शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

वाईटातून चांगलं; कोरोनाचं संकट भारताला फळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 08:37 IST

कोरोना विषाणूच्या संसर्गाचे लोण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेची घडी विस्कटत असताना या विषाणूंचा उगम जेथून झाला त्या चीनच्या अर्थव्यवस्थेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

नवी दिल्ली : अत्यंत घातक अशा कोरोना विषाणूच्या संसर्गाचे लोण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेची घडी विस्कटत असताना या विषाणूंचा उगम जेथून झाला त्या चीनच्या अर्थव्यवस्थेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अशा स्थितीत चीनच्या अडचणींमुळे खासकरून निर्यात व्यापारात रिकामी झालेली जागा घेण्याची भारतास संधी आहे. देशाच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला हवी तशी गती येत नसताना ही संधी साधता आली तर कोरोनाचे संकट भारताच्या दृष्टीने इष्टापत्तीही ठरू शकेल, अशी आशा व्यापार-उद्योग क्षेत्राच्या ‘असोचेम’ या शीर्षस्थ संघटनेने व्यक्त केली आहे.इलेक्ट्रॉनिक्स, औषधी, विशेषत: रासायनिक आणि वाहन क्षेत्रासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी भारत मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहे. कोरोना विषाणूंच्या प्रकोपामुळे उद्योगांच्या या क्षेत्रांना कच्च्या मालाच्या पुरवठ्याचा तुटवडा भेडसावत आहे; परंतु, याखेरीज कोरोनामुळे स्थानिक व्यावसायिकांसाठी संधीची दारे खुली झालेली इतरही अनेक क्षेत्रे आहेत. काही क्षेत्रे सोडल्यास भारत बºयाच प्रमाणात अभियांत्रिकी निर्यात बाजारातील चीनची रिकामी जागा घेऊ शकतो. चामडे व चामड्याच्या वस्तू या क्षेत्रातही अशीच स्थिती आहे, असे ‘असोचेम’चे सरचिटणीस दीपक सूद यांनी सांगितले. चीनमधील निर्यातदार पुरवठा सुरळीत करेपर्यंत भारताला अनेक क्षेत्रांत स्पर्धकांपेक्षा आपली उत्पादने अधिक दर्जेदार करावी लागतील. भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेने चीनमुळे रिकामी होणारी बाजारातील रिकाम्या जागेची उणीव भरून काढणे जरुरी आहे, असेही सूद म्हणाले.चीनचे उत्पादन निच्चांकी पातळीवर...चीनमधील कारखानदारी क्षेत्रातील उत्पादन जवळपास ठप्पच पडले आहे. क्रय व्यवस्थापन निर्देशांकानुसार फेब्रुवारी महिन्यात चीनच्या कारखानदारी क्षेत्रातील उत्पादन वीस वर्षांतील नीचांक पातळीवर आले आहे. परिणामी जागतिक बाजारावर याचे गंभीर परिणाम होणे स्वाभाविक आहे. अशात पुढच्या काही महिन्यांत भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारात मोठी संधी मिळू शकते, असे असोचेमने म्हटले आहे.