शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Corona Vaccination: लसीकरण धोरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करू नये; केंद्राचे प्रतिज्ञापत्र सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 19:26 IST

Corona Vaccination: यासंदर्भात एक प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देलसीकरण धोरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करू नयेनिर्णयक्षमतेवर न्यायालयांनी विश्वास ठेवावा तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच धोरण

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. देशातील बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयासह अन्य उच्च न्यायालयांमध्ये दाखल याचिकांवर सुनावणी सुरू असून, लसीकरण धोरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. (centre govt says to sc that no judicial interference needed in corona vaccination policy)

ऑक्सिजनची कमतरता, पुरवठा आणि व्यवस्थापन यांवरून सर्वोच्च न्यायालयासह देशभरातील उच्च न्यायालयांनी केंद्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. केंद्र सरकारचे लसीकरण धोरण योग्य आहे. ते तज्ज्ञांनी विचार विनिमय करुन तयार केले आहे. त्यात दुरुस्तीसाठी फारसा वाव नाही. तरी केंद्राच्या लसीकरण धोरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. यासंदर्भात एक प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले आहे. 

ममता दीदींना पराभूत करणारे सुवेंदू अधिकारी आता विरोधी पक्षनेते; भाजपची मोठी भेट

निर्णयक्षमतेवर न्यायालयांनी विश्वास ठेवावा 

कार्यकारी मंडळालाही काही अधिकार घटनेने दिले आहेत. त्यांच्या कामकाजावर आणि निर्णयक्षमतेवर न्यायालयांनी विश्वास ठेवावा, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. वेगवेगळ्या राज्य सरकारांच्या विनंतीनंतर १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचे धोरण निश्चित करण्यात आले आणि केंद्राने त्यानुसार लस उत्पादक कंपन्यांना राज्यांसाठी सवलतीचे दर आकारण्याची सूचना केली. देशातल्या सर्व राज्यासाठी ही लस एकाच किमतीत वितरीत करण्यात यावी, असेही निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. 

“प्रवीण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलंय, भाजप नेत्यांकडूनच PM मोदींचा अपमान” 

तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच धोरण

सध्या देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी वय वर्षे १८ ते ४४ आणि वय वर्षे ४५ च्या पुढे असे दोन गट आहेत. हे दोन गट या क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच निश्चित करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणातील जागतिक पातळीवरील संकटाचा सामना करण्यासाठी सरकार अनेक पातळ्यांवर लढत असताना न्यायव्यवस्थेने त्यात हस्तक्षेप करू नये, असे केंद्राने नमूद केले आहे. 

“मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती”

दरम्यान, न्या. डी. वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे केंद्राच्या लसीकरण धोरणाची सुनावणी सुरू असताना, वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या किमती बाबत सर्वोच्च न्यायालयाने हरकत होती आणि या धोरणाचा फेरआढावा घेण्याची सूचना केंद्र सरकारला केली होती. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय