शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

coronavirus : या राज्यात लॉकडाऊन मोडणाऱ्या तब्बल 78 हजार जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 13:30 IST

लॉकडाऊनचा निम्मा कालावधी पूर्ण होत आला तरी अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे सतत उल्लंघन होताना दिसत आहे

ठळक मुद्देलॉकडाऊनचा निम्मा कालावधी पूर्ण होत आला तरी अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे सतत उल्लंघन तामिळनाडूमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात आतापर्यंत 78 हजार 707 जणांना अटक, 59 हजार 868 वाहने जप्त

चेन्नई - जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाचा देशातील प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनचा निम्मा कालावधी पूर्ण होत आला तरी अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे उल्लंघन होताना दिसत आहेत. दरम्यान, तामिळनाडूमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये कोरोनाबधित रुग्णांचा आकडा आटोक्यात होता. दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये तामिळनाडूतील रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. तामिळनाडूत आतापर्यंत कोरोनाचे 485 रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे तामिळनाडू सरकार आणि प्रशासनाकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत.त्याचाच एक भाग म्हणून तामिळनाडूमध्ये लॉकडाऊन तोडल्याप्रकरणी आतापर्यंत 78 हजार 707 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 59 हजार 868 वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्याबरोबरच लॉकडाऊन तोडल्याप्रकरणी 71 हजार 204 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

दरम्यान, जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचा कहर भारतातही पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3500 च्या वर पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून,  योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा सर्वाधिक धोका हा 21 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांना असल्याची माहिती समोर आली आहे.

देशातील कोरोना बाधितांमध्ये 21 ते 40 वर्षे वयोगटातील सर्वाधिक 42 टक्के रूग्ण असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. प्रत्येकी 100 पैकी 42 रूग्ण या वयोगटातील आहेत. सर्वात कमी धोका 0 ते 20 वर्षे वयोगटातील लोकांना आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले. 41 ते 60 वयोगटातील रूग्ण 33 टक्के तर 60 पेक्षा जास्त वय असलेले रूग्ण 17 टक्के आहेत.मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांना कोणता ना कोणता आजार होता. त्यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसन विकार, किडनीशी संबधित आजार असल्याचे निष्पन्न झाले, असेही अगरवाल म्हणाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTamilnaduतामिळनाडूArrestअटक