शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
4
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
5
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
6
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
7
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
8
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
9
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
10
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
11
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
12
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
13
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
14
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
15
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
16
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
17
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
18
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
19
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

अधिवेशन-गॅलरीतून

By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST

मुनगंटीवारांची दोन तास बॅटींग

मुनगंटीवारांची दोन तास बॅटींग
विधानसभेत एकनाथ खडसे बोलायला उभे राहिले आणि बोलता बोलता त्यांनी खिशात हात घातला की सगळे समजून जायचे आता तासभर तरी खडसे माईक सोडणार नाहीत... अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा अजून तसा अंदाज यायचा आहे. अर्थसंकल्प मांडण्यास त्यांनी दोन तास घेतले आणि त्यावरील चर्चेला उत्तर देतानाही जवळपास तेवढाच वेळ घेतला. खाली बसून कोणी काही बोलले तरी सुधीरभाऊ उत्तर देतायत हे लक्षात येताच बसून बोलणार्‍यांची संख्या वाढू लागली तसे भाषणं ही लांबू लागले. शेवटी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करुनही फार फरक पडला नाही... उलट कोकणाच्या प्रश्नावर पहिली मंत्रीमंडळाची बैठक थेट कोकणात घेऊन टाकू... असेही त्यांनी घोषीत केले आणि नंतर बरोबरयं ना मुख्यमंत्रीजी.. असा प्रतीसवाल मुख्यमंत्र्यांनाच केला तेव्हा हात जोडून मान डोलावण्यापलिकडे त्यांच्याही हाती काही उरले नव्हते... त्यांच्याच या काही कोट्या...
कोणी पिता बदलत नाही..!
छगन भुजबळ यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणात काही बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुनगंटीवारांनी भुूजबळांना आठवण करुन दिली. बाळासाहेब ठाकरे आपल्याला पित्यासमान आहेत... असे भुजबळांच्या आवाजाची नक्कल करीत मुनगंटीवार म्हणाले, कोणी कितीही श्रीमंत असला तरी आपला पिता बदलत नाही... आणि या विधानाला सत्ताधारीबाकावरुन जोरदार समर्थन मिळाले नाही तरच आ›र्य...
वानरास पुच्छ...
बजेट विरोधकांनाकसे समजले नाही हे सांगताना अर्थमंत्री म्हणाले, वानरास पुच्छ, तीन हत्तीस दंत सहा... असे सुभाषित होते. मात्र त्यातला अर्धविराम न वाचणारे म्हणाले, वानरास तीन शेपट्या आणि हत्तीला सहा दात आहेत... अर्धविराम नीट वाचला असता तर बरे झाले असते असेही सांगायला ते विसरले नाहीत...
बँकेत जाणारे दोघे...
यशोमती ठाकूर यांनी जुन्याच बाटलीत नवी दारु असे वर्णन अर्थसंकल्पाचे केले होते त्यावर अर्थमंत्र्यांनी राम आणि शामची कथा सांगितली. हे दोघे मित्र. दोघेही म्हणाले म्हणे, अरे माझे वडील बँकेत पैसे काढायला गेले आणि पोलिसांनी त्यांना पकडले... दुसरा म्हणाला माझेही वडील बँकेत पैसे काढायला गेले आणि त्यांनाही पकडले. त्यावर राम म्हणाला, अरे माझे वडील सकाळी बँकेच्या वेळत स्लीप घेऊन पैसे काढायला गेले होते... तुझे वडील रात्री बँक बंद झाल्यावर पैसे काढायला गेले होते... त्यावरही सभागृह हास्यात बुडाले...
प्रणिती शिंदे आणि गोहत्याबंदी
गोहत्या बंदीवरुन अर्थमंत्र्यांनी प्रणिती शिंदे यांना काही दाखले दिले. ते म्हणाले, मोतीलाल व्होरा, ॲड. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी गोहत्या बंदीची मागणी केली होती. हा कायदा आंध्राने लागू केला तेथे काँग्रेसचे सरकार होते. देशातही काँग्रेसचेच सरकार होते,जेव्हा हा कायदा मंजूर झाला होता... त्यावर प्रणिती शिंदे यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला खरा पण आपण महात्मा गांधींचा वारसा चालवता की... अन्य कोणाचा... असा सवालही त्यांनी करुन गदारोळ उडवून दिला...
- अतुल कुलकर्णी