शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Coronavirus : ‘जनता कर्फ्यू’मध्ये विमान कंपन्याही होणार सहभागी, एक हजारांहून अधिक उड्डाणे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 07:06 IST

Coronavirus : जनता कर्फ्यूच्या काळात विमान कंपन्यांनी एक हजारांहून अधिक उड्डाणे बंद ठेवण्याचे ठरविले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाची देशभर लागण होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या, रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर रेल्वेने जशा दूरपल्ल्याच्या सर्व गाड्या रद्द केल्या आहेत, तसेच विमान कंपन्यांनी रविवारी अनेक उड्डाणेही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.जनता कर्फ्यू सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत असेल. या काळात रेल्वेची कोणतीही नवी गाडी कुठूनही निघणार नाही. ज्या गाड्या आधीच निघाल्या आहेत, त्या मात्र ठरलेल्या स्थानी पोहोचतील. त्यामुळे गाड्यांमधील प्रवाशांना मध्येच अडकून राहावे लागणार नाही. रेल्वेने दूर पल्ल्याच्या ४ हजार गाड्या रद्द केल्या आहे. आम्ही जनता कर्फ्यूच्या काळात नवी गाडी सोडणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.जनता कर्फ्यूच्या काळात विमान कंपन्यांनी एक हजारांहून अधिक उड्डाणे बंद ठेवण्याचे ठरविले आहे. इंडिगो आणि गोएअर या विमान कंपन्यांची एक हजारांहून अधिक विमाने या काळात जमिनीवरच असतील. गोएअरने म्हटले आहे की, रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत आमचे एकही विमान उड्डाण करणार नाही. इंडिगोने सरसकट उड्डाणे बंद केलेली नाहीत. मात्र इंडिगोची नेहमीपेक्षा ६0 टक्के विमानेच उद्या उड्डाण करतील. याचाच अर्थ कर्फ्यूच्या आधी वा नंतर या कंपनीची विमाने सुरू राहतील.पैसे परत करणार?इतकी उड्डाणे रद्द करण्यात आली असली तरी त्याची आधीच तिकिटे काढलेल्या प्रवाशांना पैसे परत करणार, की नंतर त्याच तिकिटाने प्रवास करता येईल, हे विमान कंपन्यांनी स्पष्ट केलेले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या