शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

CoronaVirus: “वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही; कडक लॉकडाऊन अनिवार्य”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 17:26 IST

CoronaVirus: वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही. कडक लॉकडाऊन अनिवार्य आहे, असे म्हटले जात आहे.

ठळक मुद्देवीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही; कडक लॉकडाऊन अनिवार्यरुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आवश्यकतरच रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता - डॉ. गुलेरिया

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स, कोरोना लसीची कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे मृत्यू होत आहे. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही. कडक लॉकडाऊन अनिवार्य आहे, असे म्हटले जात आहे. (coronavirus aiims randeep guleria says that centre should impose strict lockdown in country)

कोरोना विषाणू असाच पुढे पसरत राहिला आणि नव्या स्ट्रेनने रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देणारी कार्यपद्धती विकसित केल्यास देशात तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा गुलेरिया यांनी यावेळी दिला. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी देशातील सद्यस्थितीबाबत भीती व्यक्त केली आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि नियंत्रणासाठी नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन उपयोगी नसून, कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता आहे, असे गुलेरिया यांनी स्पष्ट केले.

कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव, गाफीलपणा भोवला; रघुराम राजन केंद्रावर संतापले

रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा 

देशात आताच्या घडीला रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे. आक्रमक कार्यपद्धती स्वीकारून रुग्णसंख्या कमी करणे आणि मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन करणे या तीन गोष्टींवर सर्वाधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे गुलेरियांनी यांनी सांगितले. आपण माणसामाणसांतील संपर्क टाळू शकलो, तर रुग्णसंख्या कमी होऊ शकते, असेही गुलेरिया यांनी नमूद केले. 

संकटात दिलासा! RIL च्या नफ्यात वाढ; २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना देणार बोनस

तर रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता

भारतात युकेप्रमाणेच लॉकडाऊन लागू करावा लागेल. माणसाचं जीवन आणि त्याचा उदरनिर्वाह याची नीटपणे हाताळणी करण्यासंदर्भातील हा मुद्दा आहे. दररोज मजूरी करून पोट भरणाऱ्याचाही मुद्दा आहे. पण, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडकडीत लॉकडाऊन आवश्यक आहे, असे गुलेरिया म्हणाले. 

महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, ‘तोपर्यंत’ धोका नाही; राष्ट्रवादी नेत्याचा दावा

दरम्यान, महाराष्ट्रासह दिल्ली, छत्तीसगढ, पंजाब, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दमण आणि दिव, लक्षद्वीप आणि लडाख या ठिकाणी गेल्या १५ दिवसांमध्ये रुग्णसंख्या घटतांना दिसत आहे. महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्येही केरोना रुग्णांचा आलेख सपाट होत असून, या राज्यांमध्ये लवकरच नव्या रुग्णांचा आलेख घटतांना दिसू शकेल, अशी आशा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार