शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Coronavirus : उद्यापासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचंही होणार लसीकरण; पाहा सेंटर्सवर कसं करता येईल रजिस्ट्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 08:37 IST

१ एप्रिलपासून ४५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मिळणार कोरोनाची लस, प्रत्येक घरात जाऊन लसीकरणासाठी महाराष्ट्राकडून विनंतीच केली नसल्याची आरोग्य सचिवांची माहिती

ठळक मुद्दे१ एप्रिलपासून ४५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मिळणार कोरोनाची लसप्रत्येक घरात जाऊन लसीकरणासाठी महाराष्ट्राकडून विनंतीच केली नसल्याची आरोग्य सचिवांची माहिती

Covid-19 Vaccination India: काही दिवसांपूर्वी ६० वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं होतं. यानंतर १ एप्रिल पासून सरकारनं ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचं लसीकरण मोहीम सुरू करणार असल्याची माहिती दिली. लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना https://cowin.gov.in या संकेतस्थळावरून किंवा आरोग्य सेतू अॅपवरून रजिस्ट्रेशन करता येणार आहे. परंतु ज्या लोकांना अपॉईंटमेंट आधी घ्यायची नसेल त्यांना आपल्या नजीकच्या कोरोना लसीकरण केंद्रावर दुपारी ३ वाजता जाऊन रजिस्ट्रेशन करता येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली. ऑनसाईट रजिस्ट्रेशनसाठी लोकांना आपल्या सोबत आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र नेता येईल. तसंच पासबूक, पासपोर्ट, रेशन कार्डदेखील ओळखपत्र म्हणून दाखवू शकता, असं केंद्रीय आरोग्य सचिव आर. भूषण म्हणाले.आतापर्यंत देशात ८०७ युके व्हेरिअंट्स, ४७ साऊथ आफ्रिकन व्हेरिअंट्स आणि १ ब्राझिलियन व्हेरिअंट दिसून आले असल्याचं आर. भूषण म्हणाले. पॉझिटिव्ह रेटच्या साप्ताहिक राष्ट्रीय सरासरीबाबत सांगायचं झालं तर तो ५.६५ टक्के आहे. महाराष्ट्रात तो २३ टक्के आणि पंजाबमध्ये ८.८२ टक्के इतका आहे. याशिवाय छत्तीसगढमध्ये ८ टक्के, मध्यप्रदेशात ७.८२ टक्के. तामिळनाडूत २.५० टक्के. कर्नाटकात २.५४ टक्के, गुजरातमध्ये २.२ टक्के आणि दिल्लीतर २.०४ टक्के इतका आहे. या राज्याना कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यास सांगितलं असल्याची माहितीदेखील भूषण यांनी दिली. "होम क्वारंटाईन बद्दल पाहताना त्याचं पालन केलं जातंय का नाही हे पाहणं आवश्यक आहे. जर असं होत नसेल तर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केलं गेलं पाहिजे," असंही ते म्हणाले. प्रत्येक घरात जाऊन लसीकरणासाठी विनंतीच नाहीमहाराष्ट्र सरकारनं प्रत्येक घरात जाऊन लसीकरण करण्यासाठी कोणता प्रस्ताव ठेवलाय का असा सवाल आर. भूषण यांना करण्यात आला. भारतामध्ये युनिव्हर्सल इम्युनिझेषन आहे. परंतु यानंतरही डोअर टू डोअर लसीकरण होत नाही. महाराष्ट्रानं यासाठी कोणतीही विशेष विनंती केली नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रAdhar Cardआधार कार्डpassportपासपोर्ट