शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

CoronaVirus: ८० कोटी गरिबांना प्रत्येकी ५ किलो मोफत अन्नधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 06:22 IST

CoronaVirus: केंद्राचा मदतीचा हात; मे, जूनसाठी योजना. अशाच प्रकारची मदत केंद्र सरकारतर्फे गेल्या वर्षीही गरीब कुटुंबांना करण्यात आली होती.  

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविल्याने नागरिकांचे जीणे असह्य बनले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील ८० कोटी गरीब जनतेला मे व जून महिन्यात मोफत अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. प्रत्येक लाभार्थीला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून दरमहा ५ किलो अन्नधान्य मोफत देण्यात येईल.

यासंदर्भात केंद्र सरकारने निवेदनात म्हटले आहे की, ८० कोटी लोकांना दोन महिने मोफत अन्नधान्य देण्यासाठी २६ हजार कोटींपेक्षा जास्त निधी खर्च होणार आहे. अशाच प्रकारची मदत केंद्र सरकारतर्फे गेल्या वर्षीही गरीब कुटुंबांना करण्यात आली होती.  

केंद्रीय अन्न मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीने अर्थव्यवस्थेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचा फटका देशातील गरीब तसेच गरजू लोकांना बसत आहे. त्यांचे होणारे हाल कमी करण्यासाठी मे व जून महिन्यात गरीब लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या योजनेच्या लाभार्थींना तांदूळ, गहू यासारखे ५ किलो धान्य पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना देशातील गरिबांना पोटाला पुरेल इतके पौष्टिक अन्न मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातूनच मोफत अन्नधान्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मोदी सरकारने म्हटले आहे.

पुनरावृत्ती नकोn कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक घातक आहे. त्यामुळे अनेक राज्यांत निर्बंधांमुळे उद्योग व्यवसायावरही विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे रोजगार गमावल्याने गरिबांचे हाल होत आहेत. n पहिल्या लाटेत स्थलांतरित मजुरांना भोगाव्या लागलेल्या हालअपेष्टांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनही आम्ही सतर्क आहोत, असा मोदी सरकारचा दावा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार