शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 17:12 IST

मणिपूरमध्ये एन बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारही अडचणीत आले आहे कारण लोक आता मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर राज्यात गोंधळ निर्माण झाला आहे. आता कुकी बंडखोर गटांविरुद्ध ठोस पावले उचलण्याची मागणी करणारा एनडीए आमदारांचा प्रस्ताव मेईतेई समाजाच्या नागरी संघटनांनी फेटाळला आहे. राज्याच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या आमदारांची सोमवारी रात्री बैठक झाली आणि जिरीबाम जिल्ह्यातील तीन महिला आणि तीन मुलांच्या हत्येला जबाबदार असलेल्या कुकी उग्रवाद्यांच्या विरोधात ७ दिवसांच्या आत कारवाईची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात यावे यासाठी आव्हान केले होते.

या बैठकीला २७ आमदारांनी हजेरी लावली होती पण मेईतेई समाजाच्या नागरी संघटनांनी ती नाकारली आहे आणि सरकारला २४ तासांच्या आत कुकी उग्रवाद्यांवर कारवाई करण्याचे अल्टिमेटम दिले आहे.

Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

"सहा निष्पाप महिला आणि बालकांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या कुकी उग्रवाद्यांच्या  विरोधात सात दिवसांच्या आत मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू करावी," असेही निवेदनात म्हटले आहे . या हल्ल्यासाठी कुकी उग्रवादी जबाबदार आहेत सात दिवसांच्या आत बेकायदेशीर संघटना घोषित करण्यात यावे. हे प्रकरण तत्काळ राष्ट्रीय तपास संस्थेकडे तपासासाठी सोपवण्यात यावे, असे या प्रस्तावात म्हटले आहे.

१४ नोव्हेंबरच्या आदेशानुसार केंद्र सरकार AFSPA अंमलबजावणीचा तत्काळ समीक्षण करेल, असेही निवेदनात म्हटले आहे. यापुढे जर या प्रस्तावांची विहित मुदतीत अंमलबजावणी झाली नाही तर सर्व एनडीए आमदार मणिपूरच्या लोकांशी चर्चा करून पुढील कारवाईचा निर्णय घेतील. मणिपूरमध्ये शांतता आणि सामान्य स्थिती निश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे शक्य तितक्या लवकर सर्व आवश्यक पावले उचलतील असे या ठरावात म्हटले आहे. मंत्री आणि आमदारांच्या मालमत्तेवर झालेल्या हल्ल्याचाही आमदारांनी निषेध केला.

मुख्यमंत्री सचिवालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उच्चाधिकार समितीच्या निष्कर्षांच्या आधारे गैरप्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, शेजारील राज्य आसामने मणिपूरला लागून असलेली आपली सीमा सील केली आहे. त्यांच्या राज्यातही हिंसाचार पसरण्याची भीती आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार