शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले पुलवामा हल्ल्याचा फायदा उठवा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 14:50 IST

पुलवामामध्ये याआधीही अनेक हल्ले झाले आहेत. देशातील लोक रात्रंदिवस हेच पाहत आहेत की, भारताकडून पाकिस्तानवर काय कारवाई केली जातेय.

बडोदा : पुलवामामध्ये आत्मघाती हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांवरून गुजरातमधीलभाजपाचे नेते आणि प्रवक्ते भरत पंड्या यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यामुळे देशात 'देशभक्तीचे वारे वाहू लागले आहेत, त्याचा मतांसाठी फायदा उठवा', असा आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना एका सभेवेळी दिला आहे. भाजपाकडून आयोजित कार्यकर्ता संवाद शिबिरामध्ये ते सोमवारी बोलत होते. 

पंड्या पुढे म्हणाले, की काश्मीरमध्ये जो हल्ला झाला...तुम्ही सर्वांनी त्याचे व्हिडिओ, फोटो पाहिले असतील. देशातील लोक सर्व मतभेद दूर करून राष्ट्रभक्तीमुळे एकत्र आलेत. या लोकांनी रॅली आणि आंदोलने करून देशाप्रती असलेले प्रेम दाखविले आहे. मनमोहन सरकारच्या वेळी मुंबईमध्ये हल्ला झाला होता तेव्हा कसे वातावरण होते? संसदेत कशाप्रकारे मुद्दा उठविण्यात येत होता. त्यावेळी अशी चर्चा होती की हल्लेखोर दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर मदत मिळत आहे. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात होती. मात्र, आज स्थिती बदलली आहे. 

पंड्या पुढे म्हणाले, पुलवामामध्ये याआधीही अनेक हल्ले झाले आहेत. देशातील लोक रात्रंदिवस हेच पाहत आहेत की, भारताकडून पाकिस्तानवर काय कारवाई केली जातेय. देशात आज ही भावना आहे. पूर्ण देश राष्ट्रभक्तीच्या भावनेत आहे. या एकतेला मतांमध्ये परिवर्तीत करण्याची जबाबदारी आपली आहे. 

याशिवाय त्यांनी कार्यकर्त्यांना बोलताना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला आहे. पक्षाची प्रतिमा मलिन होईल असे शब्द वापरू नयेत. तुमचे शब्द औषधासारखे असायला हवेत असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Gujaratगुजरात