शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:02 IST

गेल्या २४ तासांत भारतात कोविड-१९मुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

गेल्या २४ तासांत भारतात कोविड-१९मुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ४,०२६ वर पोहोचली आहे. या मृत्यूंची नोंद केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून झाली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सगळेच आधीच काही आरोग्य समस्यांनी ग्रस्त होते.

प्रमुख राज्यांतील कोरोना स्थितीमहाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिल्लीत ३९३, गुजरातमध्ये ३९७, कर्नाटकमध्ये ३११, केरळमध्ये १४१६, महाराष्ट्रात ४९४, उत्तर प्रदेशात १३८, तामिळनाडूमध्ये २१५ आणि पश्चिम बंगालमध्ये ३७२ सक्रिय रुग्ण आहेत.

केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मृत्यू

केरळमध्ये ८० वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती आधीच गंभीर न्यूमोनिया, तीव्र श्वसनाचा त्रास, मधुमेह, उच्च रक्तदाबाने ग्रस्त होता. तामिळनाडूमध्ये टाइप २ मधुमेह आणि पार्किन्सन आजाराने त्रस्त असलेल्या ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाला. पश्चिम बंगालमध्ये ४३ वर्षीय महिलेला तीव्र कोरोनरी सिंड्रोम, सेप्टिक शॉक आणि तीव्र मूत्रपिंडाच्या आजार होते, तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीमहाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा येथील दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बळींची संख्या १०वर पोहोचली आहे. सोमवारी राज्यात ५९ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी २० रुग्ण मुंबईत आढळले. सध्या, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ८७३ आहे, त्यात ४८३ रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत कोरोनाची संख्या सतत वाढत असून, ३६९ रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाच्या नवीन उपप्रकारांची लक्षणेकोविड-१९च्या नवीन उप-प्रकाराने, NB.1.8.1, रुग्णांची संख्या वाढवली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR)  या उप-प्रकाराची पुष्टी केली असून, हा ओमिक्रॉन प्रकाराचे एक वेगाने पसरलेले आणि बदलणारे रूप आहे. या विषाणूचे लक्षणे सौम्य असतात. त्यात ताप, खोकला, घसा खवखवणे, थकवा, डोकेदुखी, शरीरदुखी, नाक वाहणे आणि भूक कमी होणे यांचा समावेश आहे. हे लक्षणे हंगामी तापासारखीच आहेत. आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि लवकर लक्षणे आढळल्यास योग्य उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य