शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर कोरोना महामारीचे सावट, खासदारांना हवे व्हर्च्युअल अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 06:37 IST

winter session of Parliament : अनेक खासदारांनी आमच्या जीविताची जोखीम घेतली जाऊ नये, असे राज्यसभा व लोकसभेच्या अध्यक्षांना सांगितले आहे.

 - हरीश गुप्ता

नवी दिल्ली : कोरोना महामारी अजून संपलेली नसल्यामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्याचा फेरविचार करणे सरकारला भाग पडले आहे. काही मंत्री आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकया नायडू यांच्यासह ४५ खासदारांना सप्टेंबरमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कोरोनाची बाधा झाली होती. एका केंद्रीय मंत्र्याचे तर कोरोनामुळे निधनही झाले. पावसाळी अधिवेशन २८ सप्टेंबर रोजी संपलेले असल्यामुळे सरकारवर हिवाळी अधिवेशन घेणे घटनात्मक किंवा कायद्याने बंधनकारक नाही. दोन अधिवेशनांत सहापेक्षा जास्त महिन्यांचे अंतर असायला नको. त्यामुळे पुढील अधिवेशन सरकार मार्चमध्येही घेऊ शकेल; परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३० जानेवारी रोजी सुरू होणे बंधनकारक आहे. कोरोनाची साथ अजून असल्यामुळे सरकार खासदारांच्या जीविताबाबत धोका पत्करू शकत नाही.सरकारमधील उच्च सूत्रांनी म्हटले की, या विषयातून कसा मार्ग काढता येईल यासाठी राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकया नायडू आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसेच मुख्य विरोधी पक्षासोबत चर्चा सुरू करण्याचा विचार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो, यावर हिवाळी अधिवेशनाचा संबंध असल्याच्या प्रसारमाध्यमांतील वृत्तांचा या सूत्रांनी इन्कार केला. एखाद्या राज्याच्या निवडणुकीचा निकाल संसदेचे अधिवेशन कसे निश्चित करू शकतो, असा प्रश्न त्यांनी विचारला.

मंत्रिमंडळ समिती घेणार निर्णयअनेक खासदारांनी आमच्या जीविताची जोखीम घेतली जाऊ नये, असे राज्यसभा व लोकसभेच्या अध्यक्षांना सांगितले आहे. संसदेचे व्हर्च्युअल अधिवेशन घेतले जावे, असे आवाहन खासदार करत आहेत. सप्टेंबरमध्ये पावसाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागला होता व ते प्रत्यक्ष घेतले गेले होते. संसदीय कामकाज मंत्रालयाकडून प्रेझेंटेशन झाल्यानंतर मंत्रिमंडळ समिती (संसदीय कामकाज) अंतिम निर्णय घेईल.

टॅग्स :Parliamentसंसदcorona virusकोरोना वायरस बातम्या