शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व्हायरसचा १३.६ कोटी नोकऱ्यांना विळखा; अनेकांना बसावं लागू शकतं घरी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 15:28 IST

पर्यटन आणि सेवा क्षेत्राप्रमाणेच मॅन्युफॅक्चरिंग आणि नॉन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची स्थिती आहे. मागणी कमी झालेली असताना अनेक लोकांच्या नोकऱ्या सध्या टिकून आहेत. मागणी घटल्याने नवीन नोकऱ्यांची निर्मिती होणार नाहीच. मात्र ज्यांच्या नोकऱ्या टीकून आहेत, त्यांच्यावर देखील संकट आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण जग हैराण झाले आहे. सर्वच देशांची आर्थिक स्थिती कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे डबघाईला येत आहे. महासत्ता समजल्या जाणाऱ्या देशांनाही मोठे नुकसान सहन कराव लागत आहे. ज्या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे त्या देशांना अधिकच फटका बसणार आहे. कोरोनाचा फटका भारताला देखील मोठ्या प्रमाणात बसणार असून येथे कोरोनानंतर १३.६ कोटी नोकऱ्यांवर टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतात सध्या २१ दिवसांचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील ताजनगरी अर्थात आग्र्याला पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र आता आग्रा निर्मनुष्य झाला आहे. फेब्रुवारीनंतर पर्यटनात मोठी कमी आली आहे. पर्यटनात पुढील सहा महिने उठाव दिसणार नाही. त्यामुळे ट्रॅव्हल एजन्सिजच्या शेकडो कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे. अशा स्थिती कार, बसेस धुळ खात पडून राहणार आहेत. तर या कर्मचाऱ्यांना सहा महिने घरी बसून पगार द्यावी लागणार आहे. मात्र हे सर्वांनाच शक्य नाही. अशा स्थितीत अनेकांच्या नोकरीवर संकट येणार आहे.

नोकरी जाण्याचे संकट सर्वाधिक अशा ठिकाणी आहे, जिथे कर्मचाऱ्यांना नियमीत पगार मिळत नाही. पर्यटन उद्योगात देखील नियमीत पगार दिला जात नाही. अनेक लोक कोणत्याही कराराशिवाय काम करतात. यामध्ये गाईड देखील समील आहेत. दुकान, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या लोकांचा देखील यामध्ये समावेश आहे. कोरोना व्हायरसमुळे पर्यटन आणि सेवा क्षेत्रातील तब्बल २ कोटी नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. हे दोन्ही क्षेत्र सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. ऑक्टोबरनंतरच या क्षेत्रात सुधारणा होईल अशी आशा आहे.

पर्यटन आणि सेवा क्षेत्राप्रमाणेच मॅन्युफॅक्चरिंग आणि नॉन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची स्थिती आहे. मागणी कमी झालेली असताना अनेक लोकांच्या नोकऱ्या सध्या टिकून आहेत. मागणी घटल्याने नवीन नोकऱ्यांची निर्मिती होणार नाहीच. मात्र ज्यांच्या नोकऱ्या टीकून आहेत, त्यांच्यावर देखील संकट आहे. एकूणच संपूर्ण देशात १३.६ कोटी नोकऱ्यांवर टांच येण्याची शक्यता आहे. यामध्ये नॉन एग्रीकल्चर क्षेत्रासह अनेक क्षेत्रांचा समावेश असणार आहे.