शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय सैन्य सज्ज, संरक्षणमंत्र्यांना दिली माहिती; पाहा कशी केलीय तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 08:32 IST

यापूर्वी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेशन नमस्ते'ची सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी ९ हजारपेक्षा जास्त हॉस्पिटल बेडची व्यवस्था केली देशभरात लागणारं २५ टन मेडिकल साहित्य गेल्या ५ दिवसांत विविध ठिकाणी पोहचवलं आहेगरज भासल्यास सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ही सुविधा उपलब्ध करु शकतो

नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या १९०० च्या वर पोहचली आहे. तर ५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे जनरल बिपीन रावत यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी भारतीय सैन्याच्या तयारीचा आढावा सांगितला.

सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी सांगितले की, कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी ९ हजारपेक्षा जास्त हॉस्पिटल बेडची व्यवस्था केली आहे. ८ हजार ५०० हून अधिक डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. गरज भासल्यास सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ही सुविधा उपलब्ध करु शकतो. त्याचसोबत नेपाळला लवकरच कोरोनाशी लढण्यासाठी मदत पाठवली जाईल असंही ते म्हणाले.

तसेच देशभरात लागणारं २५ टन मेडिकल साहित्य गेल्या ५ दिवसांत विविध ठिकाणी पोहचवलं आहे. आगामी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी भारतीय वायू सेना आवश्यक ऑपरेशनल काम करेल असं भारतीय वायूसेनेचे चीफ एअर मार्शल यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी सैन्याच्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या ३० अधिकाऱ्यांना क्वारंटाईन केलं गेलं आहे.

यापूर्वी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेशन नमस्ते'ची सुरुवात केली आहे. लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी स्वतः याची घोषणा केली होती. देशात कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी लष्कराने एकूण आठ क्वारंटाइन सेंटर्स सुरू केली आहेत. ऑपरेशन नमस्तेची घोषणा करताना नरवणे म्हणाले होते की, या महामारी विरोधातील लढाईत सरकारला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. भूतकाळातही, अशा अनेक मोहिमा आपल्या लष्कराने यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ऑपरेशन नमस्तेही यशस्वीपणे पार पाडले जाईल.

...म्हणून जवानांनी दहा महिने सुट्टीच घेतली नव्हती

नरवणे म्हणाले होते, की अशा परिस्थितीत जवानांची सुट्टी रद्द केल्यास त्यांना वाईट वाटू शकते. याचा त्यांच्यावर परिणामही होऊ शकतो. मात्र, २००१-०२ साली ऑपरेशन पराक्रमदरम्यान लष्कराच्या जवानांनी जवळपास आठ ते दहा महिने सुट्टी घेतली नव्हती, याची आठवणी त्यांनी यावेळी करून दिली. देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नागरिकांनी गरज नसल्यास घराच्या बाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असंही मोदींनी सांगितलं होतं.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानcorona virusकोरोना वायरस बातम्याDefenceसंरक्षण विभागRajnath Singhराजनाथ सिंह