शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: जे. पी नड्डा यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने घेतला ‘हा’ निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 13:36 IST

BJP: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत कोरोनामुळे आपण कोणतेही आंदोलन, धरणे, निदर्शने टाळावीत अशी सूचना केली होती

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका सर्व देशांना बसला आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे १४७ रुग्ण आढळून आले आहेत यातील सर्वाधिक ४२ रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे भारतात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत कोरोनामुळे आपण कोणतेही आंदोलन, धरणे, निदर्शने टाळावीत अशी सूचना केली होती. यानंतर भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पुढच्या 1 महिन्यासाठी पक्ष कोणत्याही आंदोलने, निदर्शनेत भाग घेणार नाही असं सांगितले आहे. याबाबतच्या सूचना सर्व राज्यातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

जर एखाद्या विषयावर भूमिका मांडायची असेल तर पक्षाचे ४ ते ५ पदाधिकारी संबंधित अधिकारी किंवा राजकीय नेते यांना निवेदन देतील, पण कोणत्याही परिस्थितीत लोक एकत्र जमणार नाहीत. याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.

समाजात जनजागृती करण्यासाठी आणि लोकांना काय करावे व काय करू नये हे सांगण्यासाठी भाजपाने  राज्य कार्यकारणीकडे कोरोना विषाणूबद्दल परिपत्रक जारी केले आहे. पंतप्रधानांनी सार्क नेत्यांशी चर्चा केली तेव्हा आपण जागरूक राहिले पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे पण घाबरू नका असे त्यांनी नमूद केले होते तसेच आवश्यक नसल्यास प्रवास न करण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केले आहे. तथापि, घाबरून जाण्याची गरज नाही, प्रत्येक स्तरावर पावले उचलली गेली आहेत आणि त्या पुढेही सुरू ठेवल्या जातील. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज थांबवण्याची मागणी करणाऱ्या खासदारांना खडे बोल सुनावले होते. खासदारांनी आपल्या जबाबदारीतून पळ काढू नये, अनेक जण मोठा धोका असतानाही कर्तव्य बजावत आहेत. मी जे ऐकतो आहे, ते योग्य नाही. खासदारांनी या महारोगराईशी लढण्यासाठी पुढे यायला हवं. भारतीय हवाई दल आणि एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सचा आपण विचार केला पाहिजे. जे लोक कोरोनाप्रभावित देशांतून भारतीयांना मायदेशात परत आणत आहेत. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसचाही विचार करायला हवा. तळागाळातीलही लोकांचाही विचार व्हायला हवा. अशा वेळी जर कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतल्यास काय होईल?, असा प्रश्नच मोदींनी उपस्थित खासदारांना विचारला होता.

 

टॅग्स :BJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या