शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

CoronaVirus News : बापरे! देशात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने होतेय वाढ; तज्ञांनी सांगितलं 'हे' कारण, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 20:22 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये सर्वाधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. 17 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात भारतात कोरोनाचे 8,148 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्यात नोंदवलेल्या 7,088 प्रकरणांपेक्षा हे 15 टक्के अधिक आहे. त्यामुळे देशात कोरोनाची चौथी लाट येण्याच्या चर्चेला वेग आला आहे. गेल्या आठवड्यात, सक्रिय संसर्गामध्ये देखील 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे गेल्या दोन महिन्यांत दिसलेल्या ट्रेंडच्या उलट आहे. 

दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये सर्वाधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. यूपी आणि हरियाणातील बहुतेक नवीन प्रकरणे गौतम बुद्ध नगर (नोएडा), गाझियाबाद आणि गुरुग्राममधून येत आहेत. हे सर्व जिल्हे दिल्लीला लागून आहेत. यावेळी मुलांमध्येही संसर्ग दिसून येत आहे ही चिंतेची बाब आहे. अनेक महिन्यांनंतर मुले शाळेत परतली. त्यानंतर आता अनेक मुले पॉझिटिव्ह आढळून आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र याच दरम्यान निष्काळजीपणा हा घातक ठरू शकतो. 

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाच्या चौथ्या लाटेची ही सुरुवात आहे असे म्हणणे घाईचे आहे. आरोग्य अर्थशास्त्रज्ञ रिजो एम. जॉन यांनी "नवीन लाटेच्या सुरुवातीबद्दल काहीही बोलणे योग्य नाही. नवीन प्रकरणे वाढत आहेत की नाही हे मी दोन दिवस पाहीन" असं म्हटलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी-इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रज्ञा यादव म्हणाल्या, "नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे लोकांची आता मास्क घालण्याची सवय मोडली आहे. याशिवाय मोठ्या संख्येने लोक एकत्र येत आहेत त्यामुळे गर्दी होत आहे."

आपण गर्दी टाळली पाहिजे, असे त्या म्हणाला. आपण पुन्हा एकदा कोरोनाच्या नियमांचे पालन करणे सुरू केले पाहिजे. जिथे जाल तिथे मास्क घाला. आणखी एका शास्त्रज्ञाने सांगितले की, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे हे कोरोनाचे नवीन रुग्ण वाढण्याचे कारण आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा वेग मंदावल्यामुळे अनेक राज्यांत निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. पण आता पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत