शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
4
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
5
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
6
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
7
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
8
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
9
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
10
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
11
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
12
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
13
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
14
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
15
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
16
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
17
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
18
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
19
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
20
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

देशात कोरोनाचा प्रचंड कहर, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खरा ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 6:56 AM

दिवसात २९४ बळी । एकूण रुग्ण २.३६ लाखांवर; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खरा ठरणार?

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना साथीने माजविलेला हाहाकार कमी होण्याची चिन्हे नाहीत. या आजाराने शुक्रवारी २९४ जणांचा बळी घेतला. याआधी देशात एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण मरण पावले नव्हते. कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख ३६ हजारांहून अधिक झाली आहे. एकाच दिवसात सुमारे १० हजार रुग्ण वाढल्याचा हा परिणाम आहे.

देशात १ लाख १५ हजार ९४२ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर १ लाख १४ हजार ७२ रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. गेल्या सलग तीन दिवसांत भारतामध्ये कोरोनाचे ९ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. या साथीमध्ये आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या ६ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाची साथ देशामध्ये जून किंवा जुलै महिन्यात कळस गाठण्याची शक्यता आहे. याचा अर्थ तोपर्यंत या साथीचा खूप फैलाव होऊन बळींची संख्याही कदाचित बरीच वाढलेली असेल. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ८० हजारांपेक्षा जास्त झाली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये २८ हजारांपेक्षा अधिक, तर दिल्लीमध्ये २६ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. गुजरातमध्ये १९ हजारांहून अधिक रुग्ण आहेत.भारतात मृत्यूदर २.८%चीनमध्ये कोरोनाच्या बळींची एकूण संख्या ४ हजारांपेक्षा अधिक आहे. यापेक्षा भारतात जास्त बळी गेले आहेत. चीनमध्ये कोरोनाचे ८४ हजार रुग्ण होते. एकट्या महाराष्ट्रात रुग्णांची संख्या आताच ८० हजारांवर गेली आहे. जगभरात सुमारे ६८ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून, ३ लाख ९८ हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. या आजारापायी जगभरात ५.८ टक्के इतका मृत्यूदर असताना भारतात मात्र त्याचे प्रमाण २.८ टक्के च आहे. भारतामध्ये गेल्या आठवडाभरात कोरोनामुळे दररोज सरासरी २३९ जणांचा मृत्यू झाला. त्याआधीच्या आठवडाभरात देशात कोरोनामुळे दररोज सरासरी १७९ जणांचा मृत्यू झाला होता.भारत सहाव्या स्थानीजगभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत अकराव्या व नंतर नवव्या स्थानी असलेला भारत गुरुवारी सातव्या स्थानी होता; पण रुग्णवाढीमुळे भारत इटलीच्या पुढे म्हणजे सहाव्या स्थानी आला आहे. इटलीमध्ये रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३४ हजार होती. भारतामध्ये २ लाख ३६ हजारांहून अधिक रुग्ण आहेत.निर्बंध उठल्यास रुग्णवाढ होईल?कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भारताने तातडीने लॉकडाऊन पुकारल्यामुळे व त्याची कडक अंमलबजावणी केल्यानेच फार मोठी हानी झाली नाही असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, निर्बंध उठविल्यास रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची भीती आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तसा इशाराच दिला आहे. सोमवारपासून देशात व राज्यात अनेक निर्बंध रद्द होणार आहेत.कोरोनावर उपचारासाठी ‘रेमडेसिवीर’ची मात्रा!कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी ‘रेमडेसिवीर’ची मात्रा लागू पडत असल्याने राज्य सरकार बांगलादेशकडून या ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स खरेदी करणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टिष्ट्वटरवर दिली आहे. ‘रेमडेसिवीर’ हे इंजेक्शन अ‍ॅण्टी व्हायरल असून ‘सार्स’ आजारासाठी ते उपयुक्त ठरल्याने कोरोनावरही ते उपयुक्त ठरू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे. तसेच हे औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचा दावा अमेरिकेनेही केला आहे.टॉपची राज्येमहाराष्ट्र82968

30152तामिळनाडू

27654दिल्ली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन