शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 17:12 IST

मणिपूरमध्ये एन बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारही अडचणीत आले आहे कारण लोक आता मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर राज्यात गोंधळ निर्माण झाला आहे. आता कुकी बंडखोर गटांविरुद्ध ठोस पावले उचलण्याची मागणी करणारा एनडीए आमदारांचा प्रस्ताव मेईतेई समाजाच्या नागरी संघटनांनी फेटाळला आहे. राज्याच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या आमदारांची सोमवारी रात्री बैठक झाली आणि जिरीबाम जिल्ह्यातील तीन महिला आणि तीन मुलांच्या हत्येला जबाबदार असलेल्या कुकी उग्रवाद्यांच्या विरोधात ७ दिवसांच्या आत कारवाईची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात यावे यासाठी आव्हान केले होते.

या बैठकीला २७ आमदारांनी हजेरी लावली होती पण मेईतेई समाजाच्या नागरी संघटनांनी ती नाकारली आहे आणि सरकारला २४ तासांच्या आत कुकी उग्रवाद्यांवर कारवाई करण्याचे अल्टिमेटम दिले आहे.

Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

"सहा निष्पाप महिला आणि बालकांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या कुकी उग्रवाद्यांच्या  विरोधात सात दिवसांच्या आत मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू करावी," असेही निवेदनात म्हटले आहे . या हल्ल्यासाठी कुकी उग्रवादी जबाबदार आहेत सात दिवसांच्या आत बेकायदेशीर संघटना घोषित करण्यात यावे. हे प्रकरण तत्काळ राष्ट्रीय तपास संस्थेकडे तपासासाठी सोपवण्यात यावे, असे या प्रस्तावात म्हटले आहे.

१४ नोव्हेंबरच्या आदेशानुसार केंद्र सरकार AFSPA अंमलबजावणीचा तत्काळ समीक्षण करेल, असेही निवेदनात म्हटले आहे. यापुढे जर या प्रस्तावांची विहित मुदतीत अंमलबजावणी झाली नाही तर सर्व एनडीए आमदार मणिपूरच्या लोकांशी चर्चा करून पुढील कारवाईचा निर्णय घेतील. मणिपूरमध्ये शांतता आणि सामान्य स्थिती निश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे शक्य तितक्या लवकर सर्व आवश्यक पावले उचलतील असे या ठरावात म्हटले आहे. मंत्री आणि आमदारांच्या मालमत्तेवर झालेल्या हल्ल्याचाही आमदारांनी निषेध केला.

मुख्यमंत्री सचिवालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उच्चाधिकार समितीच्या निष्कर्षांच्या आधारे गैरप्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, शेजारील राज्य आसामने मणिपूरला लागून असलेली आपली सीमा सील केली आहे. त्यांच्या राज्यातही हिंसाचार पसरण्याची भीती आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार