शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Coronavirus : मे महिन्याच्या अखेरिस भारत १.४ कोटींची संख्या पार करण्याची शक्यता; संशोधनातून दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 07:54 IST

कोरोनाची दुसरी लाट देशात झपाट्यानं वाढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद

ठळक मुद्देकोरोनाची दुसरी लाट देशात झपाट्यानं वाढत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद

गेल्या काही दिवसांपासू देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. दरम्यान, जर हीच परिस्थिती कायम राहिली तर मे महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या १.४ कोटींवर जाईल असा अंदाज झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान बंगळुरू येथील इंडियन इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्सनं (IISC) वर्तवला आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या मध्यावधीत कोरोना विषाणूचा पीक असू शकतो आणि यावेळी उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या ७.३ लाखांवर जाऊ शकते. तसंच या संशोधनानुसार अधिक बिकट परिस्थितीत मे महिन्याच्या अखेरिस उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या २० लाखांपर्यंतही पोहोचू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु जर लोकांचं लसीकरण केलं आणि कोरोना नियमांचं पालन केलं तर याला आळा घातला जाऊ शकतो, असंही यात वर्तवण्यात आलं आहे. IISC चे प्राध्यापक शशिकुमार आणि दीपक यांचा हा अंदाज कोरोनाच्या सध्याच्या ट्रेंडवर अवलंबून आहे. या अंदाजानुसार केवळ कर्नाटकातच एप्रिल अखेरपर्यंत या केसेसची संख्या १०.७ लाखांपर्यंत पोहोचू शकते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार वेगानं होताना दिसत आगे. तसंच आदल्या दिवसाच्या तुलनेत त्याच्या दुसऱ्या दिवशी जवळपास ९ हजार अधिक केसेस नोंदवल्या जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार शनिवारी २४ तासांमध्ये देशात ८९,१२९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर दुसरीकडे ७१४ जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत एकूण १ कोटी २३ लाखांच्यावर रुग्णांची नोंद झाली आहे. तर शनिवारपर्यंत देशात १ लाख ६४ हजारांच्यावर मृत्यू आणि ६ लाख ५८ हजारांच्यावर अॅक्टिव्ह केसेसचीही नोंद झाली. देशात ३ एप्रिल रोजी संध्याकाळपर्यंत एकू ७.४४ कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. दरम्यान, देशातील सर्वाधिक केस या महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये नोंदवल्या देल्या आहेत. शनिवारी राज्यात कोरोनाबाधितांची विक्रमी नोंदराज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. शनिवारी राज्यात तब्बल ४९ हजार ४४७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ३७ हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारची आकडेवारी ही राज्याची चिंता वाढवणारी आहे. (Maharashtra reports 49,447 new coronavirus case and 277 deaths in the last 24 hours)राज्यात शनिवारी ४९,४४७ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर दुसरीकडे  ३७,८२१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. राज्यात शनिवारपर्यंत एकूण ४०११७२ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८४.४९% इतकं झालं आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतBengaluruबेंगळूरResearchसंशोधन