शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

अधिवेशनाची तारीख आज ठरणार!

By admin | Published: June 29, 2016 5:58 AM

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख आणि संपूर्ण कार्यक्रम निश्चित करण्याकरिता गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेतील संसदीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक बुधवारी होणार

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख आणि संपूर्ण कार्यक्रम निश्चित करण्याकरिता गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेतील संसदीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक बुधवारी होणार आहे. अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.आसाम विधानसभा निवडणुकीत प्रथमच विजय आणि केरळ व पश्चिम बंगालमध्ये उत्कृष्ट कामगिरीमुळे सत्ताधारी भाजपात प्रचंड उत्साह असताना हे अधिवेशन होत आहे. सोबतच मोदी सरकारला दोन वर्षेही पूर्ण झाली आहेत. अधिवेशन १८ जुलैला सुरू होऊन १३ आॅगस्टपर्यंत चालेल असे संकेत आहेत. राज्यसभेत ४५ तर लोकसभेत पाच विधेयके प्रलंबित आहेत. वरिष्ठ सभागृहात अडकलेल्या विधेयकांमध्ये वस्तू व सेवा कर विधेयकाचाही (जीएसटी) समावेश आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यावर गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये राज्यसभेत पाठविण्यात आले होते. सरकारला या सत्रात जीएसटी विधेयक मंजूर होण्याची अपेक्षा आहे. अनेक प्रादेशिक पक्षांनी या मुद्द्यावर काँग्रेसची साथ सोडली असून महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांना पाठिंबा देण्यास ते इच्छुक असल्याचे संकेत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)