शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

New Parliament: नव्या संसदेचं उद्घाटन कुणी करावं? याचिकेवर सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय, दिले असे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 13:54 IST

New Parliament: नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. दरम्यान, या याचिकेची दखल देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत ती याचिका फेटाळून लावली आहे. हा विषय कोर्टाच्या अखत्यारित येत नाही, असे न्यायमूर्तींनी याचिका फेटाळताना स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी करणारे जस्टिस जे.के. माहेश्वरी आणि जस्टिस पी.एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, हा कुठला खटला नाही आहे, ज्यावर न्यायालयाला हस्तक्षेप करता येईल. तसेच ही याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना या याचिकेसाठी तुम्हाला दंड का ठोठावू नये, असा सवालही केला. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, या याचिकेवर सुनावणीचा कुठलाही आधार नाही आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून वाद पेटला असतानाच एका वकिलाने ही याचिका दाखल केली होती. संसद भवनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना निमंत्रित न करून घटनेचा अपमान करण्यात आला आहे, असा आरोप याचिकाकर्त्या वकिलाने केला होता.

तसेच लोकसभा सचिवालयाला नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करून त्यांच्याहस्ते उद्घाटन करून घ्यावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने द्यावेत, अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आली होती. राष्ट्रपती ह्या देशाच्या प्रथम नागरिक आणि या लोकशाही व्यवस्थेच्या प्रमुख आहेत. लोकसभा सचिवालय आणि केंद्र सरकार राष्ट्रपतींना संसदेच्या उदघाटनासाठी निमंत्रित न करून त्यांच्या अपमान करत आहेत, असा आरोपही याचिकेतून करण्यात आला होता.

२८ मे रोजी नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सुमारे २० विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होणार नसल्याने या समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.  

टॅग्स :ParliamentसंसदSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार