शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

CoronaVirus ४० कोटी कामगार दारिद्र्याच्या खाईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 05:19 IST

असंघटीत कामगार : आयएलओला चिंता

जीनिव्हा : आधीच हातावर पोट असलेले भारतीय अर्थव्यवस्थेच्या असंघटित क्षेत्रांमधील सुमारे ४० कोटी मजूर व कामगार सध्याच्या कोरोना संकटामुळे आणखी दारिद्र्याच्या खाईत लोटले जातील, अशी चिंता संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) व्यक्त केली आहे.कोरोनामुळे सुरु असलेल्या प्रदीर्घ ‘लॉकडाऊन’मुळे जगभरातील सुमारे २.७ अब्ज हंगीमा कामगारांची रोजीरोटी बंद झाल्याचा अंदाज संघटनेने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात वर्तविला. भारत, नायजेरिया व ब्राझिलमधील कामगारांना याची सर्वाधिक झळ पोहोचली आहे. भारतात एकूण श्रमशक्तीच्या ९० टक्के हिस्सा असंघटित कामगारांचा असून, सरकारने काही मदतीचे उपाय योजले नाहीत तर असे सुमारे ४० कोटी कामगार आणखी दारिद्र्याच्या खाईत लोटले जाऊन त्यांच्यापुढे कुटुंबाचे पोट भरण्याची गंभीर भ्रांत निर्माण होऊ शकेल. (वृत्तसंस्था)संघटना म्हणते : ही महामारी आधीच्या ठिकाणी अधिक तीव्र होऊन नव्या देशांमधये पसरत चालल्याने जगभरातील एकूण श्रमशक्तीच्या ८१ टक्के म्हणजे २.७ कोटी कामगार - कर्मचाऱ्यांच्या चरितार्थास फटका बसला आहे. अनेक देशांमध्ये ‘लॉकडाऊन’ व अन्य निर्बंध दीर्घकाळ असेच सुरु राहिले तर चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्पादक श्रमतासांमध्ये सुमारे ६.७ टक्क्यांनी घट होईल. असे होणे म्हणजे पूर्णवेळ कामधंदा असलेल्या १.९५ कोटी लोकांनी रिकामे घरी बसण्यासारखे आहे.अहवाल म्हणतो : विविध देशांमधील ‘लॉकडाऊन’मुळे जे उद्योग बंद किंवा अर्धवट क्षमतेने चालत आहेत व जेथे कामगार कपातीची शक्यता आहे अशा उद्योगांमध्ये जगातील एकूण श्रमशक्तीच्या ३८ टक्केम्हणजे सुमारे १.२५ अब्ज कामगार-कर्मचारी आहेत. रिटेल व्यापार, कारखानदारी, घरबांधणी, कॅटरिंग व अन्नपुरवठा, वाहतूक आणि आदरातिथ्य या उद्योगांना सर्वाधिक झळ पोहोचली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या