शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

हिंदी भाषा लादण्यावरून वादंग! तामिळनाडू सरकारचा इशारा; केंद्राने १० हजार कोटी दिले तरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 09:51 IST

स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांच्यावर आरोप केले आहेत. 

नवी दिल्ली - केंद्र सरकारने १० हजार कोटी ऑफर केले तरीही राज्यात नवीन शिक्षण धोरण लागू होऊ देणार नाही असा इशारा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी दिला आहे. हा विरोध केवळ हिंदी भाषा लादण्यावरूनच नाही तर या नव्या धोरणात अनेक अशा तरतुदी आहेत ज्यामुळे विद्यार्थी आणि सामाजिक न्याय प्रणालीवर परिणाम होऊ शकतो असा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. 

एका कार्यक्रमात स्टॅलिन म्हणाले की, हे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर करेल आणि वंचित घटकांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीवरही त्याचा परिणाम होईल. नव्या धोरणानुसार तिसरी, पाचवी आणि आठवी वर्गाच्या प्रस्तावित सार्वजनिक परीक्षा, कॉलेज प्रवेश यांच्यासाठी एक समान प्रवेश परीक्षेवरूनही त्यांनी चिंता व्यक्त केली. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांच्यावर आरोप केले आहेत. 

शिक्षण मंत्र्‍यांनी सर्व शिक्षा अभियानातंर्गत तामिळनाडूला मिळणारे २ हजार कोटी रुपये निधी रोखण्याची धमकी दिली आहे. हे अभियान व्यावसायिक शिक्षणाला सामन्य शिक्षणेशी जोडण्याचा प्रयत्न करतं जे नव्या शैक्षणिक धोरणात जोडले जात आहे. हा प्रस्ताव म्हणजे ब्लॅकमेल असून ते राज्याच्या हिताविरोधात आहे असा आरोप स्टॅलिन यांनी पत्रातून केला आहे. मात्र स्टॅलिन यांचे आरोप शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधान यांनी फेटाळून लावले आहे. राजकीय द्वेषातून तामिळनाडू सरकार हिंदी लादण्याचा खोटा बनाव रचत आहे असं शिक्षणमंत्र्यांनी म्हटलं.

तामिळनाडू सरकारने याआधी नवं शैक्षणिक धोरण अंमलात आणण्यावर सहमती दर्शवली होती परंतु आता राजकीय फायद्यासाठी त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. त्रिभाषा धोरण कुठल्याही विशेष भाषेला लादण्यासाठी नाही तर भारतीय भाषांना योग्य स्थान देण्यासाठी बनवण्यात आली आहे. या धोरणाने भारतीय भाषा सशक्त होईल परंतु तामिळनाडूने द्विभाषा धोरण स्वीकारलं आहे. हिंदी लादण्याचा आमचा हेतू नाही आणि बाकी राज्यात ही निती आधीच लागू आहे. तामिळनाडूच्या सीमावर्ती भागात विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषा शिकण्याची संधी का मिळू नये असा सवाल धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे.

दरम्यान, तामिळनाडू सरकारच्या कठोर धोरणामुळे राज्याला पंतप्रधान श्री योजनेतून मिळणारे २ हजार कोटी रूपयांचा फायदा मिळत नाही. मुख्यमंत्री स्टॅलिन त्यांच्या भूमिकेवर अडून बसले आहेत त्यांनी नवं शैक्षणिक धोरण लागू करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यावर काही राजकीय पक्ष आजही आपल्या देशात भाषेच्या आधारावर विभाजन करत आहेत. मातृभाषा ही सर्वांसाठी महत्त्वाची असते. महान कवी भारती यांनी १० हून अधिक भाषेचं ज्ञान घेतल्यानंतर तामिळ सर्वात महान भाषा असल्याचं सांगितले होते. त्यासाठी लोकांना जास्तीत जास्त भाषेचं ज्ञान असायला हवे असं तामिळनाडूतील भाजपा प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी सांगत सरकारवर निशाणा साधला. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूNarendra Modiनरेंद्र मोदीEducationशिक्षणhindiहिंदी