शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

Coronavirus: विदेशांत अडकलेल्या १५ हजार भारतीयांना परत आणणार; १२ देशांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 23:04 IST

६४ विमाने, ३ युद्धनौकांनी वाहतूक, १४ दिवसांच्या क्वारंटाईननंतर घरी पाठविणार

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे एक डझनांहून अधिक देशांमध्ये अडकून पडलेल्या १५ हजारांहून अधिक भारतीय नागरिकांना गुरुवारपासून पुढील एक आठवड्यात मायदेशी परत आणण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. एकूण ६४ विमाने व नौदलाच्या दोन युद्धनौकांमधून ही वाहतूक करण्यात येईल.

संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, मलेशिया, फिलिपाइन्स, सौदी अरेबिया, कतार, बहरीन, कुवैत व बांगलादेशासह काही देशांमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांना विमानाने परत आणले जाईल. ही विमाने एअर इंडिया व त्यांची एअर इंडिया एक्स्प्रेस या उपकंपनीची असतील. या लोकांना विविध शहरांमध्ये आणले जाईल. तेथेच त्यांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवून, नंतरच आपापल्या घरी पाठविले जाईल.

या विमान वाहतुकीची सुरुवात गुरुवारी ७ मे रोजी होईल व ती १४ मेपर्यंत सुरू राहील. सर्वाधिक १५ विमाने केरळमधील लोकांना घेऊन येतील. दिल्ली व तमिळनाडूच्या नागरिकांसाठी प्रत्येकी ११ विमाने वापरली जातील. महाराष्टÑ व तेलंगणाच्या लोकांसाठी प्रत्येकी सात, गुजरातसाठी सहा, जम्मू-काश्मीर व कर्नाटकसाठी प्रत्येकी तीन, तर पंजाब व उत्तर प्रदेशासाठी प्रत्येकी एक विमान येईल. मुंबईला मलेशियातून २५०, न्यूयॉर्कहून ३००, बांगलादेशहून २५०, फिलिपीन्सहून २५० व ब्रिटनहून २५० अशा एकूण १,४०० नागरिकांना परत आणले जाईल.

विषाणूची साथ सुरू झाल्यानंतर परदेशांत अडकलेल्या भारतीयांना एवढ्या मोठ्या संख्येने नियोजनबद्ध पद्धतीने स्वदेशी परत आणण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी फेब्रुवारीत अशीच व्यवस्था केली गेली होती. दरम्यान, भारतीय नौदलाच्या ‘शार्दूल’, ‘मगर’ व ‘जलाश्व’ या युद्धनौकाही अडकलेल्या भारतीयांना परदेशांतून आणण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. यातील दोन युद्धनौका मालदीवमधून, तर एक दुबईमधून भारतीयांना घेऊन येतील. या तीनही युद्धनौका रवाना झाल्या असून, गुरुवारी त्या ठरलेल्या देशांत पोहोचतील. नौदलाने नागरिकांच्या अशा वाहतुकीसाठी एकूण १४ युद्धनौका सज्ज ठेवल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रवासाचे भाडे द्यावे लागणार

1) परदेशातील भारतीयांना परत आणण्याची प्रक्रिया७ मेपासून टप्प्या-टप्प्याने सुरू केली जाणार आहे. संबंधित देशांतील भारतीय राजदूतावास अशा नागरिकांची यादी तयार करीत आहेत. या नागरिकांना विमान किंवा जहाजाने परत आणले जाईल. त्यासाठी भारतीय नागरिकांना प्रवासाचे भाडे मात्र द्यावे लागणार आहे, असे सरकारने सोमवारी स्पष्ट केले होते.2) लंडनहून मुंबई, दिल्ली, अहमदाबाद आणि बंगळुरू या प्रवासासाठी ५० हजार रुपये आकारले जाणार आहेत. शिकागोहून दिल्ली, हैदराबाद प्रवासाचे भाडे सुमारे १ लाख रुपये असेल. हे भाडे खूप जास्त आहे; पण विमानात जाताना अजिबात प्रवासी नसतील. त्यामुळे तिकिटाची रक्कम जास्त ठेवण्यात आली आहे.यूएईसाठी २ विशेष विमानेसंयुक्त अरब अमिरातीतील भारतीयांना परत आणण्यासाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था सध्या करण्यात आली आहे. किमान दोन लाख भारतीयांनी परत येण्यासाठी दूतावासाकडे नावे नोंदवली आहेत. त्यामुळे गरजेनुसार आणखी विमानांची सोय केली जाईल. ही दोन्ही विमाने तेथून गुरुवारी निघतील. ती केरळच्या विमानतळांवर उतरतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या