शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

Corona Pandemic: मुलीला शिकवण्यासाठी बापानं कर्ज घेतलं; कोरोना महामारीत ‘तिने’ हजारो भारतीयांना वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 14:43 IST

मुलीने पायलटचं शिक्षण पूर्ण करावं यासाठी वडिलांनी कर्ज घेतले. वडिलांनी घेतलेल्या कर्जाची जाणीव ठेवत लक्ष्मीनंही २ वर्ष सातत्याने मेहनत घेतली

मुंबई – कोरोना महामारीच्या काळात हजारो भारतीय लॉकडाऊनमुळे इतर देशांमध्ये अडकले होते. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर निर्बंध आले. त्यात परदेशात असलेले भारतीय मायदेशी परतण्याची आस लावून बसले होते. परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुखरुप देशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं वंदे भारत मिशन हाती घेतलं. याच मिशनचा स्वइच्छेने भाग बनलेल्या पायलट लक्ष्मी जोशीनं महामारीच्या काळात एकाच महिन्यात ३ विमान उड्डाण घेतल्याचा अनुभव शेअर केला.

लक्ष्मी जोशी केवळ ८ वर्षाची होती. जेव्हा ती पहिल्यांदा विमानातून प्रवास करत होती. त्याचवेळी लक्ष्मीनं पायलट बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. लक्ष्मी जोशी त्या पायलटपैकी एक आहे. ज्यांनी वंदे भारत मिशनसाठी स्वइच्छेने पुढाकार घेतला. मे २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर निर्बंध आणले होते. कोरोनामुळे अनेक भारतीय परदेशात अडकले. त्यांची सुटका करण्यासाठी हे मिशन हाती घेतलं. त्यात लक्ष्मीचंही योगदान होतं.

ह्युमन ऑफ बॉम्बे मुलाखतीत लक्ष्मी जोशीनं तिचा पायलट होण्याचा प्रवास सगळ्यांसमोर उलगडला आहे. पायलट बनवण्याचं स्वप्न पाहिलं परंतु ते पूर्ण करण्यासाठी तिच्या वडिलांनी मोलाची साथ दिली. मुलीने पायलटचं शिक्षण पूर्ण करावं यासाठी वडिलांनी कर्ज घेतले. वडिलांनी घेतलेल्या कर्जाची जाणीव ठेवत लक्ष्मीनंही २ वर्ष सातत्याने मेहनत घेतली. त्यानंतर पायलट प्रशिक्षण पूर्ण करत तिला उड्डाण करण्याचा परवाना मिळाला. माझ्या स्वप्नांना पंख मिळाले त्यामुळे मी खूप उत्साहीत होते. मला एअर इंडियात नोकरी मिळाल्याचं लक्ष्मीनं सांगितले.

लक्ष्मी म्हणते, माझ्या आयुष्यात सर्वात मोठे मार्गदर्शक माझे वडीलच आहेत. जेव्हा कुणी नातेवाईक विचारतो तुमची मुलगी कधी आणि केव्हा सेटेल होणार? त्यावर वडील सांगतात माझी मुलगी उडण्यासाठी बनलेली आहे. लक्ष्मी जोशी तिच्या नोकरीवर खूप प्रेम करते परंतु त्याशिवाय तिला दुसरं काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे जेव्हा कोरोना महामारी आली आणि वंदे भारत मिशन पुढे आलं तेव्हा तिने परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी उड्डाण घेतले.

जेव्हा लक्ष्मीनं या मिशनमध्ये भाग घेण्याचं ठरवलं तेव्हा तिचे आई वडील चिंतेत होते. तेव्हा हे मिशन किती महत्त्वपूर्ण आहे हे लक्ष्मीनं तिच्या आईवडिलांना सांगितले. या मिशनद्वारे लक्ष्मीचं पहिलं उड्डाण चीनच्या शांघाय येथे होते. ती सांगते की, मी त्याला उड्डाणाला कधीही विसरु शकत नाही. चीनमध्ये कोविड मोठ्या प्रमाणात पसरला होता. कारण प्रत्येक व्यक्ती बाधित झाला होता. परंतु आमचं उद्दिष्ट एकच होतं भारतीयांना वाचवणं. आम्ही उड्डाणावेळी आवश्यक सुरक्षेची काळजी घेतली होती. जेव्हा आम्ही चीनहून भारतात परतलो तेव्हा सगळ्यांनी आमचं कौतुक केले. एक छोटी मुलगी माझ्या जवळ आली आणि मला तुझ्यासारखं बनायचं आहे असं ती म्हणाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन