शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"ख्रिश्चन होणाऱ्यांना ST कोटा मिळू नये"; दिल्लीत एकत्र येणार हजारो आदिवासी, 15 विरुद्ध 85 ची तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 13:23 IST

'धर्मांतरण करणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांना अनुसूचित जमातीच्या यादीतून बाहेर करण्यात यावे आणि त्यांना आरक्षण मिळू नये,' अशी मागणी करत देशभरातून हजारो आदिवासी नागरिक दिल्लीत एकत्र येत आहेत.

हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन अथवा इतर धर्मात गेलेल्या आदिवासी समाजातील लोकांना आरक्षण दिले जावे अथवा नाही? यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. हाच मुद्दा घेऊन आता दिल्लीत एक मोठे आंदोलन होणार आहे. 'धर्मांतरण करणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांना अनुसूचित जमातीच्या यादीतून बाहेर करण्यात यावे आणि त्यांना आरक्षण मिळू नये,' अशी मागणी करत देशभरातून हजारो आदिवासी नागरिक दिल्लीत एकत्र येत आहेत.

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला रांचीमध्ये जवळपास 5000 आदिवासी नागरिकांनी एकत्र येत हीच मागणी केली. आदिवासी सुरक्षा मंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही संघटना देशभरातील सर्व हिंदू आदिवासींना एका व्यासपीठावर आणण्याचे काम करत असल्याचे बोलले जात आहे.

आदिवासी सुरक्षा मंचने म्हटले आहे, ख्रिश्चन धर्मात गेलेल्या आदिवासी समाजातील लोकांना चर्च आणि मिशनरींकडून मदत मिळत आहे. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी मिळत आहेत. त्यांना आर्थिक लाभही मिळाला आहे. अर्थात, ज्या आदिवासी लोकांनी आपला धर्म बदलला नाही त्यांच्या तुलनेत ते अधिक मजबूत स्थितीत आहेत. 

धर्मांतरण करणाऱ्यांना आदिवासींच्या यादीतून बाहेर करण्याची मागणी करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, या लोकांना चर्चच्या माध्यमाने परदेशातून पैसा मिळत आहे. आरक्षणाचा लाभही मिळत आहे आणि हे लोक सरकारकडून अल्पसंख्यकांसाठी चालविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभही घेत आहेत. अशा प्रकारचे या लोकांना धार्मिक अल्पसंख्यकाचा लाभही मिळत आहे आणि जाती निहाय असलेले आरक्षणही मिळत आहे. हा विरोधाभास असून नियमाविरुद्ध आहे.

"संपूर्ण आरक्षण तर या 15 टक्के लोकांना मिळतंय" -रांचीमध्ये झालेल्या रॅलीचे अध्यक्ष तथा लोकसभेचे माजी उपसभापती कारिया मुंडा म्हणाले, 'धर्मांतरण करणाऱ्या आदीवासींची संख्या 15 ते 20 टक्के आहे. मात्र, सरकारी नोकऱ्या आणि क्लास वन अधिकाऱ्यांचा विचार करता, त्यांची भागीदारी एकूण आदिवासींच्या तुलनेत 90 टक्क्यांपर्यंत आहे.' धर्मांतरण करणाऱ्या अथवा केलेल्यांना आदिवासींच्या यादीतून बाहेर करण्याची मागणी नवी नाही. मात्र, रांचीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाने याला बळ दिले आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनdelhiदिल्लीHinduहिंदू