शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

CoronaVirus News : आता 'या' राज्यात परतलेल्या लोकांना क्वारंटाईन केलं जाणार नाही, १५ जूनपासून सर्व सेंटर्स बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 16:51 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : सोमवारपर्यंत राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले 3945 रुग्ण आहेत. यामधील जवळपास 2743 रुग्ण हे परराज्यातून आले आहेत.

ठळक मुद्देकोरोना पॉझिटिव्ह आढळलेले बहुतेक रुग्ण हे महाराष्ट्रातून परतलेले आहेत. महाराष्ट्रातून आलेल्या 677 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

पटना : परराज्यातून बिहारमध्ये परतलेल्या मजूर, विद्यार्थ्यांना आता क्वारंटाईन करण्यात येणार नाही. तसेच, राज्यातील सर्व ब्लॉक स्तरीय क्वारंटाईन सेंटर सुद्धा 15 जूनपासून बंद करण्यात येणार आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने निर्णय घेतला आहे की, यापुढे राज्यात जे लोक येतील. त्यांची क्वारंटाईनसाठी नोंद केली जाणार नाही. बिहारमध्ये 5 हजार क्वारंटाईन सेंटर्समध्ये सोमवारपर्यंत परराज्यातून आलेल्या जवळपास 13 लाख लोकांची नोंद करण्यात आली आहे. 

आम्ही 30 लाखहून अधिक प्रवाशांना परत आणले आहे. सोमवारी संध्याकाळपासून नोंदणी बंद करत आहेत, असे बिहार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख सचिव प्रत्यय अमृत यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले की, डोर-टू-डोर आरोग्य तपासणी सुरूच राहील आणि वैद्यकीय सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे लेव्हल 1 आणि 2 हॉस्पिटलपर्यंत समान राहील.

दरम्यान, बिहारमध्ये परतलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सोमवारपर्यंत राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले 3945 रुग्ण आहेत. यामधील जवळपास 2743 रुग्ण हे परराज्यातून आले आहेत. आपत्ती विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजण 3 मे नंतर बिहारला परतले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले बहुतेक रुग्ण हे महाराष्ट्रातून परतलेले आहेत. महाराष्ट्रातून आलेल्या 677 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.  याशिवाय दिल्ली (628), गुजरात (405) आणि हरियाणामधून परत आलेल्या 237 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. याबरोबर, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा तसेच इतर राज्यामधून परत आलेल्या लोकांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहार