शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ८० कोटी गरिबांना प्रत्येकी ५ किलो मोफत अन्नधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 06:22 IST

CoronaVirus: केंद्राचा मदतीचा हात; मे, जूनसाठी योजना. अशाच प्रकारची मदत केंद्र सरकारतर्फे गेल्या वर्षीही गरीब कुटुंबांना करण्यात आली होती.  

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविल्याने नागरिकांचे जीणे असह्य बनले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील ८० कोटी गरीब जनतेला मे व जून महिन्यात मोफत अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. प्रत्येक लाभार्थीला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून दरमहा ५ किलो अन्नधान्य मोफत देण्यात येईल.

यासंदर्भात केंद्र सरकारने निवेदनात म्हटले आहे की, ८० कोटी लोकांना दोन महिने मोफत अन्नधान्य देण्यासाठी २६ हजार कोटींपेक्षा जास्त निधी खर्च होणार आहे. अशाच प्रकारची मदत केंद्र सरकारतर्फे गेल्या वर्षीही गरीब कुटुंबांना करण्यात आली होती.  

केंद्रीय अन्न मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीने अर्थव्यवस्थेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचा फटका देशातील गरीब तसेच गरजू लोकांना बसत आहे. त्यांचे होणारे हाल कमी करण्यासाठी मे व जून महिन्यात गरीब लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या योजनेच्या लाभार्थींना तांदूळ, गहू यासारखे ५ किलो धान्य पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना देशातील गरिबांना पोटाला पुरेल इतके पौष्टिक अन्न मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातूनच मोफत अन्नधान्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मोदी सरकारने म्हटले आहे.

पुनरावृत्ती नकोn कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक घातक आहे. त्यामुळे अनेक राज्यांत निर्बंधांमुळे उद्योग व्यवसायावरही विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे रोजगार गमावल्याने गरिबांचे हाल होत आहेत. n पहिल्या लाटेत स्थलांतरित मजुरांना भोगाव्या लागलेल्या हालअपेष्टांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनही आम्ही सतर्क आहोत, असा मोदी सरकारचा दावा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार