शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वाईटातून चांगलं; कोरोनाचं संकट भारताला फळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 08:37 IST

कोरोना विषाणूच्या संसर्गाचे लोण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेची घडी विस्कटत असताना या विषाणूंचा उगम जेथून झाला त्या चीनच्या अर्थव्यवस्थेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

नवी दिल्ली : अत्यंत घातक अशा कोरोना विषाणूच्या संसर्गाचे लोण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेची घडी विस्कटत असताना या विषाणूंचा उगम जेथून झाला त्या चीनच्या अर्थव्यवस्थेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अशा स्थितीत चीनच्या अडचणींमुळे खासकरून निर्यात व्यापारात रिकामी झालेली जागा घेण्याची भारतास संधी आहे. देशाच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला हवी तशी गती येत नसताना ही संधी साधता आली तर कोरोनाचे संकट भारताच्या दृष्टीने इष्टापत्तीही ठरू शकेल, अशी आशा व्यापार-उद्योग क्षेत्राच्या ‘असोचेम’ या शीर्षस्थ संघटनेने व्यक्त केली आहे.इलेक्ट्रॉनिक्स, औषधी, विशेषत: रासायनिक आणि वाहन क्षेत्रासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी भारत मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहे. कोरोना विषाणूंच्या प्रकोपामुळे उद्योगांच्या या क्षेत्रांना कच्च्या मालाच्या पुरवठ्याचा तुटवडा भेडसावत आहे; परंतु, याखेरीज कोरोनामुळे स्थानिक व्यावसायिकांसाठी संधीची दारे खुली झालेली इतरही अनेक क्षेत्रे आहेत. काही क्षेत्रे सोडल्यास भारत बºयाच प्रमाणात अभियांत्रिकी निर्यात बाजारातील चीनची रिकामी जागा घेऊ शकतो. चामडे व चामड्याच्या वस्तू या क्षेत्रातही अशीच स्थिती आहे, असे ‘असोचेम’चे सरचिटणीस दीपक सूद यांनी सांगितले. चीनमधील निर्यातदार पुरवठा सुरळीत करेपर्यंत भारताला अनेक क्षेत्रांत स्पर्धकांपेक्षा आपली उत्पादने अधिक दर्जेदार करावी लागतील. भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेने चीनमुळे रिकामी होणारी बाजारातील रिकाम्या जागेची उणीव भरून काढणे जरुरी आहे, असेही सूद म्हणाले.चीनचे उत्पादन निच्चांकी पातळीवर...चीनमधील कारखानदारी क्षेत्रातील उत्पादन जवळपास ठप्पच पडले आहे. क्रय व्यवस्थापन निर्देशांकानुसार फेब्रुवारी महिन्यात चीनच्या कारखानदारी क्षेत्रातील उत्पादन वीस वर्षांतील नीचांक पातळीवर आले आहे. परिणामी जागतिक बाजारावर याचे गंभीर परिणाम होणे स्वाभाविक आहे. अशात पुढच्या काही महिन्यांत भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारात मोठी संधी मिळू शकते, असे असोचेमने म्हटले आहे.