शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

Corona Pandemic: मुलीला शिकवण्यासाठी बापानं कर्ज घेतलं; कोरोना महामारीत ‘तिने’ हजारो भारतीयांना वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 14:43 IST

मुलीने पायलटचं शिक्षण पूर्ण करावं यासाठी वडिलांनी कर्ज घेतले. वडिलांनी घेतलेल्या कर्जाची जाणीव ठेवत लक्ष्मीनंही २ वर्ष सातत्याने मेहनत घेतली

मुंबई – कोरोना महामारीच्या काळात हजारो भारतीय लॉकडाऊनमुळे इतर देशांमध्ये अडकले होते. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर निर्बंध आले. त्यात परदेशात असलेले भारतीय मायदेशी परतण्याची आस लावून बसले होते. परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुखरुप देशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं वंदे भारत मिशन हाती घेतलं. याच मिशनचा स्वइच्छेने भाग बनलेल्या पायलट लक्ष्मी जोशीनं महामारीच्या काळात एकाच महिन्यात ३ विमान उड्डाण घेतल्याचा अनुभव शेअर केला.

लक्ष्मी जोशी केवळ ८ वर्षाची होती. जेव्हा ती पहिल्यांदा विमानातून प्रवास करत होती. त्याचवेळी लक्ष्मीनं पायलट बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. लक्ष्मी जोशी त्या पायलटपैकी एक आहे. ज्यांनी वंदे भारत मिशनसाठी स्वइच्छेने पुढाकार घेतला. मे २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर निर्बंध आणले होते. कोरोनामुळे अनेक भारतीय परदेशात अडकले. त्यांची सुटका करण्यासाठी हे मिशन हाती घेतलं. त्यात लक्ष्मीचंही योगदान होतं.

ह्युमन ऑफ बॉम्बे मुलाखतीत लक्ष्मी जोशीनं तिचा पायलट होण्याचा प्रवास सगळ्यांसमोर उलगडला आहे. पायलट बनवण्याचं स्वप्न पाहिलं परंतु ते पूर्ण करण्यासाठी तिच्या वडिलांनी मोलाची साथ दिली. मुलीने पायलटचं शिक्षण पूर्ण करावं यासाठी वडिलांनी कर्ज घेतले. वडिलांनी घेतलेल्या कर्जाची जाणीव ठेवत लक्ष्मीनंही २ वर्ष सातत्याने मेहनत घेतली. त्यानंतर पायलट प्रशिक्षण पूर्ण करत तिला उड्डाण करण्याचा परवाना मिळाला. माझ्या स्वप्नांना पंख मिळाले त्यामुळे मी खूप उत्साहीत होते. मला एअर इंडियात नोकरी मिळाल्याचं लक्ष्मीनं सांगितले.

लक्ष्मी म्हणते, माझ्या आयुष्यात सर्वात मोठे मार्गदर्शक माझे वडीलच आहेत. जेव्हा कुणी नातेवाईक विचारतो तुमची मुलगी कधी आणि केव्हा सेटेल होणार? त्यावर वडील सांगतात माझी मुलगी उडण्यासाठी बनलेली आहे. लक्ष्मी जोशी तिच्या नोकरीवर खूप प्रेम करते परंतु त्याशिवाय तिला दुसरं काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे जेव्हा कोरोना महामारी आली आणि वंदे भारत मिशन पुढे आलं तेव्हा तिने परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी उड्डाण घेतले.

जेव्हा लक्ष्मीनं या मिशनमध्ये भाग घेण्याचं ठरवलं तेव्हा तिचे आई वडील चिंतेत होते. तेव्हा हे मिशन किती महत्त्वपूर्ण आहे हे लक्ष्मीनं तिच्या आईवडिलांना सांगितले. या मिशनद्वारे लक्ष्मीचं पहिलं उड्डाण चीनच्या शांघाय येथे होते. ती सांगते की, मी त्याला उड्डाणाला कधीही विसरु शकत नाही. चीनमध्ये कोविड मोठ्या प्रमाणात पसरला होता. कारण प्रत्येक व्यक्ती बाधित झाला होता. परंतु आमचं उद्दिष्ट एकच होतं भारतीयांना वाचवणं. आम्ही उड्डाणावेळी आवश्यक सुरक्षेची काळजी घेतली होती. जेव्हा आम्ही चीनहून भारतात परतलो तेव्हा सगळ्यांनी आमचं कौतुक केले. एक छोटी मुलगी माझ्या जवळ आली आणि मला तुझ्यासारखं बनायचं आहे असं ती म्हणाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन