शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

coronavirus : या राज्यात लॉकडाऊन मोडणाऱ्या तब्बल 78 हजार जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 13:30 IST

लॉकडाऊनचा निम्मा कालावधी पूर्ण होत आला तरी अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे सतत उल्लंघन होताना दिसत आहे

ठळक मुद्देलॉकडाऊनचा निम्मा कालावधी पूर्ण होत आला तरी अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे सतत उल्लंघन तामिळनाडूमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात आतापर्यंत 78 हजार 707 जणांना अटक, 59 हजार 868 वाहने जप्त

चेन्नई - जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाचा देशातील प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनचा निम्मा कालावधी पूर्ण होत आला तरी अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे उल्लंघन होताना दिसत आहेत. दरम्यान, तामिळनाडूमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये कोरोनाबधित रुग्णांचा आकडा आटोक्यात होता. दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये तामिळनाडूतील रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. तामिळनाडूत आतापर्यंत कोरोनाचे 485 रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे तामिळनाडू सरकार आणि प्रशासनाकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत.त्याचाच एक भाग म्हणून तामिळनाडूमध्ये लॉकडाऊन तोडल्याप्रकरणी आतापर्यंत 78 हजार 707 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 59 हजार 868 वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्याबरोबरच लॉकडाऊन तोडल्याप्रकरणी 71 हजार 204 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

दरम्यान, जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचा कहर भारतातही पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3500 च्या वर पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून,  योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा सर्वाधिक धोका हा 21 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांना असल्याची माहिती समोर आली आहे.

देशातील कोरोना बाधितांमध्ये 21 ते 40 वर्षे वयोगटातील सर्वाधिक 42 टक्के रूग्ण असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. प्रत्येकी 100 पैकी 42 रूग्ण या वयोगटातील आहेत. सर्वात कमी धोका 0 ते 20 वर्षे वयोगटातील लोकांना आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले. 41 ते 60 वयोगटातील रूग्ण 33 टक्के तर 60 पेक्षा जास्त वय असलेले रूग्ण 17 टक्के आहेत.मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांना कोणता ना कोणता आजार होता. त्यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसन विकार, किडनीशी संबधित आजार असल्याचे निष्पन्न झाले, असेही अगरवाल म्हणाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTamilnaduतामिळनाडूArrestअटक