शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अधिवेशन-गॅलरीतून

By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST

मुनगंटीवारांची दोन तास बॅटींग

मुनगंटीवारांची दोन तास बॅटींग
विधानसभेत एकनाथ खडसे बोलायला उभे राहिले आणि बोलता बोलता त्यांनी खिशात हात घातला की सगळे समजून जायचे आता तासभर तरी खडसे माईक सोडणार नाहीत... अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा अजून तसा अंदाज यायचा आहे. अर्थसंकल्प मांडण्यास त्यांनी दोन तास घेतले आणि त्यावरील चर्चेला उत्तर देतानाही जवळपास तेवढाच वेळ घेतला. खाली बसून कोणी काही बोलले तरी सुधीरभाऊ उत्तर देतायत हे लक्षात येताच बसून बोलणार्‍यांची संख्या वाढू लागली तसे भाषणं ही लांबू लागले. शेवटी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करुनही फार फरक पडला नाही... उलट कोकणाच्या प्रश्नावर पहिली मंत्रीमंडळाची बैठक थेट कोकणात घेऊन टाकू... असेही त्यांनी घोषीत केले आणि नंतर बरोबरयं ना मुख्यमंत्रीजी.. असा प्रतीसवाल मुख्यमंत्र्यांनाच केला तेव्हा हात जोडून मान डोलावण्यापलिकडे त्यांच्याही हाती काही उरले नव्हते... त्यांच्याच या काही कोट्या...
कोणी पिता बदलत नाही..!
छगन भुजबळ यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणात काही बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुनगंटीवारांनी भुूजबळांना आठवण करुन दिली. बाळासाहेब ठाकरे आपल्याला पित्यासमान आहेत... असे भुजबळांच्या आवाजाची नक्कल करीत मुनगंटीवार म्हणाले, कोणी कितीही श्रीमंत असला तरी आपला पिता बदलत नाही... आणि या विधानाला सत्ताधारीबाकावरुन जोरदार समर्थन मिळाले नाही तरच आ›र्य...
वानरास पुच्छ...
बजेट विरोधकांनाकसे समजले नाही हे सांगताना अर्थमंत्री म्हणाले, वानरास पुच्छ, तीन हत्तीस दंत सहा... असे सुभाषित होते. मात्र त्यातला अर्धविराम न वाचणारे म्हणाले, वानरास तीन शेपट्या आणि हत्तीला सहा दात आहेत... अर्धविराम नीट वाचला असता तर बरे झाले असते असेही सांगायला ते विसरले नाहीत...
बँकेत जाणारे दोघे...
यशोमती ठाकूर यांनी जुन्याच बाटलीत नवी दारु असे वर्णन अर्थसंकल्पाचे केले होते त्यावर अर्थमंत्र्यांनी राम आणि शामची कथा सांगितली. हे दोघे मित्र. दोघेही म्हणाले म्हणे, अरे माझे वडील बँकेत पैसे काढायला गेले आणि पोलिसांनी त्यांना पकडले... दुसरा म्हणाला माझेही वडील बँकेत पैसे काढायला गेले आणि त्यांनाही पकडले. त्यावर राम म्हणाला, अरे माझे वडील सकाळी बँकेच्या वेळत स्लीप घेऊन पैसे काढायला गेले होते... तुझे वडील रात्री बँक बंद झाल्यावर पैसे काढायला गेले होते... त्यावरही सभागृह हास्यात बुडाले...
प्रणिती शिंदे आणि गोहत्याबंदी
गोहत्या बंदीवरुन अर्थमंत्र्यांनी प्रणिती शिंदे यांना काही दाखले दिले. ते म्हणाले, मोतीलाल व्होरा, ॲड. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी गोहत्या बंदीची मागणी केली होती. हा कायदा आंध्राने लागू केला तेथे काँग्रेसचे सरकार होते. देशातही काँग्रेसचेच सरकार होते,जेव्हा हा कायदा मंजूर झाला होता... त्यावर प्रणिती शिंदे यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला खरा पण आपण महात्मा गांधींचा वारसा चालवता की... अन्य कोणाचा... असा सवालही त्यांनी करुन गदारोळ उडवून दिला...
- अतुल कुलकर्णी