शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

Coronavirus: देशात एकाच दिवशी १.६१ लाख चाचण्या; महाराष्ट्रात आतापर्यंत २ लाखांहून जास्त चाचणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 01:02 IST

शुक्रवारचा असाही विक्रम : महाराष्ट्रात दर दहा लाखांमागे सर्वाधिक रुग्ण; देशाने केल्या १५ लाख चाचण्या

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्याने ८ मेपर्यंत कोरोना विषाणूच्या दोन लाखांपेक्षा जास्त चाचण्या करून नवा विक्रम स्थापन केला. देशात एका राज्याने केलेल्या या सर्वात जास्त चाचण्या आहेत. प्रत्येक दहा लाख लोकांमागे १,४२३ चाचण्यांपासून त्या गेल्या पाच दिवसांत १,६४० झाल्या; परंतु यात काळजीची बाब अशी की, महाराष्ट्र देशात दिल्ली, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि हरयाणाने केलेल्या चाचण्यांच्या संख्येच्या यादीत सहाव्या क्रमांकावर घसरला.

महाराष्ट्र दर दहा लाख लोकांमागे चाचण्यांत चौथ्या पायरीवर होता. अशा प्रकारे महाराष्ट्राने दोन लाखांपेक्षा जास्त चाचण्या आतापर्यंत केल्या असून, देशात या सगळ्यात जास्त आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे १७,९७४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर देशात चाचण्यांचे प्रमाण वाढले. मोदी असे म्हणाल्याचे समजते की, दररोज शक्य झाले, तर दोन लाख चाचण्या केल्या जाव्यात. म्हणजे कोविड-१९ बाबत नेमकी परिस्थिती काय, हे ठरवता येईल व लॉकडाऊनबाबतचा सकारात्मक किंवा नकारात्मक निर्णय घेता येईल.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अवघ्या एका दिवसात (गुरुवारी) चाचण्या ८०,६३२ वरून १,६१,००७ वर नेल्या व शुक्रवारी हा नवा विक्रम स्थापन झाला. एकूण आयसीएमआरने शुक्रवारपर्यंत १५ लाख चाचण्या केल्या; परंतु जेवढ्या चाचण्या जास्त होत आहेत त्यातून देशात दर दहा लाखांमागे सर्वाधिक पॉझिटिव्ह केसेस समोर येत आहेत. या चाचण्या महाराष्ट्रापेक्षा जास्त संख्येत आहेत. सर्वाधिक चाचण्या या दिल्लीत झाल्या असून, तेथे कोविड-१९ चे दर दहा लाखांमागे २९७ रुग्ण आहेत, तर महाराष्ट्रात दर दहा लाखांमागे सरासरी निम्मेच म्हणजे १४६ रुग्ण आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या