शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

Corona Virus Delhi: कोरोनाची चौथी लाट? दिल्लीत उद्या नव्या निर्बंधांची घोषणा होण्याची शक्यता; डीडीएमएची मोठी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 21:48 IST

Corona Virus Delhi: याच महिन्यात देशभरात मास्क सक्ती काढून घेण्यात आली आहे. जानेवारी महिन्यानंतर दिल्लीतील पॉझिटिव्हीटी दर शून्याच्या आसपास गेला होता. पण आता हरियाणा, युपी, चंदीगडच्या दिल्ली सीमाभागात रुग्ण सापडू लागले आहेत.

कोरोनाच्या सुरुवातीपासून केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांनी धडकी भरविली होती. देशातील बहुतांश रुग्ण या तीन राज्यांतून मिळत होते. यात दिल्लीचा देखील मोठा वाटा होता. या तीन राज्यांत कोरोनाने मान टाकलेली असताना दिल्लीने आता धडकी भरविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दिल्लीत उद्या मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. 

दिल्ली आणि आजुबाजुच्या सीमावर्ती भागातील नोएडा एनसीआर, चंदीगड आदी भागात कोरोनाने टेन्शन वाढविले आहे. रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत नसले तरी पॉझिटिव्हीटी रेट ८ टक्क्यांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघचनेनुसार ५ टक्के हा धोकादायक आहे. दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत 632 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर 414 बरे झाले. या पार्श्वभूमीवर उद्या २० एप्रिलला डीडीएमएची महत्वाची बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीमध्ये कोणतातरी मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

दुसऱ्या राज्यांच्या तुलनेत दिल्ली आणि एनसीआरमध्ये रुग्ण का वाढत आहेत. टेस्टिंग सहा-सात हजार होत आहे. त्यापैकी ५०० ते ६०० लोकांना कोरोना झाल्याचे समोर येत आहे. यामागे नवा कोरोना व्हेरिअंट आहे की अन्य कोणते कारण हे देखील पाहिले जाणार आहे. 

याच महिन्यात देशभरात मास्क सक्ती काढून घेण्यात आली आहे. जानेवारी महिन्यानंतर पॉझिटिव्हीटी दर शून्याच्या आसपास गेला होता. उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये जे रुग्ण सापडत आहेत ते देखील दिल्ली सीमेवरील आहेत. यामध्ये मुलांची संख्या मोठी आहे. ICMR च्या तज्ज्ञ डॉ. प्रज्ञा यादव यांच्यानुसार कोरोनाचे रुग्ण वाढीमागे लोकांची मास्क वापरण्याची सवय संपले हे आहे. त्याचबरोबर लोक मोठ्यासंख्येने एकत्र येऊ लागले आहेत. पूर्वी ते मास्क वापरत होते, आता बिनदिक्कत फिरत आहेत. पुन्हा एकदा कोरोना निर्बंधांचे कठोर पालन करणे गरजेचे आहे आणि मास्कही गरजेचे आहे. 

दिल्लीमध्ये २ एप्रिलपासून मास्क घालण्याचा नियम हटविण्यात आला होता. यापुढे दंड आकारला जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. यामुळे जे लोक मास्क वापरत होते, त्यांनी देखील मास्क वापरणे बंद केले. दिल्लीतील रुग्णवाढीमागे हे एक कारण दिसत आहे. अन्य तज्ज्ञांनीही कोरोना निर्बंध पुन्हा आणण्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली