शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : मे महिन्याच्या अखेरिस भारत १.४ कोटींची संख्या पार करण्याची शक्यता; संशोधनातून दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 07:54 IST

कोरोनाची दुसरी लाट देशात झपाट्यानं वाढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद

ठळक मुद्देकोरोनाची दुसरी लाट देशात झपाट्यानं वाढत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद

गेल्या काही दिवसांपासू देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. दरम्यान, जर हीच परिस्थिती कायम राहिली तर मे महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या १.४ कोटींवर जाईल असा अंदाज झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान बंगळुरू येथील इंडियन इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्सनं (IISC) वर्तवला आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या मध्यावधीत कोरोना विषाणूचा पीक असू शकतो आणि यावेळी उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या ७.३ लाखांवर जाऊ शकते. तसंच या संशोधनानुसार अधिक बिकट परिस्थितीत मे महिन्याच्या अखेरिस उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या २० लाखांपर्यंतही पोहोचू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु जर लोकांचं लसीकरण केलं आणि कोरोना नियमांचं पालन केलं तर याला आळा घातला जाऊ शकतो, असंही यात वर्तवण्यात आलं आहे. IISC चे प्राध्यापक शशिकुमार आणि दीपक यांचा हा अंदाज कोरोनाच्या सध्याच्या ट्रेंडवर अवलंबून आहे. या अंदाजानुसार केवळ कर्नाटकातच एप्रिल अखेरपर्यंत या केसेसची संख्या १०.७ लाखांपर्यंत पोहोचू शकते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार वेगानं होताना दिसत आगे. तसंच आदल्या दिवसाच्या तुलनेत त्याच्या दुसऱ्या दिवशी जवळपास ९ हजार अधिक केसेस नोंदवल्या जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार शनिवारी २४ तासांमध्ये देशात ८९,१२९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर दुसरीकडे ७१४ जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत एकूण १ कोटी २३ लाखांच्यावर रुग्णांची नोंद झाली आहे. तर शनिवारपर्यंत देशात १ लाख ६४ हजारांच्यावर मृत्यू आणि ६ लाख ५८ हजारांच्यावर अॅक्टिव्ह केसेसचीही नोंद झाली. देशात ३ एप्रिल रोजी संध्याकाळपर्यंत एकू ७.४४ कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. दरम्यान, देशातील सर्वाधिक केस या महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये नोंदवल्या देल्या आहेत. शनिवारी राज्यात कोरोनाबाधितांची विक्रमी नोंदराज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. शनिवारी राज्यात तब्बल ४९ हजार ४४७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ३७ हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारची आकडेवारी ही राज्याची चिंता वाढवणारी आहे. (Maharashtra reports 49,447 new coronavirus case and 277 deaths in the last 24 hours)राज्यात शनिवारी ४९,४४७ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर दुसरीकडे  ३७,८२१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. राज्यात शनिवारपर्यंत एकूण ४०११७२ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८४.४९% इतकं झालं आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतBengaluruबेंगळूरResearchसंशोधन