शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘त्या’ पत्रकारांच्या कुटुंबांना ५ लाख रुपयांचे अर्थसाह्य, ‘लोकमत’चे एस. के. गुप्तांच्या कुटुंबाचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 06:10 IST

Journalist: कोरोना महामारीसारखे गंभीर संकट आणि दुर्घटनांत जीव गमवावा लागलेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून पाच-पाच लाख रुपयांचे अर्थसाह्य दिले जाईल. 

नवी दिल्ली : कोरोना महामारीसारखे गंभीर संकट आणि दुर्घटनांत जीव गमवावा लागलेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून पाच-पाच लाख रुपयांचे अर्थसाह्य दिले जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानुसार पत्रकारांचा मृत्यू कोरोना, रस्ता अपघात किंवा इतर दुर्घटनेत किंवा इतर गंभीर आजाराने झाला असून, त्यात कोरोना संक्रमणामुळे मरण पावलेले ‘लोकमत’चे एस. के. गुप्ता यांचाही समावेश आहे. तीन पत्रकार प्रदीर्घ काळपासून शारीरिक अक्षमतेमुळे अंथरुणाला खिळून असल्यामुळे हे अर्थसाह्य मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण निधीतून दिले जाईल.मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या पत्रकार कल्याण योजना समितीच्या बैठकीत ही रक्कम मंजूर केली गेली. खरे यांनी सांगितले की, ‘कोरोनाची परिस्थिती पाहता यापुढे दर गुरुवारी समितीची बैठक होईल. अगदी एक प्रकरण असेल तरी त्यावर विचार होईल.’  समितीत सहा पत्रकार व मंत्रालयाचे तीन अधिकारी आहेत. या आधी मंत्रालयाने वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्या ३९ पत्रकारांच्या कुटुंबियांना पाच-पाच लाख रुपयांचे साह्य दिले होते. समितीतील पत्रकार सदस्यांनी मंत्रालयाला अर्थसाह्याची रक्कम वाढवून द्यावी आणि पत्रकारांना आजीवन सीजीएचएस कार्ड दिले जावे, अशी विनंती केली. मंत्रालयाचे संयुक्त सचिव विक्रम सहाय यांनी यावर विचार केला जाईल व त्यासाठी समिती स्थापन केली जाईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Journalistपत्रकारcorona virusकोरोना वायरस बातम्या