शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: किमान ६ महिने सतर्क राहणं गरजेचे; कोरोनाबाबत नवीन इशाऱ्यानं चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 09:58 IST

मास्क लावणं गरजेचे आहे. ज्यांनी बूस्टर डोस घेतला नाही त्यांनी तो तात्काळ घ्यावा.

नवी दिल्ली – देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत हळूहळू घट होत असल्याचं दिसून येत आहे. लोकांमध्ये कोरोनाबाबत काही प्रमाणात दहशत कमी झाली आहे. कोरोना संपुष्टात येण्याची ही चिन्हे आहेत का? यावर प्रतिक्रिया देताना आपल्याला किमान ६ महिने खूप सतर्क राहणं गरजेचे आहे असं कोविड वर्किंग ग्रुपचे प्रमुख एन के अरोडा यांनी म्हटलं आहे. अद्याप कोरोना गेला नाही. लोकांनी लसीकरण करणं आवश्यक आहे. शाळा बंद करण्याची गरज नाही त्यामुळे नुकसान आहे असं त्यांनी सांगितले आहे.

एन के अरोडा म्हणाले की, कोरोना महामारी पूर्णपणे संपुष्टात आली नाही. जगातील अनेक देश असे आहेत ज्याठिकाणी दिवसाला १ लाखाहून अधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. भारतातही रोज कोरोना रुग्णसंख्या समोर येत आहे. ज्यांना याआधीच एखादा आजार असेल आणि त्यांना कोरोना झाला तर तो जीवघेणा ठरू शकतो असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत कोरोनापासून वाचण्यासाठी आपल्याला गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून टाळलं पाहिजे. मास्क लावणं गरजेचे आहे. ज्यांनी बूस्टर डोस घेतला नाही त्यांनी तो तात्काळ घ्यावा. मुलांना कोरोनाची लस द्या हे उपाय असल्याचं ते म्हणाले. इकोनॉमिक्स टाइम्सनं त्यांची मुलाखत घेतली.

देशात ओमायक्रॉनचे सब व्हेरिएंट B.4 आणि B.5 दोन आठवड्यापूर्वीच आढळले आहेत. जे या व्हेरिएंटने संक्रमित आहेत त्यांना आयसोलेट केले आहे. जगभरात कुठेही कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला तर तो भारतातही मिळणे निश्चित आहे. या व्हेरिएंट संक्रमणावर लक्ष ठेवणं हे महत्त्वाचे आहे. अद्याप कोरोना गेला नाही. कोरोनाबाबत सतर्क राहणं गरजेचे आहे. जोपर्यंत कोरोना संपुष्टात येत नाही तोवर काळजी घेणं महत्त्वाचे आहे. आपल्याला कुठल्याही संकटाला सामोरं जाण्यासाठी सातत्याने या परिस्थितीवर नियंत्रण ठेवायला हवं असं एन के अरोडा यांनी म्हटलं.

दरम्यान, कार्यालयात १०० टक्के क्षमतेने उपस्थिती ठेवण्याची परवानगी देण्यापूर्वी सतर्क होऊन विचार करावा लागेल. आपल्याला दैनंदिन कामे करण्याचा प्रयत्न करायला हवा परंतु सर्वप्रकारे काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. शाळा कुठल्याही किंमतीत बंद व्हायला नको. जर शाळा बंद झाल्या तर त्याचे इतर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतील. शाळा बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही एन. के अरोडा यांनी म्हटलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या