शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

CoronaVirus News: 12 कोटी भारतीयांनी गमावली नोकरी, 'ही' कौशल्यं पुन्हा मिळवून देतील रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 20:31 IST

CoronaVirus News: कोरोनाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला असून अनेकांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळलीय..

मुंबई: जगातील तब्बल ५५.५ कोटी कर्मचाऱ्यांना आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या २० कोटी विद्यार्थ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. मे महिन्याच्या सुरुवातील भारतातील बेरोजगारीचा दर २७.१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. तर मार्च ते एप्रिल या कालावधीत तब्बल १२.२ कोटी लोकांनी रोजगार गमावला. कोर्सेरा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.कोरोनामुळे ३.७५ कोटी विद्यार्थी शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे विविध कौशल्य आत्मसात करून विद्यार्थी शिक्षणाशी सुसुंगत राहण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती कोर्सेरानं दिली. 'अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी संस्थांनी कौशल्स विकासावर भर द्यावा. त्यामुळे लोक कामावर परतताच ते सुरळीतपणे काम सुरू करू शकतील', असा दावा कोर्सेरानं केला.व्यवसाय, तंत्रज्ञान आणि डेटा सायन्सशी संबंधित कौशल्यं येत्या काळात अतिशय उपयुक्त ठरतील, असा दावा कोर्सेरानं केला आहे. 'सरकारं, कंपन्या आणि कॅम्पस यांच्याकडून होणाऱ्या दोन तृतीयांश नोंदण्या व्यवसाय, तंत्रज्ञान आणि डेटा सायन्स कोर्सेसशी संबंधित आहेत,' अशी माहिती कोर्सेरानं दिली.डेटा स्किल कमी असल्यानं देशाला दरवर्षी ३३२ बिलियनचा फटकाडेटा स्किल्सच्या बाबतीत भारत कमी पडतो. त्यामुळे भारतीय कंपन्यांना दरवर्षी ३३२ बिलियनचा फटका बसतो, अशी माहिती ऍकसेंचर आणि क्यूलिकच्या अहवालातून समोर आली आहे.भारत डेटा सायन्स स्किलमध्ये, विशेषत: डेटा व्यवस्थापनात मागे पडतो. याबाबतीत भारत जगात ५१ व्या (मागे पडण्याच्या बाबत) स्थानी आहे. तर डेटा व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेत देशाचा क्रमांक जगात ५८ वा आहे. भारत यामध्ये नायजेरिया, फिलिपिन्सपेक्षा थोडा पुढे असल्याचं कोर्सेराचा अहवाल सांगतो. आत्मविश्वास, तणाव व्यवस्थापन अशा वैयक्तिक कौशल्यांच्या मागणीत १२०० टक्क्यांची वाढ झाल्याची आकडेवारीदेखील अहवालात आहे.व्यवसाय तंत्रज्ञानात भारताची आघाडीव्यवसाय आणि तंत्रज्ञान कौशल्यात भारत चीनपेक्षा पुढे आहे. याबाबतीत भारताला उदयोन्मुख गटात (जगात ३४ वा क्रमांक) स्थान मिळालं आहे. तर चीन ४५ व्या स्थानी आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातही भारताचा समावेश उदयोन्मुख गटात असून देश जगात ४० व्या क्रमांकावर आहे. यातही भारतानं चीनला मागे टाकलं आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन ५० व्या स्थानी आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या