शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

Coronavirus:  दिल्लीत कोविड -१९ रुग्णांच्या दुरुस्तीचे प्रमाण ६७ टक्के! अफवांवर विश्वास ठेवू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 01:15 IST

गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचा वेग थोडाफार कमी झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळपर्यंत देशात १८ हजार ६५३ कोरोनाबाधितांची भर पडली.

नवी दिल्ली : दिल्लीत कोविड-१९ च्या रुग्णांच्या दुरुस्तीचे प्रमाण ६७ टक्के आहे. ही अत्यंत समाधानकारक बाब असली तरी समाजमाध्यमांवर ज्या पोस्ट फिरत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका; अन्यथा पुन्हा रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असेल, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.

केजरीवाल म्हणाले जूनअखेर दिल्लीत रुग्णांची संख्या एक लाखावर जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु कोविड-१९ चा प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण यंत्रणेने उत्तम काम केले. दिल्लीतील लोकांनी नियम पाळले. त्यामुळे ही वाढ थोपविता आली. जूनअखेर दिल्लीत ८७ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील ५८ हजार रुग्ण दुरुस्त झालेत. दिल्लीत रुग्ण दुरुस्तीची टक्केवारी ही ६७ टक्के होती. दिल्लीत पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ही केवळ २६ हजार आहे. जूनअखेर ६० हजार रुग्ण पॉझिटिव्ह असतील, असा अंदाज होता. दिल्लीत रुग्णांंच्या मृत्यूची आकडेवारी घसरली आहे. दररोज ६० ते ६५ रुग्ण दगावतात. हा आकडा १२५ पर्यंत पोहोचला होता, याकडेही केजरीवाल यांनी लक्ष वेधले.

दिल्लीत कोरोनाचे रुग्ण आधीच्या तुलनेत कमी होत आहेत. त्यामुळे आता कोरोना परतीच्या मार्गावर आहे, असे काही मान्यवर लोकांकडून समाजमाध्यमांमध्ये पोस्ट टाकल्या जात आहेत. या पोस्टमुळे लोक नियमांचे पालन करणार नाहीत. त्यामुळे दिल्लीतील स्थिती आधीसारखीच होऊ शकते. त्यामुळे अशा पोस्टवर विश्वास ठेवू नका व नियमांचे पालन करा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासांत उच्चांकी ५०७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या त्यामुळे साडेसतरा हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १३ हजार १५७ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ५ लाख ८५ हजार ४९३ झाली आहे.गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचा वेग थोडाफार कमी झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळपर्यंत देशात १८ हजार ६५३ कोरोनाबाधितांची भर पडली. यातील ३ लाख ४७ हजार ९७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर २ लाख २० हजार ११४ रुग्णांवर देशातील विविध रुग्णांलयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १७ हजार ४०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल