शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना शेतीशी जोडून उत्पन्न दुप्पट करण्यावर विचारमंथन

By admin | Updated: March 20, 2017 03:39 IST

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पटियाळा जिल्ह्यातील रखडा गावात कृषी शास्त्रज्ञांनी शेतीमधून होणारे उत्पन्न

बलवंत तक्षक / चंदीगडपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पटियाळा जिल्ह्यातील रखडा गावात कृषी शास्त्रज्ञांनी शेतीमधून होणारे उत्पन्न आणि हे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मुद्यावर राजू श्राफ यांनी शेतकऱ्यांसोबत दीर्घ विचारमंथन केले. या कृषी मेळाव्यात शास्त्रज्ञांनी पिकांच्या वैविधकरणावर भर दिला आणि शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांच्या पिकांचे विपणन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी यूपीएसचे चेअरमन राजू श्राफ यांनी कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे पंजाबमध्ये कर्करुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे, हा शेतकऱ्यांमध्ये पसरत चाललेला गैरसमज दूर केला.यंग फार्मर्स असोसिएशन (वायएफए) तर्फे रखडा गावात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात मुंबईहून आलेले क्रॉप केअर फेडरेशनचे चेअरमन तथा यूपीएलचे चेअरमन राजू श्राफ यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. केंद्रीय कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे सचिव डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन श्राफ यांचा सत्कार केला. याप्रसंगी फळे, फुले, भाज्यांची बियाणे, रोपटी आणि कृषी यंत्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. शिवाय पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या संदर्भातील पुस्तकांचे प्रदर्शनही होते.डॉ. महापात्रा म्हणाले की, पंजाबात झिंग्याच्या शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. झिंग्याची निर्यात करूनही उत्पन्नात वाढ केली जाऊ शकते. पिकांच्या वैविधीकरणावर भर देताना महापात्रा यांनी वायएफएसोबत युवा वर्गाला नव्या तंत्रज्ञानासह शेतीशी जोडणे, प्रशिक्षण देणे, येथील माती व पाण्याचा विचार करून रखडा गावात पुढच्या वर्षी एक केंद्र स्थापन करणे आणि या केंद्राला सर्वप्रकारचे आर्थिक व तंत्रज्ञानविषयक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी केवळ उत्पादक म्हणून नव्हे तर आपले उत्पन्न वाढविण्यासाठी एक उद्योजक म्हणूनही पुढे आले पाहिजे, असे महापात्रा म्हणाले.राजू श्राफ यांनी कीटकनाशकांच्या वापरामुळे पंजाबमधील पाणी दूषित होत असल्याचा बिगर सरकारी संघटनांचा दावा खोडून काढला. केंद्र सरकारने विनाविलंब डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, अशी मागणी डॉ. सतनाम सिंग यांनी केली. ते म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांना वाचवायचे असेल तर आयोगाच्या शिफारशी लागू करणेच योग्य होईल.या शेतकरी मेळाव्यात डॉ. जे. पी. शर्मा, डॉ. डी. के. यादव, डॉ. जी. पी. सिंग आणि डॉ. प्रभू यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर मत मांडले. शेतकऱ्यांच्या समस्यांशी आम्ही अवगत आहोत आणि त्यांच्या समस्या सोडविण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वायएफएचे सरचिटणीस भगवान दास यांनी केले.