शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

"ख्रिश्चन होणाऱ्यांना ST कोटा मिळू नये"; दिल्लीत एकत्र येणार हजारो आदिवासी, 15 विरुद्ध 85 ची तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 13:23 IST

'धर्मांतरण करणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांना अनुसूचित जमातीच्या यादीतून बाहेर करण्यात यावे आणि त्यांना आरक्षण मिळू नये,' अशी मागणी करत देशभरातून हजारो आदिवासी नागरिक दिल्लीत एकत्र येत आहेत.

हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन अथवा इतर धर्मात गेलेल्या आदिवासी समाजातील लोकांना आरक्षण दिले जावे अथवा नाही? यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. हाच मुद्दा घेऊन आता दिल्लीत एक मोठे आंदोलन होणार आहे. 'धर्मांतरण करणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांना अनुसूचित जमातीच्या यादीतून बाहेर करण्यात यावे आणि त्यांना आरक्षण मिळू नये,' अशी मागणी करत देशभरातून हजारो आदिवासी नागरिक दिल्लीत एकत्र येत आहेत.

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला रांचीमध्ये जवळपास 5000 आदिवासी नागरिकांनी एकत्र येत हीच मागणी केली. आदिवासी सुरक्षा मंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही संघटना देशभरातील सर्व हिंदू आदिवासींना एका व्यासपीठावर आणण्याचे काम करत असल्याचे बोलले जात आहे.

आदिवासी सुरक्षा मंचने म्हटले आहे, ख्रिश्चन धर्मात गेलेल्या आदिवासी समाजातील लोकांना चर्च आणि मिशनरींकडून मदत मिळत आहे. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी मिळत आहेत. त्यांना आर्थिक लाभही मिळाला आहे. अर्थात, ज्या आदिवासी लोकांनी आपला धर्म बदलला नाही त्यांच्या तुलनेत ते अधिक मजबूत स्थितीत आहेत. 

धर्मांतरण करणाऱ्यांना आदिवासींच्या यादीतून बाहेर करण्याची मागणी करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, या लोकांना चर्चच्या माध्यमाने परदेशातून पैसा मिळत आहे. आरक्षणाचा लाभही मिळत आहे आणि हे लोक सरकारकडून अल्पसंख्यकांसाठी चालविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभही घेत आहेत. अशा प्रकारचे या लोकांना धार्मिक अल्पसंख्यकाचा लाभही मिळत आहे आणि जाती निहाय असलेले आरक्षणही मिळत आहे. हा विरोधाभास असून नियमाविरुद्ध आहे.

"संपूर्ण आरक्षण तर या 15 टक्के लोकांना मिळतंय" -रांचीमध्ये झालेल्या रॅलीचे अध्यक्ष तथा लोकसभेचे माजी उपसभापती कारिया मुंडा म्हणाले, 'धर्मांतरण करणाऱ्या आदीवासींची संख्या 15 ते 20 टक्के आहे. मात्र, सरकारी नोकऱ्या आणि क्लास वन अधिकाऱ्यांचा विचार करता, त्यांची भागीदारी एकूण आदिवासींच्या तुलनेत 90 टक्क्यांपर्यंत आहे.' धर्मांतरण करणाऱ्या अथवा केलेल्यांना आदिवासींच्या यादीतून बाहेर करण्याची मागणी नवी नाही. मात्र, रांचीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाने याला बळ दिले आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनdelhiदिल्लीHinduहिंदू