शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

Coronavirus: विदेशांत अडकलेल्या १५ हजार भारतीयांना परत आणणार; १२ देशांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 23:04 IST

६४ विमाने, ३ युद्धनौकांनी वाहतूक, १४ दिवसांच्या क्वारंटाईननंतर घरी पाठविणार

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे एक डझनांहून अधिक देशांमध्ये अडकून पडलेल्या १५ हजारांहून अधिक भारतीय नागरिकांना गुरुवारपासून पुढील एक आठवड्यात मायदेशी परत आणण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. एकूण ६४ विमाने व नौदलाच्या दोन युद्धनौकांमधून ही वाहतूक करण्यात येईल.

संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, मलेशिया, फिलिपाइन्स, सौदी अरेबिया, कतार, बहरीन, कुवैत व बांगलादेशासह काही देशांमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांना विमानाने परत आणले जाईल. ही विमाने एअर इंडिया व त्यांची एअर इंडिया एक्स्प्रेस या उपकंपनीची असतील. या लोकांना विविध शहरांमध्ये आणले जाईल. तेथेच त्यांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवून, नंतरच आपापल्या घरी पाठविले जाईल.

या विमान वाहतुकीची सुरुवात गुरुवारी ७ मे रोजी होईल व ती १४ मेपर्यंत सुरू राहील. सर्वाधिक १५ विमाने केरळमधील लोकांना घेऊन येतील. दिल्ली व तमिळनाडूच्या नागरिकांसाठी प्रत्येकी ११ विमाने वापरली जातील. महाराष्टÑ व तेलंगणाच्या लोकांसाठी प्रत्येकी सात, गुजरातसाठी सहा, जम्मू-काश्मीर व कर्नाटकसाठी प्रत्येकी तीन, तर पंजाब व उत्तर प्रदेशासाठी प्रत्येकी एक विमान येईल. मुंबईला मलेशियातून २५०, न्यूयॉर्कहून ३००, बांगलादेशहून २५०, फिलिपीन्सहून २५० व ब्रिटनहून २५० अशा एकूण १,४०० नागरिकांना परत आणले जाईल.

विषाणूची साथ सुरू झाल्यानंतर परदेशांत अडकलेल्या भारतीयांना एवढ्या मोठ्या संख्येने नियोजनबद्ध पद्धतीने स्वदेशी परत आणण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी फेब्रुवारीत अशीच व्यवस्था केली गेली होती. दरम्यान, भारतीय नौदलाच्या ‘शार्दूल’, ‘मगर’ व ‘जलाश्व’ या युद्धनौकाही अडकलेल्या भारतीयांना परदेशांतून आणण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. यातील दोन युद्धनौका मालदीवमधून, तर एक दुबईमधून भारतीयांना घेऊन येतील. या तीनही युद्धनौका रवाना झाल्या असून, गुरुवारी त्या ठरलेल्या देशांत पोहोचतील. नौदलाने नागरिकांच्या अशा वाहतुकीसाठी एकूण १४ युद्धनौका सज्ज ठेवल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रवासाचे भाडे द्यावे लागणार

1) परदेशातील भारतीयांना परत आणण्याची प्रक्रिया७ मेपासून टप्प्या-टप्प्याने सुरू केली जाणार आहे. संबंधित देशांतील भारतीय राजदूतावास अशा नागरिकांची यादी तयार करीत आहेत. या नागरिकांना विमान किंवा जहाजाने परत आणले जाईल. त्यासाठी भारतीय नागरिकांना प्रवासाचे भाडे मात्र द्यावे लागणार आहे, असे सरकारने सोमवारी स्पष्ट केले होते.2) लंडनहून मुंबई, दिल्ली, अहमदाबाद आणि बंगळुरू या प्रवासासाठी ५० हजार रुपये आकारले जाणार आहेत. शिकागोहून दिल्ली, हैदराबाद प्रवासाचे भाडे सुमारे १ लाख रुपये असेल. हे भाडे खूप जास्त आहे; पण विमानात जाताना अजिबात प्रवासी नसतील. त्यामुळे तिकिटाची रक्कम जास्त ठेवण्यात आली आहे.यूएईसाठी २ विशेष विमानेसंयुक्त अरब अमिरातीतील भारतीयांना परत आणण्यासाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था सध्या करण्यात आली आहे. किमान दोन लाख भारतीयांनी परत येण्यासाठी दूतावासाकडे नावे नोंदवली आहेत. त्यामुळे गरजेनुसार आणखी विमानांची सोय केली जाईल. ही दोन्ही विमाने तेथून गुरुवारी निघतील. ती केरळच्या विमानतळांवर उतरतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या