शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus:  दिल्लीत कोविड -१९ रुग्णांच्या दुरुस्तीचे प्रमाण ६७ टक्के! अफवांवर विश्वास ठेवू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 01:15 IST

गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचा वेग थोडाफार कमी झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळपर्यंत देशात १८ हजार ६५३ कोरोनाबाधितांची भर पडली.

नवी दिल्ली : दिल्लीत कोविड-१९ च्या रुग्णांच्या दुरुस्तीचे प्रमाण ६७ टक्के आहे. ही अत्यंत समाधानकारक बाब असली तरी समाजमाध्यमांवर ज्या पोस्ट फिरत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका; अन्यथा पुन्हा रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असेल, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.

केजरीवाल म्हणाले जूनअखेर दिल्लीत रुग्णांची संख्या एक लाखावर जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु कोविड-१९ चा प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण यंत्रणेने उत्तम काम केले. दिल्लीतील लोकांनी नियम पाळले. त्यामुळे ही वाढ थोपविता आली. जूनअखेर दिल्लीत ८७ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील ५८ हजार रुग्ण दुरुस्त झालेत. दिल्लीत रुग्ण दुरुस्तीची टक्केवारी ही ६७ टक्के होती. दिल्लीत पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ही केवळ २६ हजार आहे. जूनअखेर ६० हजार रुग्ण पॉझिटिव्ह असतील, असा अंदाज होता. दिल्लीत रुग्णांंच्या मृत्यूची आकडेवारी घसरली आहे. दररोज ६० ते ६५ रुग्ण दगावतात. हा आकडा १२५ पर्यंत पोहोचला होता, याकडेही केजरीवाल यांनी लक्ष वेधले.

दिल्लीत कोरोनाचे रुग्ण आधीच्या तुलनेत कमी होत आहेत. त्यामुळे आता कोरोना परतीच्या मार्गावर आहे, असे काही मान्यवर लोकांकडून समाजमाध्यमांमध्ये पोस्ट टाकल्या जात आहेत. या पोस्टमुळे लोक नियमांचे पालन करणार नाहीत. त्यामुळे दिल्लीतील स्थिती आधीसारखीच होऊ शकते. त्यामुळे अशा पोस्टवर विश्वास ठेवू नका व नियमांचे पालन करा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासांत उच्चांकी ५०७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या त्यामुळे साडेसतरा हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १३ हजार १५७ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ५ लाख ८५ हजार ४९३ झाली आहे.गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचा वेग थोडाफार कमी झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळपर्यंत देशात १८ हजार ६५३ कोरोनाबाधितांची भर पडली. यातील ३ लाख ४७ हजार ९७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर २ लाख २० हजार ११४ रुग्णांवर देशातील विविध रुग्णांलयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १७ हजार ४०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल