शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

coronavirus: कोरोना चाचण्यांत बिहार सर्वात पिछाडीवर; १० लाखांमागे २८१ चाचण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 05:16 IST

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशात गतीने चाचण्या व्हाव्यात, केंद्र सरकारने केली सूचना   

नवी दिल्ली : कोरोनाच्या चाचण्या करण्यात बिहार सर्वात पिछाडीवर असून दहा लाख लोकांमागे येथे केवळ २८१ चाचण्या होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. बिहारमध्ये १० मेपर्यंत कोरोनाच्या ३४,१५० चाचण्या झाल्या आहेत. या प्रकरणी केंद्र सरकारने दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर आता लक्षणे नसलेल्या लोकांचीही चाचणी होऊ शकेल. अर्थात, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे म्हणणे आहे की, राज्यात केवळ ६२९ कोरोना रुग्ण आहेत. हा डेटा आयसीएमआर आणि सरकारी एजन्सींकडून जारी करण्यात आला होता.केंद्रीय गृहमंत्रालयासोबतच्या संघर्षामुळे पश्चिम बंगाल सध्या चर्चेत आहे. मात्र, चाचण्यांच्या बाबतीत त्यांची कामगिरी बिहारपेक्षा चांगली आहे. दर दहा लाखांमागे त्यांचे चाचण्यांचे प्रमाण ४०३ एवढे आहे. केंद्रातील आरोग्य विभागाला असे वाटते की, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये गतीने चाचण्या व्हायला हव्यात. कारण, राज्यात जे लाखो कामगार येत आहेत त्यामुळे हे संकट आणखी गडद होणार आहे. मीडिया महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि आंध्रप्रदेशवर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. या राज्यात रुग्णांची अधिक संख्या आहे. कारण, ही राज्ये मोठ्या संख्येने चाचण्या करत आहेत. पीएमकडून नियुक्त टास्क फोर्सशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जर बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल यांनी चाचण्या वाढविल्या नाहीत तर, कोरोनाविरुद्धच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाईल.कामगारांच्या प्रवेशाला आधी विरोधच्बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सुरुवातीला कामगारांच्या राज्यातील प्रवेशाला विरोध केला आणि नंतर त्यांना प्रवेशाची परवानगी दिली. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही रेल्वेंना राज्यात येऊ देण्यास परवानगी दिली.च्या राज्यांनी आपल्या लोकांना स्वीकारावे यासाठी त्यांना तयार करण्यात पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना खूप वेळ लागला. कारण, या स्थलांतरीत लोकांनी क्वारंटाइनचा वेळ पूर्ण केलेला आहे. त्यामुळेच लक्षणे नसलेल्या लोकांची तपासणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतBiharबिहार