शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

Corona virus : धक्कादायक ! दहा लाख लोकांसाठी फक्त ५०० डॉक्टर; कोरोनाकाळातील भयावह वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 14:37 IST

केंद्र व राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे देशात कोरोनाकाळात लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांचा तुटवडा भासत आहे..

ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवण्याची गरज , सध्या देशात ५३२ महाविद्यालये

राहुल शिंदे पुणे: केंद्र व राज्य शासनाने वैद्यकीय क्षेत्राकडे केलेल्या दुर्लक्षामुळे सध्या कोरोना बाधित रुग्णांसाठी बेडचा व त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा तुटवडा भासत आहे.'डब्ल्यूएचओ'च्या निकषानुसार १० लाख लोकसंख्येमागे १ हजार २०० डॉक्टर आवश्यक आहेत.परंतु, सध्या देशात हे प्रमाण केवळ ५०० पर्यंत आहे. त्यामुळे देशात व राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची व रुग्णालयांची संख्या वाढवावी लागणार आहे.

महाराष्ट्रात एकूण ५६ वैद्यकीय महाविद्यालय असून त्यात शासकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या सुमारे ४ हजार ३३० तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुमारे ४ हजार ५७० जागा उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या तुलनेत या जागा खूप कमी आहेत. त्यातही डेंटल कॉलेजचा विचार केला तर महाराष्ट्रात ३७ डेंटल कॉलेज असून त्यांची प्रवेश क्षमता ३ हजार ४४४ इतकी आहे. त्यातील शासकीय महाविद्यालयाच्या जागा केवळ २९४ एवढ्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राचे खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते.

इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे म्हणाले, गेल्या काही दशकांपासून केंद्र व राज्य शासनाने वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक निधी खर्च केला नाही. केंद्र शासनाने राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) पाच टक्के रक्कम वैद्यकीय क्षेत्राच्या विकासासाठी खर्च करणे आवश्यक आहे. मात्र, केंद्र शासनाकडून केवळ एक टक्का तर महाराष्ट्रकडून अर्धा टक्का रक्कम खर्चच केली जाते. ही सर्व रक्कम वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होते. पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही.

वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक्रम हरीश बुटले म्हणाले, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाईल, अशी भूमिका शासनाने घेतली होती. परंतु, त्याची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसत नाही. बुलढाणा, भंडारा ,गडचिरोली, वाशिम ,जालना, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये अद्याप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालेले नाही. इतर जिल्ह्यांमध्ये खाजगी किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. ------------------ भारतात ५३२ वैद्यकीय महाविद्यालय असून त्यांची एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ७६ हजार ९२८ एवढी आहे. त्यातील शासकीय महाविद्यालयांची संख्या २७२ असून त्यांची प्रवेश क्षमता ४१ हजार ३८८ एवढी आहे. तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या २६० असून त्यांची प्रवेश क्षमता ३५ हजार ५४० एवढी आहे. ----------------------- देशातील सव्वाशे कोटीहून अधिक असणाऱ्या लोकसंख्येसाठी ३० लाखांपर्यंत डॉक्टरची आवश्यकता आहे.परंतु,सध्या देशात केवळ १० लाख डॉक्टर आहेत. देशातील व महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवून रिक्त असणार्‍या प्राध्यापकांच्या व अधिका-यांच्या जागा भरण्याची आवश्यकता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत पाठपुरावा करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. -डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र राज्य --------------------- महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता साडेआठ हजाराहून अधिक आहे. परंतु ,महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा कमी असून त्यात आणखी ४ हजार जागांची वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी नवीन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करावे लागतील. ----------- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागांचा विचार केला.तर महाराष्ट्रात सुमारे ४ हजार १३० जागा शासकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यातील १५ टक्के जागा नॅशनल कोट्यासाठी राखीव ठेवल्या जातात.त्यामुळे ६२० जागा वजा करून महाराष्ट्रातील मुलांसाठी केवळ 3 हजार 510 जागा उपलब्ध राहतात. कोट्यवधी रुपये खर्च करून खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणे शक्य नसल्याने गरीब विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमापासून वंचित राहत आहेत. - हरीश बुटले, वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक्रम 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल