शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
4
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
5
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
6
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
7
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
8
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
9
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
10
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
11
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
12
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
13
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
14
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
15
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
16
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
17
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
18
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
19
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
20
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय सैन्य सज्ज, संरक्षणमंत्र्यांना दिली माहिती; पाहा कशी केलीय तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 08:32 IST

यापूर्वी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेशन नमस्ते'ची सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी ९ हजारपेक्षा जास्त हॉस्पिटल बेडची व्यवस्था केली देशभरात लागणारं २५ टन मेडिकल साहित्य गेल्या ५ दिवसांत विविध ठिकाणी पोहचवलं आहेगरज भासल्यास सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ही सुविधा उपलब्ध करु शकतो

नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या १९०० च्या वर पोहचली आहे. तर ५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे जनरल बिपीन रावत यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी भारतीय सैन्याच्या तयारीचा आढावा सांगितला.

सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी सांगितले की, कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी ९ हजारपेक्षा जास्त हॉस्पिटल बेडची व्यवस्था केली आहे. ८ हजार ५०० हून अधिक डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. गरज भासल्यास सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ही सुविधा उपलब्ध करु शकतो. त्याचसोबत नेपाळला लवकरच कोरोनाशी लढण्यासाठी मदत पाठवली जाईल असंही ते म्हणाले.

तसेच देशभरात लागणारं २५ टन मेडिकल साहित्य गेल्या ५ दिवसांत विविध ठिकाणी पोहचवलं आहे. आगामी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी भारतीय वायू सेना आवश्यक ऑपरेशनल काम करेल असं भारतीय वायूसेनेचे चीफ एअर मार्शल यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी सैन्याच्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या ३० अधिकाऱ्यांना क्वारंटाईन केलं गेलं आहे.

यापूर्वी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेशन नमस्ते'ची सुरुवात केली आहे. लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी स्वतः याची घोषणा केली होती. देशात कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी लष्कराने एकूण आठ क्वारंटाइन सेंटर्स सुरू केली आहेत. ऑपरेशन नमस्तेची घोषणा करताना नरवणे म्हणाले होते की, या महामारी विरोधातील लढाईत सरकारला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. भूतकाळातही, अशा अनेक मोहिमा आपल्या लष्कराने यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ऑपरेशन नमस्तेही यशस्वीपणे पार पाडले जाईल.

...म्हणून जवानांनी दहा महिने सुट्टीच घेतली नव्हती

नरवणे म्हणाले होते, की अशा परिस्थितीत जवानांची सुट्टी रद्द केल्यास त्यांना वाईट वाटू शकते. याचा त्यांच्यावर परिणामही होऊ शकतो. मात्र, २००१-०२ साली ऑपरेशन पराक्रमदरम्यान लष्कराच्या जवानांनी जवळपास आठ ते दहा महिने सुट्टी घेतली नव्हती, याची आठवणी त्यांनी यावेळी करून दिली. देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नागरिकांनी गरज नसल्यास घराच्या बाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असंही मोदींनी सांगितलं होतं.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानcorona virusकोरोना वायरस बातम्याDefenceसंरक्षण विभागRajnath Singhराजनाथ सिंह