शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

युवकांना शेतीशी जोडून उत्पन्न दुप्पट करण्यावर विचारमंथन

By admin | Updated: March 20, 2017 03:39 IST

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पटियाळा जिल्ह्यातील रखडा गावात कृषी शास्त्रज्ञांनी शेतीमधून होणारे उत्पन्न

बलवंत तक्षक / चंदीगडपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पटियाळा जिल्ह्यातील रखडा गावात कृषी शास्त्रज्ञांनी शेतीमधून होणारे उत्पन्न आणि हे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मुद्यावर राजू श्राफ यांनी शेतकऱ्यांसोबत दीर्घ विचारमंथन केले. या कृषी मेळाव्यात शास्त्रज्ञांनी पिकांच्या वैविधकरणावर भर दिला आणि शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांच्या पिकांचे विपणन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी यूपीएसचे चेअरमन राजू श्राफ यांनी कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे पंजाबमध्ये कर्करुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे, हा शेतकऱ्यांमध्ये पसरत चाललेला गैरसमज दूर केला.यंग फार्मर्स असोसिएशन (वायएफए) तर्फे रखडा गावात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात मुंबईहून आलेले क्रॉप केअर फेडरेशनचे चेअरमन तथा यूपीएलचे चेअरमन राजू श्राफ यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. केंद्रीय कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे सचिव डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन श्राफ यांचा सत्कार केला. याप्रसंगी फळे, फुले, भाज्यांची बियाणे, रोपटी आणि कृषी यंत्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. शिवाय पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या संदर्भातील पुस्तकांचे प्रदर्शनही होते.डॉ. महापात्रा म्हणाले की, पंजाबात झिंग्याच्या शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. झिंग्याची निर्यात करूनही उत्पन्नात वाढ केली जाऊ शकते. पिकांच्या वैविधीकरणावर भर देताना महापात्रा यांनी वायएफएसोबत युवा वर्गाला नव्या तंत्रज्ञानासह शेतीशी जोडणे, प्रशिक्षण देणे, येथील माती व पाण्याचा विचार करून रखडा गावात पुढच्या वर्षी एक केंद्र स्थापन करणे आणि या केंद्राला सर्वप्रकारचे आर्थिक व तंत्रज्ञानविषयक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी केवळ उत्पादक म्हणून नव्हे तर आपले उत्पन्न वाढविण्यासाठी एक उद्योजक म्हणूनही पुढे आले पाहिजे, असे महापात्रा म्हणाले.राजू श्राफ यांनी कीटकनाशकांच्या वापरामुळे पंजाबमधील पाणी दूषित होत असल्याचा बिगर सरकारी संघटनांचा दावा खोडून काढला. केंद्र सरकारने विनाविलंब डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, अशी मागणी डॉ. सतनाम सिंग यांनी केली. ते म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांना वाचवायचे असेल तर आयोगाच्या शिफारशी लागू करणेच योग्य होईल.या शेतकरी मेळाव्यात डॉ. जे. पी. शर्मा, डॉ. डी. के. यादव, डॉ. जी. पी. सिंग आणि डॉ. प्रभू यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर मत मांडले. शेतकऱ्यांच्या समस्यांशी आम्ही अवगत आहोत आणि त्यांच्या समस्या सोडविण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वायएफएचे सरचिटणीस भगवान दास यांनी केले.