शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

युवकांना शेतीशी जोडून उत्पन्न दुप्पट करण्यावर विचारमंथन

By admin | Updated: March 20, 2017 03:39 IST

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पटियाळा जिल्ह्यातील रखडा गावात कृषी शास्त्रज्ञांनी शेतीमधून होणारे उत्पन्न

बलवंत तक्षक / चंदीगडपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पटियाळा जिल्ह्यातील रखडा गावात कृषी शास्त्रज्ञांनी शेतीमधून होणारे उत्पन्न आणि हे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मुद्यावर राजू श्राफ यांनी शेतकऱ्यांसोबत दीर्घ विचारमंथन केले. या कृषी मेळाव्यात शास्त्रज्ञांनी पिकांच्या वैविधकरणावर भर दिला आणि शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांच्या पिकांचे विपणन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी यूपीएसचे चेअरमन राजू श्राफ यांनी कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे पंजाबमध्ये कर्करुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे, हा शेतकऱ्यांमध्ये पसरत चाललेला गैरसमज दूर केला.यंग फार्मर्स असोसिएशन (वायएफए) तर्फे रखडा गावात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात मुंबईहून आलेले क्रॉप केअर फेडरेशनचे चेअरमन तथा यूपीएलचे चेअरमन राजू श्राफ यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. केंद्रीय कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे सचिव डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन श्राफ यांचा सत्कार केला. याप्रसंगी फळे, फुले, भाज्यांची बियाणे, रोपटी आणि कृषी यंत्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. शिवाय पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या संदर्भातील पुस्तकांचे प्रदर्शनही होते.डॉ. महापात्रा म्हणाले की, पंजाबात झिंग्याच्या शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. झिंग्याची निर्यात करूनही उत्पन्नात वाढ केली जाऊ शकते. पिकांच्या वैविधीकरणावर भर देताना महापात्रा यांनी वायएफएसोबत युवा वर्गाला नव्या तंत्रज्ञानासह शेतीशी जोडणे, प्रशिक्षण देणे, येथील माती व पाण्याचा विचार करून रखडा गावात पुढच्या वर्षी एक केंद्र स्थापन करणे आणि या केंद्राला सर्वप्रकारचे आर्थिक व तंत्रज्ञानविषयक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी केवळ उत्पादक म्हणून नव्हे तर आपले उत्पन्न वाढविण्यासाठी एक उद्योजक म्हणूनही पुढे आले पाहिजे, असे महापात्रा म्हणाले.राजू श्राफ यांनी कीटकनाशकांच्या वापरामुळे पंजाबमधील पाणी दूषित होत असल्याचा बिगर सरकारी संघटनांचा दावा खोडून काढला. केंद्र सरकारने विनाविलंब डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, अशी मागणी डॉ. सतनाम सिंग यांनी केली. ते म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांना वाचवायचे असेल तर आयोगाच्या शिफारशी लागू करणेच योग्य होईल.या शेतकरी मेळाव्यात डॉ. जे. पी. शर्मा, डॉ. डी. के. यादव, डॉ. जी. पी. सिंग आणि डॉ. प्रभू यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर मत मांडले. शेतकऱ्यांच्या समस्यांशी आम्ही अवगत आहोत आणि त्यांच्या समस्या सोडविण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वायएफएचे सरचिटणीस भगवान दास यांनी केले.