शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

Coronavirus: जे. पी नड्डा यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने घेतला ‘हा’ निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 13:36 IST

BJP: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत कोरोनामुळे आपण कोणतेही आंदोलन, धरणे, निदर्शने टाळावीत अशी सूचना केली होती

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका सर्व देशांना बसला आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे १४७ रुग्ण आढळून आले आहेत यातील सर्वाधिक ४२ रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे भारतात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत कोरोनामुळे आपण कोणतेही आंदोलन, धरणे, निदर्शने टाळावीत अशी सूचना केली होती. यानंतर भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पुढच्या 1 महिन्यासाठी पक्ष कोणत्याही आंदोलने, निदर्शनेत भाग घेणार नाही असं सांगितले आहे. याबाबतच्या सूचना सर्व राज्यातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

जर एखाद्या विषयावर भूमिका मांडायची असेल तर पक्षाचे ४ ते ५ पदाधिकारी संबंधित अधिकारी किंवा राजकीय नेते यांना निवेदन देतील, पण कोणत्याही परिस्थितीत लोक एकत्र जमणार नाहीत. याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.

समाजात जनजागृती करण्यासाठी आणि लोकांना काय करावे व काय करू नये हे सांगण्यासाठी भाजपाने  राज्य कार्यकारणीकडे कोरोना विषाणूबद्दल परिपत्रक जारी केले आहे. पंतप्रधानांनी सार्क नेत्यांशी चर्चा केली तेव्हा आपण जागरूक राहिले पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे पण घाबरू नका असे त्यांनी नमूद केले होते तसेच आवश्यक नसल्यास प्रवास न करण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केले आहे. तथापि, घाबरून जाण्याची गरज नाही, प्रत्येक स्तरावर पावले उचलली गेली आहेत आणि त्या पुढेही सुरू ठेवल्या जातील. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज थांबवण्याची मागणी करणाऱ्या खासदारांना खडे बोल सुनावले होते. खासदारांनी आपल्या जबाबदारीतून पळ काढू नये, अनेक जण मोठा धोका असतानाही कर्तव्य बजावत आहेत. मी जे ऐकतो आहे, ते योग्य नाही. खासदारांनी या महारोगराईशी लढण्यासाठी पुढे यायला हवं. भारतीय हवाई दल आणि एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सचा आपण विचार केला पाहिजे. जे लोक कोरोनाप्रभावित देशांतून भारतीयांना मायदेशात परत आणत आहेत. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसचाही विचार करायला हवा. तळागाळातीलही लोकांचाही विचार व्हायला हवा. अशा वेळी जर कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतल्यास काय होईल?, असा प्रश्नच मोदींनी उपस्थित खासदारांना विचारला होता.

 

टॅग्स :BJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या