शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

CoronaVirus News : आता 'या' राज्यात परतलेल्या लोकांना क्वारंटाईन केलं जाणार नाही, १५ जूनपासून सर्व सेंटर्स बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 16:51 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : सोमवारपर्यंत राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले 3945 रुग्ण आहेत. यामधील जवळपास 2743 रुग्ण हे परराज्यातून आले आहेत.

ठळक मुद्देकोरोना पॉझिटिव्ह आढळलेले बहुतेक रुग्ण हे महाराष्ट्रातून परतलेले आहेत. महाराष्ट्रातून आलेल्या 677 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

पटना : परराज्यातून बिहारमध्ये परतलेल्या मजूर, विद्यार्थ्यांना आता क्वारंटाईन करण्यात येणार नाही. तसेच, राज्यातील सर्व ब्लॉक स्तरीय क्वारंटाईन सेंटर सुद्धा 15 जूनपासून बंद करण्यात येणार आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने निर्णय घेतला आहे की, यापुढे राज्यात जे लोक येतील. त्यांची क्वारंटाईनसाठी नोंद केली जाणार नाही. बिहारमध्ये 5 हजार क्वारंटाईन सेंटर्समध्ये सोमवारपर्यंत परराज्यातून आलेल्या जवळपास 13 लाख लोकांची नोंद करण्यात आली आहे. 

आम्ही 30 लाखहून अधिक प्रवाशांना परत आणले आहे. सोमवारी संध्याकाळपासून नोंदणी बंद करत आहेत, असे बिहार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख सचिव प्रत्यय अमृत यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले की, डोर-टू-डोर आरोग्य तपासणी सुरूच राहील आणि वैद्यकीय सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे लेव्हल 1 आणि 2 हॉस्पिटलपर्यंत समान राहील.

दरम्यान, बिहारमध्ये परतलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सोमवारपर्यंत राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले 3945 रुग्ण आहेत. यामधील जवळपास 2743 रुग्ण हे परराज्यातून आले आहेत. आपत्ती विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजण 3 मे नंतर बिहारला परतले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले बहुतेक रुग्ण हे महाराष्ट्रातून परतलेले आहेत. महाराष्ट्रातून आलेल्या 677 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.  याशिवाय दिल्ली (628), गुजरात (405) आणि हरियाणामधून परत आलेल्या 237 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. याबरोबर, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा तसेच इतर राज्यामधून परत आलेल्या लोकांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहार