शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

coronavirus: 'त्या' पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल, कोरोनाग्रस्त असतानाही पत्रकार परिषदेत होती हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 11:48 IST

मध्य प्रदेशमध्ये २० मार्च रोजी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणाऱ्या या पत्रकारामुळे इतर पत्रकारांसह राजकीय नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशामधील भोपाळ शहरात राहणाऱ्या एका पत्रकाराच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्या पत्रकारालादेखील आता कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यात विशेष म्हणजे कोरोनाबाधित पत्रकार मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित होता. त्यामुळे पत्रकार परिषदेला उपस्थित राहणाऱ्या या पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लंडनमधून मायदेशी परतलेल्या मुलीला क्वारंटाईन करण्यात आले असतानाही, या पत्रकाराने पत्रकार परिषदेत उपस्थिती लावल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.  

मध्य प्रदेशमध्ये २० मार्च रोजी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणाऱ्या या पत्रकारामुळे इतर पत्रकारांसह राजकीय नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. देशभरात कोरोनाचे सावट असताना देखील मध्य प्रदेशामधील कमलनाथ सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत होते. या दरम्यान मध्य प्रदेशात विविध हालचालींना वेग आला होता. मात्र मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता टिकवण्यात अपयशी ठरली आणि भाजपाने बाजी मारली होती. याच सत्ता स्थापनेच्या वेळी कमलनाथ अनेकवेळा पत्रकारांशी संवाद साधत होते. कमलनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी एक भोपाळमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत केवळ भोपाळचेच नाही, तर दिल्लीतील काही पत्रकारही उपस्थित होते. त्यामुळे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह काही माजी मंत्री, राजकीय नेते आणि पत्रकारांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शुक्रवारी रात्री या पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आयपीसी कलम १८८, २६९, २७० अंतर्गत शामला पोलीस ठाण्यात या पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संसर्ग असताना निष्काळजीपणा, आघात रोगाचा संसर्ग परविण्यास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे भोपाळ पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी लोकांना रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर वाढता धोका लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ८७९ वर गेली आहे. तर आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान,काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानं कमलनाथ यांचं सरकार कोसळलं. बहुमत नसल्यानं कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या राजकीय नाट्यानंतर आज भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीJournalistपत्रकार