शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Pandemic: मुलीला शिकवण्यासाठी बापानं कर्ज घेतलं; कोरोना महामारीत ‘तिने’ हजारो भारतीयांना वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 14:43 IST

मुलीने पायलटचं शिक्षण पूर्ण करावं यासाठी वडिलांनी कर्ज घेतले. वडिलांनी घेतलेल्या कर्जाची जाणीव ठेवत लक्ष्मीनंही २ वर्ष सातत्याने मेहनत घेतली

मुंबई – कोरोना महामारीच्या काळात हजारो भारतीय लॉकडाऊनमुळे इतर देशांमध्ये अडकले होते. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर निर्बंध आले. त्यात परदेशात असलेले भारतीय मायदेशी परतण्याची आस लावून बसले होते. परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुखरुप देशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं वंदे भारत मिशन हाती घेतलं. याच मिशनचा स्वइच्छेने भाग बनलेल्या पायलट लक्ष्मी जोशीनं महामारीच्या काळात एकाच महिन्यात ३ विमान उड्डाण घेतल्याचा अनुभव शेअर केला.

लक्ष्मी जोशी केवळ ८ वर्षाची होती. जेव्हा ती पहिल्यांदा विमानातून प्रवास करत होती. त्याचवेळी लक्ष्मीनं पायलट बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. लक्ष्मी जोशी त्या पायलटपैकी एक आहे. ज्यांनी वंदे भारत मिशनसाठी स्वइच्छेने पुढाकार घेतला. मे २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर निर्बंध आणले होते. कोरोनामुळे अनेक भारतीय परदेशात अडकले. त्यांची सुटका करण्यासाठी हे मिशन हाती घेतलं. त्यात लक्ष्मीचंही योगदान होतं.

ह्युमन ऑफ बॉम्बे मुलाखतीत लक्ष्मी जोशीनं तिचा पायलट होण्याचा प्रवास सगळ्यांसमोर उलगडला आहे. पायलट बनवण्याचं स्वप्न पाहिलं परंतु ते पूर्ण करण्यासाठी तिच्या वडिलांनी मोलाची साथ दिली. मुलीने पायलटचं शिक्षण पूर्ण करावं यासाठी वडिलांनी कर्ज घेतले. वडिलांनी घेतलेल्या कर्जाची जाणीव ठेवत लक्ष्मीनंही २ वर्ष सातत्याने मेहनत घेतली. त्यानंतर पायलट प्रशिक्षण पूर्ण करत तिला उड्डाण करण्याचा परवाना मिळाला. माझ्या स्वप्नांना पंख मिळाले त्यामुळे मी खूप उत्साहीत होते. मला एअर इंडियात नोकरी मिळाल्याचं लक्ष्मीनं सांगितले.

लक्ष्मी म्हणते, माझ्या आयुष्यात सर्वात मोठे मार्गदर्शक माझे वडीलच आहेत. जेव्हा कुणी नातेवाईक विचारतो तुमची मुलगी कधी आणि केव्हा सेटेल होणार? त्यावर वडील सांगतात माझी मुलगी उडण्यासाठी बनलेली आहे. लक्ष्मी जोशी तिच्या नोकरीवर खूप प्रेम करते परंतु त्याशिवाय तिला दुसरं काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे जेव्हा कोरोना महामारी आली आणि वंदे भारत मिशन पुढे आलं तेव्हा तिने परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी उड्डाण घेतले.

जेव्हा लक्ष्मीनं या मिशनमध्ये भाग घेण्याचं ठरवलं तेव्हा तिचे आई वडील चिंतेत होते. तेव्हा हे मिशन किती महत्त्वपूर्ण आहे हे लक्ष्मीनं तिच्या आईवडिलांना सांगितले. या मिशनद्वारे लक्ष्मीचं पहिलं उड्डाण चीनच्या शांघाय येथे होते. ती सांगते की, मी त्याला उड्डाणाला कधीही विसरु शकत नाही. चीनमध्ये कोविड मोठ्या प्रमाणात पसरला होता. कारण प्रत्येक व्यक्ती बाधित झाला होता. परंतु आमचं उद्दिष्ट एकच होतं भारतीयांना वाचवणं. आम्ही उड्डाणावेळी आवश्यक सुरक्षेची काळजी घेतली होती. जेव्हा आम्ही चीनहून भारतात परतलो तेव्हा सगळ्यांनी आमचं कौतुक केले. एक छोटी मुलगी माझ्या जवळ आली आणि मला तुझ्यासारखं बनायचं आहे असं ती म्हणाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन