शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

"ख्रिश्चन होणाऱ्यांना ST कोटा मिळू नये"; दिल्लीत एकत्र येणार हजारो आदिवासी, 15 विरुद्ध 85 ची तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 13:23 IST

'धर्मांतरण करणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांना अनुसूचित जमातीच्या यादीतून बाहेर करण्यात यावे आणि त्यांना आरक्षण मिळू नये,' अशी मागणी करत देशभरातून हजारो आदिवासी नागरिक दिल्लीत एकत्र येत आहेत.

हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन अथवा इतर धर्मात गेलेल्या आदिवासी समाजातील लोकांना आरक्षण दिले जावे अथवा नाही? यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. हाच मुद्दा घेऊन आता दिल्लीत एक मोठे आंदोलन होणार आहे. 'धर्मांतरण करणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांना अनुसूचित जमातीच्या यादीतून बाहेर करण्यात यावे आणि त्यांना आरक्षण मिळू नये,' अशी मागणी करत देशभरातून हजारो आदिवासी नागरिक दिल्लीत एकत्र येत आहेत.

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला रांचीमध्ये जवळपास 5000 आदिवासी नागरिकांनी एकत्र येत हीच मागणी केली. आदिवासी सुरक्षा मंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही संघटना देशभरातील सर्व हिंदू आदिवासींना एका व्यासपीठावर आणण्याचे काम करत असल्याचे बोलले जात आहे.

आदिवासी सुरक्षा मंचने म्हटले आहे, ख्रिश्चन धर्मात गेलेल्या आदिवासी समाजातील लोकांना चर्च आणि मिशनरींकडून मदत मिळत आहे. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी मिळत आहेत. त्यांना आर्थिक लाभही मिळाला आहे. अर्थात, ज्या आदिवासी लोकांनी आपला धर्म बदलला नाही त्यांच्या तुलनेत ते अधिक मजबूत स्थितीत आहेत. 

धर्मांतरण करणाऱ्यांना आदिवासींच्या यादीतून बाहेर करण्याची मागणी करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, या लोकांना चर्चच्या माध्यमाने परदेशातून पैसा मिळत आहे. आरक्षणाचा लाभही मिळत आहे आणि हे लोक सरकारकडून अल्पसंख्यकांसाठी चालविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभही घेत आहेत. अशा प्रकारचे या लोकांना धार्मिक अल्पसंख्यकाचा लाभही मिळत आहे आणि जाती निहाय असलेले आरक्षणही मिळत आहे. हा विरोधाभास असून नियमाविरुद्ध आहे.

"संपूर्ण आरक्षण तर या 15 टक्के लोकांना मिळतंय" -रांचीमध्ये झालेल्या रॅलीचे अध्यक्ष तथा लोकसभेचे माजी उपसभापती कारिया मुंडा म्हणाले, 'धर्मांतरण करणाऱ्या आदीवासींची संख्या 15 ते 20 टक्के आहे. मात्र, सरकारी नोकऱ्या आणि क्लास वन अधिकाऱ्यांचा विचार करता, त्यांची भागीदारी एकूण आदिवासींच्या तुलनेत 90 टक्क्यांपर्यंत आहे.' धर्मांतरण करणाऱ्या अथवा केलेल्यांना आदिवासींच्या यादीतून बाहेर करण्याची मागणी नवी नाही. मात्र, रांचीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाने याला बळ दिले आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनdelhiदिल्लीHinduहिंदू