणारं २५ टन मेडिकल साहित्य गेल्या ५ दिवसांत विविध ठिकाणी पोहचवलं आहे. आगामी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी भारतीय वायू सेना आवश्यक ऑपरेशनल काम करेल असं भारतीय वायूसेनेचे चीफ एअर मार्शल यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी सैन्याच्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या ३० अधिकाऱ्यांना क्वारंटाईन केलं गेलं आहे.

यापूर्वी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेशन नमस्ते'ची सुरुवात केली आहे. लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी स्वतः याची घोषणा केली होती. देशात कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी लष्कराने एकूण आठ क्वारंटाइन सेंटर्स सुरू केली आहेत. ऑपरेशन नमस्तेची घोषणा करताना नरवणे म्हणाले होते की, या महामारी विरोधातील लढाईत सरकारला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. भूतकाळातही, अशा अनेक मोहिमा आपल्या लष्कराने यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ऑपरेशन नमस्तेही यशस्वीपणे पार पाडले जाईल.

...म्हणून जवानांनी दहा महिने सुट्टीच घेतली नव्हती

नरवणे म्हणाले होते, की अशा परिस्थितीत जवानांची सुट्टी रद्द केल्यास त्यांना वाईट वाटू शकते. याचा त्यांच्यावर परिणामही होऊ शकतो. मात्र, २००१-०२ साली ऑपरेशन पराक्रमदरम्यान लष्कराच्या जवानांनी जवळपास आठ ते दहा महिने सुट्टी घेतली नव्हती, याची आठवणी त्यांनी यावेळी करून दिली. देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नागरिकांनी गरज नसल्यास घराच्या बाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असंही मोदींनी सांगितलं होतं.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानcorona virusकोरोना वायरस बातम्याDefenceसंरक्षण विभागRajnath Singhराजनाथ सिंह