शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Coronavirus: देशभरात दिवसात ३,९०० रुग्ण; १९५ मृत्यू; आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 03:46 IST

वेळेत रुग्ण शोधणे, त्यांचे संपर्क तपासणे, त्या सर्वांना क्वारंटाइन करून उपचार सुरू करणे हाच कोरोनाविरोधातील सर्वांत प्रभावी मार्ग आहे

नवी दिल्ली : देशभरात गेल्या चोवीस तासांत ३,९०० नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंतची ही दिवसभरातील सर्वाधिक आकडेवारी असल्याने केंद्र सरकारची चिंता आणखी वाढली आहे. याशिवाय दिवसभरात कोरोनाग्रस्त १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.असे असले तरी काही राज्यांकडून रुग्ण व मृत्यू होणाऱ्यांची माहिती देण्यास विलंब होत असल्याने हा आकडा वाढलेला दिसतो, असे मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले. काही भागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. जिथे रुग्ण जास्त आहेत तेथे मृत्यूदरही जास्त होण्याची भीती आहे. मात्र, तूर्त भारतात कोरोनाचा प्रसार मर्यादित असल्याचा पुनरुच्चार अगरवाल यांनी केला.

सकारात्मक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सर्वाधिक २७.४ टक्क्यांवर पोहोचले आहे. दिवसभरातील आकडेवारी देताना अगरवाल म्हणाले, अनेक राज्यांकडून माहिती येण्यास विलंब होतो. त्यामुळे एकाच दिवशी हा आकडा जास्त दिसतो. रुग्ण दुप्पट होण्याचे सरासरी प्रमाण मात्र कमी होत आहे. आधी ३.४ दिवसांमध्ये रुग्णसंखा दुप्पट व्हायची. लॉकडाउनमुळे हा दर आता १२ दिवसांवर आला आहे.

वेळेत रुग्ण शोधणे, त्यांचे संपर्क तपासणे, त्या सर्वांना क्वारंटाइन करून उपचार सुरू करणे हाच कोरोनाविरोधातील सर्वांत प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे राज्यांनी याकडे लक्ष द्यावे. रुग्ण आढळणे, त्याचे संपर्क तपासणे व उपचार सुरू करणे यात काही राज्यांमध्ये जास्त वेळ लागत असून, तो कमी करायला हवा, अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने राज्यांना केली आहे. देशात सध्या ३२,१३८ रुग्णांवर उपचार सुरू असून १४,१४२ जण ठणठणीत बरे झाले आहेत. त्यापैकी १,०२० सोमवारी घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लॉकडाउनच्या तिसºया टप्प्यात सर्वाधिक २७.४१ वर पोहोचले आहे.मायदेशी आणण्याची सेवा सशुल्कपरदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. ही सेवा सशुल्क असेल. परदेशातून येणाºया भारतीयांना १४ दिवसदेखील सशुल्क क्वारंटाइन करावेच लागेल. अशांची कोराना चाचणी होईल. क्वारंटाइन पूर्ण झाल्यावर पुन्हा चाचणी होईल. राज्य सरकारांशीदेखील यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.मजुरांसाठी धावली रेल्वेकामगार दिनापासून देशभरात ६२ विशेष रेल्वे गाड्यांमधून ७० हजारांवर स्थलांतरित मजूर स्वगृही परतले. मंगळवारी मजुरांसाठी १३ विशेष श्रमिक रेल्वे गाड्या धावल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.नवी कार्यसंस्कृतीकेंद्रीय गृह मंत्रालयाने तिसºया लॉकडाउनमध्ये दिलेल्या सवलतींवर पुन्हा स्पष्टीकरण दिले. कार्यालयांमध्ये कमी उपस्थिती, फेस मास्क, दोन फूट अंतर, आरोग्य सेतू अ‍ॅप व फिजिकल डिस्टन्सिंगला पर्याय नाही, असे संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव म्हणाल्या. खासगी कार्यालयांमध्ये एकाच वेळी जेवणाची सुटी नको. दोन वेळा ठरवाव्यात. कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर व स्क्रीनिंग सक्तीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.जगातही चढता आलेखजगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ३६ लाख ९८ हजारांवर गेली असून, मृतांचा आकडाही २ लाख ५६ हजार २४० पर्यंत गेला आहे. त्यात अमेरिकेतील ७० हजार मृतांचा समावेश आहे. ब्रिटनमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, तिथे आतापर्यंत २९ हजार जण मरण पावले आहेत.स्पेन, इटली आणि फ्रान्समध्येही मृतांची संख्या २५ हजारांहून अधिक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या