शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

कोरोना रुग्णांचे होताहेत प्राण्यांपेक्षा भयानक हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 07:34 IST

सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; महाराष्ट्रासहित चार राज्यांना नोटिसा

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांवरील उपचारांत होत असलेल्या हलगर्जीपणाबद्दल, तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांचे मृतदेह नीट ठेवले जात नसल्याच्या घटनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. प्राण्यांना भोगाव्या लागत नसतील इतक्या हालअपेष्टा या रुग्णांना सोसाव्या लागत आहेत. हे चित्र क्लेशदायी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अशा घटनांची सविस्तर माहिती सादर करावी, असा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांना नोटिसा जारी केल्या.

याबाबतच्या बातम्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दखल घेतली. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांवरील उपचारांत जो हलगर्जीपणा सुरू आहे, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने कडक टीका केली. दिल्लीतील रुग्णालयांत गैरव्यवस्थेचे साम्राज्य असून, लोकांच्या कोरोना चाचण्या करण्याचे प्रमाणही खूप कमी आहे. या गोष्टींवर न्यायालयाने बोट ठेवून दिल्ली सरकारला फटकारले. शासकीय रुग्णालयांतील खाटा रिकाम्या असतानाही रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.उत्तम आरोग्य सुविधा सरकारचे कर्तव्यदिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मृतदेह जमिनीवर बराच वेळ तसेच ठेवण्यात आले होते. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते, अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याची गंभीर दखलही सर्वोच्च न्यायालयाने घेतली. रुग्णालयांमध्ये उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, हे सरकारचे, तर कोरोना रुग्णांची उत्तम सेवा करणे हे आरोग्यसेवकांचे कर्तव्य आहे, याची आठवण न्यायालयाने दिली.युद्धात सैनिकांना नाराज करू नका - सुप्रीम कोर्टयुद्धाच्या काळात आपण सैनिकांना नाराज करू नका. डॉक्टरांच्या तक्रारींवर तोडगा काढा आणि त्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करा, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला यावर उपाय करायला सांगितला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई