शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोना चाचण्यांत बिहार सर्वात पिछाडीवर; १० लाखांमागे २८१ चाचण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 05:16 IST

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशात गतीने चाचण्या व्हाव्यात, केंद्र सरकारने केली सूचना   

नवी दिल्ली : कोरोनाच्या चाचण्या करण्यात बिहार सर्वात पिछाडीवर असून दहा लाख लोकांमागे येथे केवळ २८१ चाचण्या होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. बिहारमध्ये १० मेपर्यंत कोरोनाच्या ३४,१५० चाचण्या झाल्या आहेत. या प्रकरणी केंद्र सरकारने दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर आता लक्षणे नसलेल्या लोकांचीही चाचणी होऊ शकेल. अर्थात, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे म्हणणे आहे की, राज्यात केवळ ६२९ कोरोना रुग्ण आहेत. हा डेटा आयसीएमआर आणि सरकारी एजन्सींकडून जारी करण्यात आला होता.केंद्रीय गृहमंत्रालयासोबतच्या संघर्षामुळे पश्चिम बंगाल सध्या चर्चेत आहे. मात्र, चाचण्यांच्या बाबतीत त्यांची कामगिरी बिहारपेक्षा चांगली आहे. दर दहा लाखांमागे त्यांचे चाचण्यांचे प्रमाण ४०३ एवढे आहे. केंद्रातील आरोग्य विभागाला असे वाटते की, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये गतीने चाचण्या व्हायला हव्यात. कारण, राज्यात जे लाखो कामगार येत आहेत त्यामुळे हे संकट आणखी गडद होणार आहे. मीडिया महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि आंध्रप्रदेशवर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. या राज्यात रुग्णांची अधिक संख्या आहे. कारण, ही राज्ये मोठ्या संख्येने चाचण्या करत आहेत. पीएमकडून नियुक्त टास्क फोर्सशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जर बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल यांनी चाचण्या वाढविल्या नाहीत तर, कोरोनाविरुद्धच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाईल.कामगारांच्या प्रवेशाला आधी विरोधच्बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सुरुवातीला कामगारांच्या राज्यातील प्रवेशाला विरोध केला आणि नंतर त्यांना प्रवेशाची परवानगी दिली. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही रेल्वेंना राज्यात येऊ देण्यास परवानगी दिली.च्या राज्यांनी आपल्या लोकांना स्वीकारावे यासाठी त्यांना तयार करण्यात पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना खूप वेळ लागला. कारण, या स्थलांतरीत लोकांनी क्वारंटाइनचा वेळ पूर्ण केलेला आहे. त्यामुळेच लक्षणे नसलेल्या लोकांची तपासणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतBiharबिहार